शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’चे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:29 IST

कोल्हापूर : देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ इच्छिणाऱ्या नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’च्या माध्यमातून नक्की पाठबळ मिळेल. ...

कोल्हापूर : देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ इच्छिणाऱ्या नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’च्या माध्यमातून नक्की पाठबळ मिळेल. नवसंकल्पकांच्या सहभागातून कोल्हापूरचा विकास साधण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शुक्रवारी केले.

कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर आणि डी.वाय. पाटील ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’च्या ऑनलाइन उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आयआयटी कानपूरच्या इनोव्हेशन सेंटरचे डॉ. अमिताभ बंडोपाध्याय उपस्थित होते. कोणत्याही स्टार्टअपसाठी संकल्पना हेच खरे भांडवल असते. संकल्पना जर लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरली तर ती समाजाच्या विकासाठी पूरक ठरते. कोल्हापूरचा इतिहास पाहता, या शहराने जगाला खूप नव्या संकल्पना दिल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी पाठबळ मिळणार असल्याचे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. कोल्हापूर शहरातील स्थानिक प्रश्न सोडविताना येथील युवकांमध्ये संशोधन, उद्यमशीलता वाढविण्यासाठी स्टार्ट-अप आणि संशोधक यांना आवाहन करणे हा कोल्हापूर स्टार्टअप मिशनचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी शहरातील विविध नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, हवा गुणवत्ता व्यवस्थापन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, आदी विषयांवर नवसंकल्पकांनी उपाय सुचविणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. कोरोनानंतर डिजिटल शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम या नव्या गोष्टी पुढे आल्या आहेत. युवा पिढीला रोजगारक्षम बनविण्यासाठी स्टार्ट अपला पाठबळ देण्याचा माझा प्रयत्न राहील. या उपक्रमातून निवड होणाऱ्या स्टार्ट अपना लागणाऱ्या पायाभूत सुविधा डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येतील, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सुविधा देणे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना योग्य नियोजन करावे लागते. कोल्हापूर स्टार्ट अप मिशनसारख्या उपक्रमातून शहराच्या समस्यांसाठी आधुनिक तांत्रिक सहकार्य नक्की मिळेल, असे आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

नवउद्योजकांसाठी पाच टक्के रक्कम

कोल्हापुरात लवकरच आयटी पार्क सुरू होईल. देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कोल्हापुरातील युवा पिढीला आपल्या शहरातच संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकूण वार्षिक निधीच्या पाच टक्के रक्कम नवउद्योजकांना पाठबळ देण्यासाठी उपलब्ध करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.