शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कोल्हापूर :  गजाआडच्या जगात निरागस हास्यचा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 14:23 IST

कारागृह हा शब्द ऐकला, तरी उंच उंच दगडी भिंती, बरॅकला धरून उभे असलेले कैदी, जाळीच्या पलिकडून बोलणारे नातेवाईक आणि बंदिस्त जग डोळ्यासमोर येतं; पण या गजाआडच्या जगातही स्वच्छंदी जगणाऱ्या लहानग्या बाळाचे निरागस हास्य कैद्यांनाच नव्हे, तर वर्दीआड दडलेल्या माणूसपणालाही साद देते. कळंबा कारागृहात शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील महिन्याकाठी किमान पाच ते सहा बालकांचे बालपण जपले जाते.

ठळक मुद्दे गजाआडच्या जगात निरागस हास्यचा किलबिलाटकळंबा कारागृहात शून्य ते सहा वर्षांच्या बालकांचे संगोपन

इंदूमती गणेशकोल्हापूर : कारागृह हा शब्द ऐकला, तरी उंच उंच दगडी भिंती, बरॅकला धरून उभे असलेले कैदी, जाळीच्या पलिकडून बोलणारे नातेवाईक आणि बंदिस्त जग डोळ्यासमोर येतं; पण या गजाआडच्या जगातही स्वच्छंदी जगणाऱ्या लहानग्या बाळाचे निरागस हास्य कैद्यांनाच नव्हे, तर वर्दीआड दडलेल्या माणूसपणालाही साद देते. कळंबा कारागृहात शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील महिन्याकाठी किमान पाच ते सहा बालकांचे बालपण जपले जाते.आयुष्याच्या एका वळणावर हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून व्यक्तीची रवानगी कारागृहात होते. आठ महिन्यांची गरोदर असताना एका महिलेसह तिच्या पतीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आणि दोघेही कारागृहात आले. या महिलेने अडीच महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि कारागृहात मंगळवारी (दि. १) धुमधडाक्यात बारसं घालून या चिमुकलीला ‘दुर्गा’ हे नाव दिलं गेलं.

कारागृहाच्या बंद दरवाजाआडही येथील बालकांचे बालपण जपण्याचा प्रयत्न.कारागृह ही सुधारगृह व्हावी, या उद्देशाने कळंबा जेल प्रशासनाकडून कैद्यांसाठी शिक्षण, गळाभेट, अंबाबाईचा लाडू प्रसाद, रोजगार, प्रशिक्षण, असे विधायक उपक्रम राबविले जात आहेत; पण एका चिमुकलीचे बारसे होण्याची ही कारागृहाच्या इतिहासात पहिलीच वेळ होती.

बालहक्क आणि कायद्यानुसार कोणत्याही मातेला तिच्या बाळापासून वेगळे करता येत नाही. मग ती महिला गुन्हेगार असली तरी. महिला कैदीसोबत कारागृहात तिची शून्य ते सहा वर्षांपर्यंतची बालके राहू शकतात. कळंबा कारागृहात सध्या ७० महिला कैदी आहेत. त्यातील एका महिलेला दोन व अन्य तिघींना एक एक मूल आहे. काही दिवस किंवा एक-दोन वर्षांसाठी शिक्षा भोगण्यासाठी आलेल्या महिला कैदी मुलांसोबत राहतात आणि शिक्षेचा कालावधी संपला, की निघून जातात. अशा रीतीने महिन्याला किमान पाच ते सहा महिला कैदी बालकांसमवेत कारागृहात येत-जात असतात.

खेळणीपासून अंगणवाडीपर्यंत..कारागृहात मातेची व नवजात शिशूची छान काळजी घेतली जाते. तिच्यासाठी स्वतंत्र खोली दिली जाते. मातेला सकस आहार, बालकाचे सुयोग्य संगोपन, औषधोपचार, अगदी खेळणीपर्यंतच्या सोईसुविधा पुरवल्या जातात. अनेकदा येथील महिला कर्मचाऱ्यांची मुलंही या लहानग्यांसोबत छान रमतात.

भायखळा, येरवडा या कारागृहांमध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील २५ ते ३० बालके असतात; त्यामुळे त्यांच्यासाठी कारागृहातच अंगणवाडी चालवली जाते. त्यासाठी शिक्षीका, अंगणवाडी सेविका, मदतनीसांची नेमणूक केली जाते; पण कळंबा कारागृहात सरासरी पाच ते सहा बालके असतात. सध्या त्यातील दोनच बालके अंगणवाडीला जाण्याच्या वयाची असल्याने त्यांना कळंब्यातील अंगणवाडीत पाठविले जाते. कारागृहाचे कर्मचारीच त्यांची ने-आण करतात.

जन्माचे गुपितएखाद्या बालकाचा कारागृहात जन्म झाला, की आयुष्यभर त्याच्यावर ठपका बसतो. या ठपक्याखाली त्यांचे बालपण चिरडले जाऊ नये, यासाठी कारागृह प्रशासनाकडून बाळाच्या जन्मदाखल्यावर कारागृहाचा नामोल्लेखही केला जात नाही. ‘सीपीआर’सारख्या दवाखान्याचे नाव या जन्मदाखल्यावर असते.

रवानगी बालकल्याण संकुलात...सहा वर्षांनंतर बालकांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव येत असते. आपण कारागृहात राहतोय, ही भावना त्यांच्या मनावर विपरीत परिणाम करणारी ठरू शकते; त्यामुळे सहा वर्षांनंतरच्या बालकांना पालकांच्या परवानगीने कैद्यांच्या कुटुंबीयांकडे किंवा बालकल्याण संकुलसारख्या संस्थांमध्ये पाठविले जाते.

 

नवजात बालकांच्या संगोपनात पहिली सहा वर्षे खूप महत्त्वाची असतात; त्यामुळेच कारागृहात त्यांचे बालपण जपण्याचा प्रयत्न केला जातो. ही बालके येथे छान रमतात, महिला कर्मचाºयांच्या मुलांसोबत खेळतात, त्यांचे हे विश्व आम्हा सर्वांनाही आनंदून जाते.शरद शेळके, अधीक्षक, कळंबा कारागृह 

 

टॅग्स :jailतुरुंगkolhapurकोल्हापूर