शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
3
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
5
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
6
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
7
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
8
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
9
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
10
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
11
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
12
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
13
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
14
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
15
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
16
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
17
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
18
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
19
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
20
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

कोल्हापूर : टोमॅटो दहा रुपयांना दीड किलो, वाढत्या उष्म्याने लिंबू तेजीत, भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:27 AM

वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फारसा चढउतार पाहावयास मिळत नाही.

ठळक मुद्देटोमॅटो दहा रुपयांना दीड किलो वाढत्या उष्म्याने लिंबू तेजीतभाजीपाल्याच्या दरात घसरण

कोल्हापूर : वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे.  बाजारात टोमॅटोंची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो, तर किरकोळ दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो मिळत आहे.

बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फारसा चढउतार पाहावयास मिळत नाही. गेले आठ दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस येत असला तरी वातावरणातील उष्मा काही कमी नाही. उष्मा रोज वाढतच जात असल्याने शीतपेयांची मागणी वाढली आहे.

विशेष करून सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या व शरीरास पोषक असणाऱ्या लिंबू सरबताला थोडी जादाच मागणी आहे. त्यामुळे लिंबंूची मागणी वाढली असून आठवड्यात दोन रुपयांवरून पाच रुपयांपर्यंत लिंबू पोहोचला आहे.

फळबाजारात संत्री, सफरचंद, द्राक्षे, चिक्कू, कलिंगडांची रेलचेल असून उठावही असल्याने दरात फारसा चढउतार दिसत नाही. कलिंगडांची आवक जास्त सुरू असून सरासरी दहा ते वीस रुपये नग असा दर आहे. द्राक्षे ५० रुपये किलो, तर चिक्कू २० पासून ५० रुपये किलोपर्यंत दर आहे.स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण सुरू आहे. किरकोळ बाजारात वांगी, ढबू २० रुपये किलो, तर गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, दोडका तीस रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

काकडीची आवकही वाढत आहे. परिणामी दरांत हळूहळू घसरण सुरू असून साधारणत: तीस ते चाळीस रुपये किलो दर आहे. मेथी, कोथिंबीर, पोकळा, पालकाची आवक स्थिर असल्याने दरात चढउतार दिसत नाही.पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गुळाला असणारी मागणी थोडी कमी झाली असून साखरेचे दर स्थिर राहिले आहेत. कडधान्य, डाळीचे दर स्थिर आहेत. कांदा-बटाट्याचे दर स्थिर असून लसणाच्या दरात मात्र थोडी घसरण झाली आहे.

हापूसची आवक वाढलीकोल्हापूर बाजार समितीत हापूस आंब्याची आवक वाढली असून रोज दीड हजार बॉक्स कोकणासह कर्नाटकातून येत आहेत. घाऊक बाजारात सरासरी ७५० रुपये बॉक्स, तर १८०० रुपये पेटीचा दर राहिला आहे.

टोमॅटो दहा रुपयांना दीड किलोटोमॅटोंची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो मिळत आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार