शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

कोल्हापूर : लसीकरण नाकारणे पडले महागात, जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:07 IST

जनावरांसाठी लाळखुरकतची लस टोचून घेण्यास नकार देणे पशुपालकांना चांगलेच महागात पडले आहे. लस न दिल्याने गेल्या पंधरा दिवसांत जवळपास १३ जनावरे दगावली असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून कोणताही लाभ मिळत नसल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलसीकरण नाकारणे पडले महागात, जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढलेलाळखुरकत लसींबाबत पशुपालकांत गैरसमज

कोल्हापूर : जनावरांसाठी लाळखुरकतची लस टोचून घेण्यास नकार देणे पशुपालकांना चांगलेच महागात पडले आहे. लस न दिल्याने गेल्या पंधरा दिवसांत जवळपास १३ जनावरे दगावली असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून कोणताही लाभ मिळत नसल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात लाळखुरकत आजाराने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. याच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेने नुकतीच लसीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. २९ पशुधन विकास अधिकारी, १९ सहायक पशुधन अधिकारी, ७२ पर्यवेक्षक, ‘गोकुळ’चे १५० डॉक्टर, कृत्रिम रेतन केंद्रावरील ३६ जण यासह खासगी प्रॅक्टिस करणारे पशुवैद्यक यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेने लाळखुरकत प्रतिबंध लसीकरण पूर्ण केले आहे. ८ लाख लसींचे ६ लाख २५ हजार ७०३ जनावरांना लसीकरण पूर्ण केले आहे. यात १ लाख ९५ हजार १३६ गाई, तर ४ लाख ३० हजार ५६७ म्हशींचा समावेश आहे.परजिल्ह्यांतून येणाऱ्या ऊसतोडणी मजुरांच्या जनावरांमध्ये या आजारांची जास्त लक्षणे दिसत असल्याने कारखान्याच्या गाडीअड्ड्यावर जाऊन लसीकरण केले आहे.

तथापि स्थानिक पातळीवर मात्र ही लस टोचून घेण्याबाबत पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज असल्याने बऱ्याच जणांनी ती टोचून घेतलेली नाही. सध्या जी जनावरे दगावली आहेत, त्यांना ही लस टोचली गेली नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. आजच्या घडीला एका जनावराची किंमत किमान ५० हजार आहे. केवळ गैरसमजुतीने लसीकरण न करून घेतल्याने पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

लसीकरणाबाबत गैरसमज

  1. सरकारी लस नको, खासगीच हवी
  2. लस टोचल्यास जनावरांना ताप येतो.
  3. जनावरे तीन दिवस दूध देत नाहीत.
  4. जनावरांच्या कासेला गाठी होतात.

 

पंधरा दिवसांत तेरा जनावरे दगावलीजिल्ह्यात गेल्या १५ दिवसात १३ जनावरे दगावली आहे. यात माणगावातील तीन, नागदेववाडी तीन, कंदलगाव चार, करनूर तीन अशी मृत झालेली जनावरे आहेत. या जनावरांना लस देण्यात पशुपालकांनीच नकार दिला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लाभ मिळण्यात अडचणीकोणत्याही आजाराने जनावर दगावले तर त्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभाग घेत नाही. जिल्हा परिषदेकडून गोठा जळून जनावरे दगावली तर प्रती जनावर १० हजार रुपये मिळतात; पण आजारासाठी पैसे मिळत नाहीत. खासगी दूध संघाचा विमा असेल तर मात्र एका जनावराला किमान २० हजार रुपये तरी मिळतात. लाभ मिळण्याची प्रक्रिया अवघड असल्याने त्याच्या मागे लागण्यापेक्षा लसीकरणासाठी आग्रह धरण्याची गरज आहे.

आम्ही घरोघरी जाऊन लसीकरणासाठी आवाहन केले तरीही पशुपालक लसीकरणास सहकार्य करीत नव्हते. अचानक थंडी वाढल्याने जनावरांना ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून त्यांना न्यूमोनियाही होत आहे. जनावरांना उबदार जागेत बांधण्यासह त्यांना गारवा लागणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.- डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुधन विकास अधिकारी, कोल्हापूर 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर