शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कामाची थांबली ‘फाइल’, तर सीईओंना ‘मेसेज’ जाईल; कोल्हापूर जिल्हा परिषदेत १ जूनपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली

By समीर देशपांडे | Updated: April 9, 2024 16:49 IST

४८ तास एकाच ठिकाणी फाइल नाही थांबणार

समीर देशपांडेकोल्हापूर : ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ अशी एक प्रचलित म्हण आहे; परंतु उपलब्ध तंत्रज्ञानाच्या आणि कायद्याच्या आधारे ही परिस्थिती बदलली जात आहे. याचे प्रत्यंतर आता जिल्हा परिषदेत येणार आहे. या ठिकाणी १ जून २०२४ पासून ‘ई ऑफिस’ म्हणजेच पेपरलेस ऑफिसची संकल्पना राबविण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी हा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषदेअंतर्गत १०२५ ग्रामपंचायती, १९०० हून अधिक शाळा येतात. या सर्व गावांचे रस्ते, पाणीपुरवठा योजना, अंगणवाड्या, पाचशेहून अधिक असलेले दवाखाने एवढी प्रचंड यंत्रणा कार्यरत असते. कमी मनुष्यबळ, संगणकीय कामकाज फारसे तरबेज नसलेले ज्येष्ठ कर्मचारी अशा अनेक कारणांमुळे अनेक कामांच्या आणि प्रकरणांच्या फाइल्सचा प्रवास रेंगाळणारा ठरत आहे; परंतु आता मात्र नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या नव्या प्रणालीच्या माध्यमातून ‘ई ऑफिस’ संकल्पना राबवण्याबाबत विभागप्रमुखांच्या बैठकीत सूचना दिल्या आहेत.सध्या महसूल विभागाचे सर्व कामकाज पेपरलेस झाले असून, राज्यातील एकाही जिल्हा परिषदेत अजूनही हा प्रयोग करण्यात आलेला नाही; परंतु कोल्हापूर जिल्हा परिषदेने यामध्ये पुढाकार घेण्याचे ठरवले असून, त्यासाठी आवश्यक असलेले शासकीय सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेण्यासह अन्य यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना कार्तिकेयन एस. यांनी दिल्या आहेत. जरी असा निर्णय घेतला असला तरी प्रत्येक विभागात संगणक स्नेही माेजकेच कर्मचारी असल्यामुळे साहजिकच पहिल्यांदा या पद्धतीने काम करणे जड जाणार आहे.

४८ तास एकाच ठिकाणी फाइल नाही थांबणारकोणत्याही विभागप्रमुखाच्या टेबलवर एखादी फाइल ही ४८ तासांपेक्षा अधिक काळ थांबणार नाही याची दक्षता या प्रणालीअंतर्गत घ्यावी लागणार आहे. अशी फाइल थांबल्यास याचा ‘मेसेज’ आपोआप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जाणार आहे.

पेपरलेस ऑफिस करण्याचा पहिला टप्पा म्हणून आपण शासकीय ई-ऑफिस प्रणालीसह काम करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ मे पासून चाचणी तत्त्वावर हे काम सुरू करण्यात येणार असून, १ जूनपासून नियमितपणे हे कामकाज सुरू होईल. यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेच्या कामकाजाला गती येणार आहे. - कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद