शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी विकासाच्या दृष्टीने पाऊल पडावे : नानासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:25 IST

नवतंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी गुरुवारी येथे केले.

ठळक मुद्देजागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी विकासाच्या दृष्टीने पाऊल पडावे : नानासाहेब पाटीलशिवाजी विद्यापीठात वायसीएसआरडी आयोजित व्याख्यान

कोल्हापूर : लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांचा अपेक्षित विकास झालेला नाही. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या देशातील शासन व्यवस्थेकडून विकासाच्या दृष्टीने पाऊल पडणे आवश्यक आहे. शिक्षण, औद्योगिक, व्यापार, आदी क्षेत्रांमध्ये नवतंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे (वायसीएसआरडी) आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. वनस्पतिशास्त्र विभागाच्या निलांबरी सभागृहातील या व्याख्यानास ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार, अनिल पाटील प्रमुख उपस्थित होते. 

राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव पाटील म्हणाले, जागतिक पातळीवरील उद्योग-व्यापारासह विविध क्षेत्रांतील स्पर्धा वेगाने तीव्र होत आहे. त्यामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने भारताची फारशी चांगली तयारी नाही. नवसंशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करण्याबाबतची उदासीनता, लोकशाही प्रक्रियेमुळे निर्णय घेण्यास होणारा विलंब, विकासाच्या प्रकल्पांना अनेकदा विनाकारण होणारा विरोध, विकासाची दृष्टी नसलेले नेतृत्व अशा विविध कारणांमुळे आपला देश जागतिक स्पर्धेत मागे पडला आहे.

आपल्याकडे क्षमता असूनही अशा स्वरूपाची वेळ आपल्यावर आली आहे. ते चित्र बदलण्यासह जगाला एक भक्कम, शाश्वत पर्याय म्हणून देशाला उभे करायचे असल्यास विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. उद्योग-व्यवसाय क्षेत्राने बदलते तंत्रज्ञान स्वीकारून कार्यान्वित झाले पाहिजे. मोठ्या उद्योगसमूहांनी आपल्या देशातच नवतंत्रज्ञान, संशोधन विकसित करण्यासाठी विद्यापीठांना दत्तक घेणे, संशोधन संस्था सुरू करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. ‘वायसीएसआरडी’चे सहायक संचालक गजानन साळुंखे यांनी स्वागत केले. चेतन गळगे यांनी आभार मानले.

कौशल्यविकासाला प्राधान्य हवेनव्या पिढीने रेडीमेड नोकरी मागणे बंद करावे. शासकीय नोकऱ्यांच्या उपलब्धतेच्या मर्यादा लक्षात घेता, कौशल्यविकासाला प्राधान्य द्यावे. बदलते तंत्रज्ञान, गरजांनुसार कौशल्य आत्मसात करावे. त्यातून ज्ञानासह आर्थिक गरजदेखील पूर्ण होईल, असे पाटील यांनी सांगितले.

चीन स्पर्धक म्हणून पाहत नाहीकोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करा; पण त्यातील उत्पादन आमच्या देशातच तयार करून निर्यात करा, हे धोरण स्वीकारून चीनने उद्योग, व्यापार क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे. विविध देशांत आपले साम्राज्य वाढविले आहे. ‘नवी ईस्ट इंडिया कंपनी’ म्हणून हा देश पुढे येत आहे. आपल्या देशापेक्षा चीन खूप पुढे आहे. चीन स्पर्धक म्हणून भारताकडे पाहत नाही. गुंतवणुकीबाबतचे चीनसारखे धोरण आपण स्वीकारणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर