शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

कोल्हापूर : लसीकरण नाकारणे पडले महागात, जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:07 IST

जनावरांसाठी लाळखुरकतची लस टोचून घेण्यास नकार देणे पशुपालकांना चांगलेच महागात पडले आहे. लस न दिल्याने गेल्या पंधरा दिवसांत जवळपास १३ जनावरे दगावली असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून कोणताही लाभ मिळत नसल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलसीकरण नाकारणे पडले महागात, जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढलेलाळखुरकत लसींबाबत पशुपालकांत गैरसमज

कोल्हापूर : जनावरांसाठी लाळखुरकतची लस टोचून घेण्यास नकार देणे पशुपालकांना चांगलेच महागात पडले आहे. लस न दिल्याने गेल्या पंधरा दिवसांत जवळपास १३ जनावरे दगावली असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून कोणताही लाभ मिळत नसल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या लसीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात लाळखुरकत आजाराने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. याच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेने नुकतीच लसीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. २९ पशुधन विकास अधिकारी, १९ सहायक पशुधन अधिकारी, ७२ पर्यवेक्षक, ‘गोकुळ’चे १५० डॉक्टर, कृत्रिम रेतन केंद्रावरील ३६ जण यासह खासगी प्रॅक्टिस करणारे पशुवैद्यक यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेने लाळखुरकत प्रतिबंध लसीकरण पूर्ण केले आहे. ८ लाख लसींचे ६ लाख २५ हजार ७०३ जनावरांना लसीकरण पूर्ण केले आहे. यात १ लाख ९५ हजार १३६ गाई, तर ४ लाख ३० हजार ५६७ म्हशींचा समावेश आहे.परजिल्ह्यांतून येणाऱ्या ऊसतोडणी मजुरांच्या जनावरांमध्ये या आजारांची जास्त लक्षणे दिसत असल्याने कारखान्याच्या गाडीअड्ड्यावर जाऊन लसीकरण केले आहे.

तथापि स्थानिक पातळीवर मात्र ही लस टोचून घेण्याबाबत पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज असल्याने बऱ्याच जणांनी ती टोचून घेतलेली नाही. सध्या जी जनावरे दगावली आहेत, त्यांना ही लस टोचली गेली नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. आजच्या घडीला एका जनावराची किंमत किमान ५० हजार आहे. केवळ गैरसमजुतीने लसीकरण न करून घेतल्याने पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

लसीकरणाबाबत गैरसमज

  1. सरकारी लस नको, खासगीच हवी
  2. लस टोचल्यास जनावरांना ताप येतो.
  3. जनावरे तीन दिवस दूध देत नाहीत.
  4. जनावरांच्या कासेला गाठी होतात.

 

पंधरा दिवसांत तेरा जनावरे दगावलीजिल्ह्यात गेल्या १५ दिवसात १३ जनावरे दगावली आहे. यात माणगावातील तीन, नागदेववाडी तीन, कंदलगाव चार, करनूर तीन अशी मृत झालेली जनावरे आहेत. या जनावरांना लस देण्यात पशुपालकांनीच नकार दिला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लाभ मिळण्यात अडचणीकोणत्याही आजाराने जनावर दगावले तर त्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभाग घेत नाही. जिल्हा परिषदेकडून गोठा जळून जनावरे दगावली तर प्रती जनावर १० हजार रुपये मिळतात; पण आजारासाठी पैसे मिळत नाहीत. खासगी दूध संघाचा विमा असेल तर मात्र एका जनावराला किमान २० हजार रुपये तरी मिळतात. लाभ मिळण्याची प्रक्रिया अवघड असल्याने त्याच्या मागे लागण्यापेक्षा लसीकरणासाठी आग्रह धरण्याची गरज आहे.

आम्ही घरोघरी जाऊन लसीकरणासाठी आवाहन केले तरीही पशुपालक लसीकरणास सहकार्य करीत नव्हते. अचानक थंडी वाढल्याने जनावरांना ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून त्यांना न्यूमोनियाही होत आहे. जनावरांना उबदार जागेत बांधण्यासह त्यांना गारवा लागणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.- डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुधन विकास अधिकारी, कोल्हापूर 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर