शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोल्हापूर : ‘आपले सरकार’साठी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 10:49 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत,नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका क्षेत्रात त्या-त्या लोकसंख्येनुसार रिक्त ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलैपर्यंत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्दे‘आपले सरकार’साठी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करा : जिल्हाधिकारीजबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळावर

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत,नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका क्षेत्रात त्या-त्या लोकसंख्येनुसार रिक्त ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलैपर्यंत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी केले.राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई-सेवा केंद्रे, सेतू सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडिंग करण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र  माहिती तंत्रज्ञान महामंडळावर सोपविण्यात आलेली आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक केंद्र स्थापन करण्यात येईल; मात्र ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) असलेल्या ग्रामपंचायतीत किमान २ केंद्रे स्थापन केली जातील. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद १०००० लोकसंख्येसाठी एक केंद्र व प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल.

५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत किमान २ केंद्रे स्थापन करण्यात येईल. सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर