शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोल्हापूर : शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारपेठेने घेतला मोकळा श्वास, दोन हजार वाहने रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:58 IST

कोल्हापूर येथील शहरात बाहेरून येणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांना दिवसभरात प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत तब्बल दोन हजार वाहने शहरात येण्यापासून रोखली गेली. नेहमी शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर झाल्याने या दोन्ही व्यापारपेठांनी अखेर मोकळा श्वास घेतला.

ठळक मुद्दे शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारपेठेने घेतला मोकळा श्वास, दोन हजार वाहने रोखली : ११ पॉर्इंटवर ८० पोलीस : शहरातील वाहतूक कोंडी दूर

कोल्हापूर : येथील शहरात बाहेरून येणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांना दिवसभरात प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत तब्बल दोन हजार वाहने शहरात येण्यापासून रोखली गेली. नेहमी शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर झाल्याने या दोन्ही व्यापारपेठांनी अखेर मोकळा श्वास घेतला.शहर वाहतूक शाखेने शहरात प्रवेश करणाऱ्या ११ पॉर्इंटवर ८० पोलीस कर्मचारी दिवसभर बंदोबस्तासाठी ठेवले आहेत. या मोहिमेचा फटका मात्र व्यापाऱ्यांना बसला असून, माल शहराबाहेर ट्रकमध्ये अडकल्याने आलेले ग्राहक सोडावे लागत आहेत.शहराअंतर्गत अवजड वाहतूक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी २४ डिसेंबरपासून सुरू झाली.

शहर वाहतूक शाखेकडून ७ जानेवारीपर्यंत वाहनधारकांचे प्रबोधन व पर्यायी मार्गाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अवजड वाहनांच्या बंदीमुळे नेहमी गजबलेल्या शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी अशा व्यापारी पेठांमध्ये नेहमीच्या तुलनेत कमी वाहनाची वर्दळ दिसत आहे.

शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीबाबत एका अभ्यास समितीने आठ दिवस सर्व्हे करून तयार केलेल्या अहवालामुळे शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारी पेठांमध्ये रोज येणारी अवजड वाहतूक हे कोंडीचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील धान्य तसेच अन्य व्यापाऱ्यांकडे मालवाहतूक करणाऱ्या वाहनासह अवजड वाहनांवर दिवसा शहरात बंदी करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला.

गेली तीन दिवस सहा अधिकारी व ७५ कर्मचारी दिवसभर काम करीत आहेत. सुमारे दोन हजार वाहनधारकांना शहरात येण्यापासून रोखण्यात आले. अशा वाहनांना वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी अथवा मार्केट यार्डमध्ये थांबवून ठेवले आहे.

हरकतीनंतर कायमची अंमलबजावणीशहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर ‘अवजड वाहतुकीला प्रवेश बंदी’चे माहिती फलक लावण्यात आले आहेत. एस.टी., के.एम.टी. व अत्यावश्­यक सेवांना यातून वगळण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांत लोकांच्या हरकती शहर वाहतूक शाखेत स्वीकारल्या जाणार आहेत. एकत्र बैठक घेऊन ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.अनिल गुजर ,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर