शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ नावीन्यपूर्ण चंद्रकांत पाटील : पर्यटक वाढण्यासाठी उपक्रम; आॅनलाईन नोंदणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:22 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यटन पाहण्यासाठी येणाऱ्या बाहेरील पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातील ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा नावीन्यपूर्ण

कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यटन पाहण्यासाठी येणाऱ्या बाहेरील पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातील ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम असून, तो कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेईल, असे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे काढले.ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृहाच्या राजर्षी शाहू हॉल येथे ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या पर्यटन सहलीच्या आॅनलाईन नोंदणी प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ आॅनलाईन नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. प्रमुख उपस्थिती भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, सरचिटणीस अशोक देसाई, निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके, पर्यावरणपे्रमी उदय गायकवाड, राहुल कुलकर्णी, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, चारुदत्त जोशी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, कोल्हापुरात पर्यटन विकासाची मोठी क्षमता असून, अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी अनोळखी आहेत. यामधील आठ ठिकाणांचा समावेश असणारी दोन दिवसांची संपूर्णत: मोफत सहल एप्रिल व मे महिन्यांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.१३ एप्रिलपासून दर शुक्रवारी व शनिवारी होणाºया या सहलींचा पर्यटकांना लाभ घेता यावा यासाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या उपक्रमाचा लोकांनी लाभ घ्यावा.५२७ जणांची आॅनलाईन नोंदणीएप्रिल व मे महिन्यांत होणाºया या सहलींमध्ये सुमारे १४०० लोकांच्या संपूर्णत: मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत आॅफलाईन झालेल्या नोंदणीमध्ये ५२७ लोकांनी नोंदणी केली आहे. विविध माध्यमांतून झालेल्या प्रसिद्धीमुळे लवकरच आॅनलाईन बुकिंगलाही मोठा प्रतिसाद मिळेल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या उपक्रमासाठी Unexplored Kolhapur ही वेबसाईट तयार केली असून, त्यावर नोंदणी करावी, तसेच याचे फेसबुक पेजही तयार केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहाच्या राजर्षी शाहू हॉल येथे शनिवारी ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या पर्यटन सहलींच्या आॅनलाईन नोंदणीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी अनिल चौगुले, आर. डी. पाटील, संदीप देसाई, उदय गायकवाड, अमर आडके, आदी उपस्थित होते.