शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूर : प्राधिकरणचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु : चंद्रकांतदादा पाटील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 17:25 IST

कोल्हापूर शहर व शहरालगतच्या गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या प्राधिकरणाचे काम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन दुसऱ्यांची आयुष्ये बरबाद करत नाही ना याचे भान प्रत्येकाने ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे प्राधिकरणचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु : चंद्रकांतदादा पाटीलअभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये प्रमोद पाटील यांचा उपक्रम गौरवास्पद

कोल्हापूर : शहर व शहरालगतच्या गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या प्राधिकरणाचे काम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन दुसऱ्यांची आयुष्ये बरबाद करत नाही ना याचे भान प्रत्येकाने ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.छत्रपती शाहू स्टेडियम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा सकाळी ९.१५ वाजता त्यांच्या हस्ते झाला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. पालकमंत्री पाटील म्हणाले, प्राधिकरणाचे काम हे कसबा बावडा येथील प्रशासकिय इमारत येथील कार्यालयातून सुरु होणार आहे. या प्राधिकरणामुळे शहरा लगतच्या गावांसह उपनगरांचा विकास होईल.

प्रस्तावित हद्दवाढीतील गावांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून एका नियमावलीत ही गावे आल्याने त्यांचा चांगल्या प्रकारे व व्यवस्थित विकास या प्राधिकरणातून होणार आहे. शहरामध्ये अनेक गोष्टी ज्या महापालिकेच्या सध्याच्या उत्पन्नात करता येत नाहीत. त्या

मध्ये उपनगरात एखादे चांगले हॉस्पिटल या प्राधिकरणाच्या माध्यमातून करता येईल. या ठिकाणी चांगले व सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा प्राधिकरणचा मनोदय आहे. त्याचबरोबर एक आॅडीटोरियमही उभारले जाईल. अशा गोष्टींच्या सुविधांमुळे उपनगरातील लोकांना भवानी मंडपात यावे लागणार नाही.ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून तयार झालेल्या भारतीय राज्य घटनेमुळे पुरुष व स्त्रियांना एकाच मताचा अधिकार मिळून समानता आली. त्याचबरोबर प्रत्येकाला स्वत:चे हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले. आपल्या हक्कांसाठी आपण जितके जागरुक असतो. तसे दुसऱ्यांच्या हक्कासाठीही जागरुक असले पाहीजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे प्र्रत्येकाला दिले आहे.त्याचा दुरुपयोग करुन दुसऱ्यांची आयुष्ये आपण बरबाद तर करत नाही ना याचेही भान प्रत्येकाने ठेवावे.

३१ मार्चपर्यंत शिल्लक वाड्यावस्त्यांवर वीज मिळणारजिल्ह्यातील एकही वाडी वस्ती वीजेपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. तीन ते चार वाड्या सोडल्या तर सर्वत्र वीज पोहोचली आहे. या ठिकाणी वीज द्यावी, ती शक्य नसल्यास सोलरच्या माध्यमातून वीज पुरवावी, ३१ मार्चपर्यंत शिल्लक राहील्या वाड्यांवर कोणत्याही परिस्थितीत वीज द्यावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

प्रमोद पाटील यांचा उपक्रम गौरवास्पदजिल्ह्यातील धनगरवाड्यातील मुलांना कोल्हापूर व कोल्हापूरची वैशिष्टये दाखविण्यासाठी सहजसेवा ट्रस्टचे प्रमोद पाटील यांनी राबविलेला हा उपक्रम गौरवास्पद आहे. विकासापासून मागे राहीलेल्या समाजाला विकासाची तोंड ओळख करुन देणे आवश्यक असून ते पाटील यांच्या प्रयत्नातून होत आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८