शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

कोल्हापूर : शाहू छत्रपती यांना ‘डी. लिट.’, अरुणकुमार अगरवाल ‘डी. एस्सी.’ ने सन्मानित; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा सहावा दीक्षान्त समारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 16:28 IST

आम्ही तुमच्याकडे देशातील लोककल्याणाचे काम सोपवत आहोत. यात विशेष करुन आपण देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर, आपण बालकांची काळजी घेतली, तर तेच उद्या प्रौढ बनतील आणि पर्यायाने देशाची, येथील प्रत्येक जीवित व्यक्तीची काळजी घेतली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी शनिवारी येथे वैद्यकीय पदवीधरांना केले.

ठळक मुद्देदेशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या ; पी. चिदंबरम्शाहू छत्रपती यांना ‘डी. लिट.’, अरुणकुमार अगरवाल ‘डी. एस्सी.’ ने सन्मानितडी. वाय. पाटील विद्यापीठाचा सहावा दीक्षान्त समारंभ उत्साहात शानदार, उत्साही वातावरणात २३० स्नातकांना पदवी प्रदान

कोल्हापूर : आम्ही तुमच्याकडे देशातील लोककल्याणाचे काम सोपवत आहोत. यात विशेष करुन आपण देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर, आपण बालकांची काळजी घेतली, तर तेच उद्या प्रौढ बनतील आणि पर्यायाने देशाची, येथील प्रत्येक जीवित व्यक्तीची काळजी घेतली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी शनिवारी येथे वैद्यकीय पदवीधरांना केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, तर बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. बी. बेहेरे, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी कुलपती डॉ. भटकर यांच्या हस्ते शाहू छत्रपती यांना सन्मानदर्शक ‘डॉक्टर आॅफ लेटर्स’ (डी. लिट.), तर नवी दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. अरुणकुमार अगरवाल यांना सन्मानदर्शक ‘डॉक्टर आॅफ सायन्स’ (डी. एस्सी.) पदवीने गौरविण्यात आले. शानदार, उत्साही वातावरणातील या समारंभात २३० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.

माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् म्हणाले, लोकसंख्या तज्ज्ञाच्या मतानुसार २०४५ ते २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या स्थिर होईल. त्यावेळी एकूण लोकसंख्या १६० कोटीपर्यंत असेल तेव्हा यापुढे काय? असा प्रश्न आपणासमोर असेल. माझ्या मतानुसार स्थिर लोकसंख्या या ध्येयासोबत निरोगी लोकसंख्या असे ध्येय असावे.

यासाठी बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक मुलाची निरोगी वाढ झाली पाहिजे. ते निरोगी प्रौढ बनावे. या प्रौढ व्यक्तीने शिक्षण घेतले पाहिजे. त्याने कौशल्य, गरजेतून स्वत:ला उत्पादक बनवून लोकांच्या उपयोगाला आले पाहिजे.

कुलपती डॉ. भटकर म्हणाले, शैक्षणिक, संशोधन आणि आरोग्य सेवेतील विद्यापीठाची कामगिरी, वाटचाल ही अभिमानास्पद आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहे. आरोग्यपूर्ण समाज घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

या दीक्षान्त समारंभाच्या प्रारंभी परीक्षा नियंत्रक डॉ. ए. सी. पवार हे ‘ज्ञानदंड’ घेऊन प्रमुख पाहुणे, अधिष्ठातांसह दीक्षान्त मंडपात आले. या कार्यक्रमास याज्ञसेनीराणी साहेब, शांतादेवी डी. पाटील, खासदार संभाजीराजे, महापौर स्वाती यवलुजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुलगुरू डॉ. पी. बी. बेहेरे यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. रचना पावसकर व चैतन्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरd y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठ