शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

सहा जिल्ह्यांची सैन्य भरती ६ डिसेंबरपासून कोल्हापूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 16:28 IST

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्हे व गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी ६ते १६ डिसेंबर या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरतीच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मंगळवारी येथे केले.

ठळक मुद्देसहा जिल्ह्यांची सैन्य भरती ६ डिसेंबरपासून कोल्हापूरातशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : निवासी उपजिल्हाधिकारी

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्हे व गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी ६ते १६ डिसेंबर या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरतीच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरती मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी सैन्य भरती अधिकारी कर्नल अनुराग सक्सेना, डॉ.मेजर गौरव, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर,तहसिलदार गुरू बिराजदार,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे,पोलीस निरीक्षक औंदुबर पाटील, महापालिका आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी या भरतीमध्ये आतापर्यंत ३८ हजार तरुणांनी आॅनलाईन नोंदणी केली असून नोंदणीची २० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. सैन्य भरतीची प्रक्रीया सुरळीत, शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावी, यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून, त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, यामध्ये कसल्याही प्रकारे हयगय होणार नाही याची दक्षता घ्या, असा इशारा दिला.भरती मेळाव्याच्या ठिकाणी बॅरेकेटींग, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, स्वच्छता, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, शौचालये, भरती उमेदवारांसाठी अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था तसेच याप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यकतेनुसार एस. टी. तसेच के. एम. टीची बस सुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी केली. सैन्य भरतीसाठी येणाऱ्यांसाठी फुड पॅकेटस, बिस्किटे, शामियाना उभारणी, बॅरेकेटींग अशा आवश्यक व्यवस्थेसाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत करावी , असे आवाहन सुभाष सासने यांनी केले.

 

टॅग्स :Governmentसरकारcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर