शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापुरातील टाऊन हॉल उद्यानातील दीडशेहून दुर्मीळ वनस्पतींचा ठेवा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:31 IST

सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहराला लाभलेली चित्रपरंपरा, ब्रिटिश मराठाकालीन शस्त्रास्त्रे, असा इतिहासाचा प्राचीन ठेवा असलेल्या कोल्हापूरच्या टाऊन हॉलमधील उद्यानात शतकोत्तर वर्षे गाठलेल्या १५० हून अधिक दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन केले आहे; मात्र, अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे हा अमूल्य ठेवा धोक्यात आला आहे. यात ‘भद्राक्ष, मधुमेहावरील दुर्मीळ ‘कणुंगा’ सीता अशोक, रंजन, ...

सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहराला लाभलेली चित्रपरंपरा, ब्रिटिश मराठाकालीन शस्त्रास्त्रे, असा इतिहासाचा प्राचीन ठेवा असलेल्या कोल्हापूरच्या टाऊन हॉलमधील उद्यानात शतकोत्तर वर्षे गाठलेल्या १५० हून अधिक दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन केले आहे; मात्र, अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे हा अमूल्य ठेवा धोक्यात आला आहे. यात ‘भद्राक्ष, मधुमेहावरील दुर्मीळ ‘कणुंगा’ सीता अशोक, रंजन, ताराफळ, कैलासपती, आदी वनस्पतींचे जतन व संवर्धन केले जात आहे. अशाप्रकारचे राज्यातील एकमेव उद्यान आहे.सात एकर जागेत विस्तारलेल्या या उद्यानात ‘भद्राक्ष’, ही रुद्राक्ष वर्गीयांतील वनस्पतींसह अमृतफळ, ब्रह्मदंडा, सीता अशोक, सीता रंजन, कदंबा, ताराफळ, कैलासपती, मुचकुंद, पुत्रावंती, सुकुणा, प्लॅटोफर्म, शिरीष, करंज, गुलमोहर, रेन ट्री, सायकस पाम, ट्रॅव्हल पाम, पारोशिया पिंपळ, महागणी, चाफ्याचे विविध प्रकार, बकुळ, बेरडा, बॅरिंगटोनिया, पारकीया, कॅम्पर, आदी बहुउपयोगी १५० हून अधिक वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे. यात नव्याने ‘यांगयांग’ अर्थात ‘क णुंगा’ या वनस्पतीचेही संवर्धन केले जात आहे. या रोपांवर संशोधन करून येथील तीन कर्मचाºयांनी १०० रोपांची नव्याने निर्मिती केली आहे. या वनस्पतीचा उपयोग मधुमेहावरील औषध म्हणून उपयोग केला जात आहे. अशा एक ना अनेक दुर्मीळ वनस्पती या उद्यानात पाहण्यास मिळतात; पण त्यांच्या संवर्धनासाठी पुरेशा प्रमाणात कर्मचारीवर्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उद्यान विभागाकडे नाही. या उद्यानात २००७ पूर्वी ४७ कर्मचारी वर्ग होता. सुधारित आकृतीबंधानुसार या उद्यानात केवळ तीनच कर्मचारी शिल्लक उरले आहेत. निवृत्त झाल्यानंतर नव्याने भरती न झाल्याने या उद्यानाचा कारभार केवळ आऊटसोर्सिंगवर चालविला जात आहे; त्यामुळे कदाचित काही झाडे वटल्यानंतर ती आपोआप पडली, तर अनेक वनस्पती दुर्मीळच होतील. अशी भीती अनेक व्यक्त केली जात आहे.शंभर वर्षांपूर्वीचा ‘रेन ट्री!’या उद्यानातील १00 वर्षांहून अधिक काळचा एक रेन ट्री आहे. त्याच्या काही फांद्या भाऊसिंगजी रोडवर एका बाजूने झुकल्या आहेत. त्या कापल्या नाहीत, तर एखादी दुर्घटना घडून मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. म्हणून टाऊन हॉल उद्यान अधीक्षकांनी त्या फांद्या कापण्यासाठी सन २००४ ते २०१८ पर्यंत प्रत्येक वर्षी महानगर पालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीची परवानगी घेतली आहे; पण अद्यापही येथे बदलून आलेल्या एकाही उद्यान अधीक्षकांकडून कापण्याचे धाडस झालेले नाही; त्यामुळे कोल्हापुरातील पर्यावरणप्रेमी जनतेची वृक्ष संवर्धनाबद्दलची जाणीव किती आहे. यापेक्षा दहशत कशी आहे, याची जाणीव होते. हे विशेषच म्हणावे लागेल.