शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

कोल्हापूर : शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारपेठेने घेतला मोकळा श्वास, दोन हजार वाहने रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:58 IST

कोल्हापूर येथील शहरात बाहेरून येणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांना दिवसभरात प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत तब्बल दोन हजार वाहने शहरात येण्यापासून रोखली गेली. नेहमी शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर झाल्याने या दोन्ही व्यापारपेठांनी अखेर मोकळा श्वास घेतला.

ठळक मुद्दे शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारपेठेने घेतला मोकळा श्वास, दोन हजार वाहने रोखली : ११ पॉर्इंटवर ८० पोलीस : शहरातील वाहतूक कोंडी दूर

कोल्हापूर : येथील शहरात बाहेरून येणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांना दिवसभरात प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत तब्बल दोन हजार वाहने शहरात येण्यापासून रोखली गेली. नेहमी शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर झाल्याने या दोन्ही व्यापारपेठांनी अखेर मोकळा श्वास घेतला.शहर वाहतूक शाखेने शहरात प्रवेश करणाऱ्या ११ पॉर्इंटवर ८० पोलीस कर्मचारी दिवसभर बंदोबस्तासाठी ठेवले आहेत. या मोहिमेचा फटका मात्र व्यापाऱ्यांना बसला असून, माल शहराबाहेर ट्रकमध्ये अडकल्याने आलेले ग्राहक सोडावे लागत आहेत.शहराअंतर्गत अवजड वाहतूक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी २४ डिसेंबरपासून सुरू झाली.

शहर वाहतूक शाखेकडून ७ जानेवारीपर्यंत वाहनधारकांचे प्रबोधन व पर्यायी मार्गाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अवजड वाहनांच्या बंदीमुळे नेहमी गजबलेल्या शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी अशा व्यापारी पेठांमध्ये नेहमीच्या तुलनेत कमी वाहनाची वर्दळ दिसत आहे.

शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीबाबत एका अभ्यास समितीने आठ दिवस सर्व्हे करून तयार केलेल्या अहवालामुळे शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारी पेठांमध्ये रोज येणारी अवजड वाहतूक हे कोंडीचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील धान्य तसेच अन्य व्यापाऱ्यांकडे मालवाहतूक करणाऱ्या वाहनासह अवजड वाहनांवर दिवसा शहरात बंदी करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला.

गेली तीन दिवस सहा अधिकारी व ७५ कर्मचारी दिवसभर काम करीत आहेत. सुमारे दोन हजार वाहनधारकांना शहरात येण्यापासून रोखण्यात आले. अशा वाहनांना वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी अथवा मार्केट यार्डमध्ये थांबवून ठेवले आहे.

हरकतीनंतर कायमची अंमलबजावणीशहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर ‘अवजड वाहतुकीला प्रवेश बंदी’चे माहिती फलक लावण्यात आले आहेत. एस.टी., के.एम.टी. व अत्यावश्­यक सेवांना यातून वगळण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांत लोकांच्या हरकती शहर वाहतूक शाखेत स्वीकारल्या जाणार आहेत. एकत्र बैठक घेऊन ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.अनिल गुजर ,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर