शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर टोलप्रश्नी मंगळवारी चर्चा

By admin | Updated: November 14, 2015 00:20 IST

मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर टोलप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबररस्त्यांच्या मूल्यांकनाबाबत मंगळवारी (दि. १७) चर्चा करू व या चर्चेतून निश्चितच मार्ग काढू आणि महिन्याअखेर कोल्हापूर टोलमुक्त करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी (दि. १२) कोल्हापुरात दिले.कोल्हापूर टोलप्रश्नी ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, निमंत्रक निवास साळोखे, आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत टोलचे पैसे कसे भागवायचे याविषयी चर्चा झाली. दरम्यान, टोलविरोधी कृती समितीने यापूर्वी पुकारलेले सोमवार (दि. १६)चे शिरोली टोलनाक्यावरील आंदोलन होणार असल्याचे समितीने यावेळी स्पष्ट केले. चंद्रकांतदादा पाटील यांनी, मी महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त होतो. मध्यंतरी माझी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर देशातील टोलप्रश्नाबाबत चर्चा झाली. या बंद केलेल्या टोलनाक्यांची रक्कम २३ हजार कोटी रुपये होते. त्यावर मी कोल्हापुरातील टोलप्रश्नासंदर्भात निर्णय घ्यावा, असे गडकरींना सांगितले. गडकरींनी यापूर्वी महाराष्ट्रातील बंद केलेल्या ६५ टोलनाक्यांची रक्कम सुमारे ९६२ कोटी रुपये होते व एलबीटी माफची रक्कम २७०० कोटी होते. ही सर्व रक्कम ३१ मार्च २०१६ पर्यंत भागविली जाण्याचे नियोजन असल्याचे मला सांगितले, असे बैठकीत पाटील यांनी सांगून कोल्हापुरातील रस्त्यांसंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या फेरमूल्यांकन समितीतील सदस्य आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी सुमारे १९२ कोटी रुपये रक्कम असल्याचा कोल्हापुरातील रस्त्यांचा मूल्यांकन अहवाल शासनाला सादर केला आहे. पण, आय. आर. बी. कंपनीने २७३ कोटी रुपये मूल्यांकन होते आहे, असे सांगितले आहे. यामध्ये सुमारे ८० कोटींचा फरक आहे, तो कसा भरून काढावा, यावर तुम्ही सूचना कराव्यात असे विचारले. त्यावर सर्वांनी राज्य सरकार, महापालिका यांनी आय. आर. बी. कंपनीने पैसे कसे भागवायचे ते तुम्ही ठरवावे, जनतेवर कोणताही आर्थिक बोजा लादू नये, असे सांगितले.त्यानंतर प्रा. एन. डी. पाटील यांनी, टेंबलाईवाडी येथील महापालिकेची जागा आय. आर. बी.ला दिली व आय. आर. बी.नेही जागा त्यांचीच उपकंपनी असलेल्या आर्यन हॉस्पिटॅलिटीला ९९ वर्षांच्या भाडेकराराने ती दिली आहे. त्यामुळे या जागेची किंमत सुमारे १५ कोटी रुपये असल्याचे आय.आर.बी. सांगत आहे.