शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर : वीज कंपन्यांच्या त्रुटी उद्योजकांच्या माथी का?  : संतोष मंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:13 IST

भाजपचा विरोधी बाकांवर असतानाही पाठिंबा होता; पण आता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

ठळक मुद्देवीज कंपन्यांच्या त्रुटी उद्योजकांच्या माथी का?  : संतोष मंडलेवीज दरवाढीला विरोध करणाऱ्या भाजपने सत्तेवर आल्यानंतर भूमिका बदलली

कोल्हापूर : वीज उत्पादित कंपन्यांकडून त्रुटींचा भार ग्राहक, व्यापारी आणि उद्योेजकांवर टाकला जात आहे. यातून होणाऱ्या वीजदरवाढीला उद्योगक्षेत्रातून प्रखरतेने विरोध राहणारच. या आमच्या भूमिकेला भाजपचा विरोधी बाकांवर असतानाही पाठिंबा होता; पण आता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज व वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यातर्फे ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्व्हर्जन्स’ या इंडस्ट्रिअल व मशिनरी प्रदर्शनासाठी अध्यक्ष मंडलेचा हे कोल्हापुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.अध्यक्ष मंडलेचा म्हणाले, या वीजदरवाढीला विरोध करण्यासाठी राज्य पातळीवर २० डिसेंबरला बैठक होत आहे. वीज उत्पादन कंपनी दरवाढीसाठी वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव देते. त्यामुळे वीजदरवाढ करताना नियामक आयोग हा वेगवेगळ्या परिस्थितींचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेतो. आजचा वीज दरवाढीचा प्रस्ताव हा पाच वर्षांसाठीचा असून, हे धोरण उद्योगक्षेत्राला घातक आहे.

याबाबत वीज नियामक आयोगाने सुनावण्या घेतल्या. त्या सुनावणीवेळी औद्योगिक संघटनांनी वीज दरवाढीला प्रखर विरोध केला आहे. तरीही नियामक आयोग सरकारला हवा तसा निर्णय घेत आहे.चांगल्या दर्जाची वीजसेवा पुरविण्याची जबाबदारी वीज कंपनीची आहे; पण या कंपन्यांकडून त्रुटीचा भार ग्राहक, व्यापारी आणि उद्योजकांवर लादला जात आहे, हे योग्य नाही. विरोधी बाकांवर बसून या पद्धतीने वीजदरवाढ करण्यास भाजपने विरोध दर्शविला होता; पण आज सत्तेवर आल्यानंतर भाजप आपली भूमिका बदलत आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्या भावना तीव्र आहेत. या वीजदरवाढीमुळे महाराष्ट्रातील उद्योजक मेटाकुटीस आले आहेत.

असहकाराचे आंदोलनया वीजदरवाढीबाबत सल्लामसलत करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर उत्सुक आहे. सर्वच मार्ग आंदोलनातून निघत नाहीत. चर्चेतून मार्ग न निघाल्यास असहकाराचे आंदोलन उभारू, असाही इशारा संतोष मंडलेचा यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्यां विविध प्रकारच्या सबसिडींचा भार सरकार उद्योजक, व्यापाऱ्यांवर टाकत असल्याची शंकाही अध्यक्ष मंडले यांनी यावेळी व्यक्त केली. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर