शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गरीबांबद्दल कळवळा का नाही आला?, पालकमंत्री पाटील, आ. महाडिक यांच्यावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 16:42 IST

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरीबांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली उध्दवस्त केली ,फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील कॉँग्रेस आघाडीतर्फे उपस्थित करण्यात आला. श्रीमंत कोल्हापूर करायला निघालेल्या पालकमंत्र्यांनी श्रीमंत लोकांसाठी किमान कोल्हापूर शहराची वाट लावू नये असे आवाहनही आघाडीने केले आहे.

ठळक मुद्देगरीबांबद्दल कळवळा का नाही आला?पालकमंत्री पाटील, आ. महाडिक यांच्यावर टीका

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरीबांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली उध्दवस्त केली, फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील कॉँग्रेस आघाडीतर्फे उपस्थित करण्यात आला. कोल्हापूर श्रीमंत करायला निघालेल्या पालकमंत्र्यांनी श्रीमंत लोकांसाठी किमान कोल्हापूर शहराची वाट लावू नये असे आवाहनही आघाडीने केले आहे.मंगळवारी मंत्रालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत गांधीनगर रस्त्यावरील अवैध बांधकामाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याने त्यावर कारवाई कर नये, असे राज्य सरकारने निर्देश दिल्यामुळे त्याची प्रतिक्रिया महानगरपालिका वर्तुळात उमटली.

या निर्णयाचा कॉँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत तीव्र शब्दात निषेध केला आहे. महापौर स्वाती यवलुजे, शिक्षण मंडळ सभापती वनिता देठे, महिला बाल कल्याण सभापती सुरेखा शहा, गटनेते शारंगधर देशमुख, माजी सभापती संदीप नेजदार, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, संजय मोहिते यावेळी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील व आमदार महाडिक यांना श्रीमंतांना एक आणि गरीबांना एक न्याय द्यायचा आहे. एकीकडे शहरात गरीबांवर कारवाई झाली त्यावेळी ही मंडळी कुठे होती. त्यावेळी त्यांना कळवळा आला नाही. गांधीनगर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या श्रीमंतांची बाजू घेऊन मताच्या राजकारण करताना मात्र कळवळा आला. नियम न पाळता जर इमारती बांधल्या असतील तर त्यांच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांना संरक्षण देण्याची गरज नाही, अशी अपेक्षा शारंगधर देशमुख यांनी व्यक्त केली.येथून पुढे शहरात अतिक्रमण काढण्याची विना परवाना बांधकामे तोडण्याची मोहिम मनपा प्रशासनाने हाती घेतली तर पक्ष म्हणून नाही तर नगरसेवक म्हणून रस्त्यावर उतरुन ही कारवाई बंद पाडू असा इशारा देशमुख यांनी दिला. जोपर्यंत गांधीनगर रस्यावरील अवैध बांधकामे तोडली जात नाहीत तोपर्यंत शहरात कारवाई करु दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस संरक्षण नाकारणाऱ्या पोलिस प्रशासनाचाही निषेध करण्यात आला.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर