शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाहू छत्रपती यांना ‘डी. लिट.’, अरुणकुमार अगरवाल ‘डी. एस्सी.’ ने सन्मानित; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा सहावा दीक्षान्त समारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 16:28 IST

आम्ही तुमच्याकडे देशातील लोककल्याणाचे काम सोपवत आहोत. यात विशेष करुन आपण देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर, आपण बालकांची काळजी घेतली, तर तेच उद्या प्रौढ बनतील आणि पर्यायाने देशाची, येथील प्रत्येक जीवित व्यक्तीची काळजी घेतली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी शनिवारी येथे वैद्यकीय पदवीधरांना केले.

ठळक मुद्देदेशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या ; पी. चिदंबरम्शाहू छत्रपती यांना ‘डी. लिट.’, अरुणकुमार अगरवाल ‘डी. एस्सी.’ ने सन्मानितडी. वाय. पाटील विद्यापीठाचा सहावा दीक्षान्त समारंभ उत्साहात शानदार, उत्साही वातावरणात २३० स्नातकांना पदवी प्रदान

कोल्हापूर : आम्ही तुमच्याकडे देशातील लोककल्याणाचे काम सोपवत आहोत. यात विशेष करुन आपण देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर, आपण बालकांची काळजी घेतली, तर तेच उद्या प्रौढ बनतील आणि पर्यायाने देशाची, येथील प्रत्येक जीवित व्यक्तीची काळजी घेतली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी शनिवारी येथे वैद्यकीय पदवीधरांना केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, तर बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. बी. बेहेरे, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी कुलपती डॉ. भटकर यांच्या हस्ते शाहू छत्रपती यांना सन्मानदर्शक ‘डॉक्टर आॅफ लेटर्स’ (डी. लिट.), तर नवी दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. अरुणकुमार अगरवाल यांना सन्मानदर्शक ‘डॉक्टर आॅफ सायन्स’ (डी. एस्सी.) पदवीने गौरविण्यात आले. शानदार, उत्साही वातावरणातील या समारंभात २३० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.

माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् म्हणाले, लोकसंख्या तज्ज्ञाच्या मतानुसार २०४५ ते २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या स्थिर होईल. त्यावेळी एकूण लोकसंख्या १६० कोटीपर्यंत असेल तेव्हा यापुढे काय? असा प्रश्न आपणासमोर असेल. माझ्या मतानुसार स्थिर लोकसंख्या या ध्येयासोबत निरोगी लोकसंख्या असे ध्येय असावे.

यासाठी बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक मुलाची निरोगी वाढ झाली पाहिजे. ते निरोगी प्रौढ बनावे. या प्रौढ व्यक्तीने शिक्षण घेतले पाहिजे. त्याने कौशल्य, गरजेतून स्वत:ला उत्पादक बनवून लोकांच्या उपयोगाला आले पाहिजे.

कुलपती डॉ. भटकर म्हणाले, शैक्षणिक, संशोधन आणि आरोग्य सेवेतील विद्यापीठाची कामगिरी, वाटचाल ही अभिमानास्पद आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहे. आरोग्यपूर्ण समाज घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

या दीक्षान्त समारंभाच्या प्रारंभी परीक्षा नियंत्रक डॉ. ए. सी. पवार हे ‘ज्ञानदंड’ घेऊन प्रमुख पाहुणे, अधिष्ठातांसह दीक्षान्त मंडपात आले. या कार्यक्रमास याज्ञसेनीराणी साहेब, शांतादेवी डी. पाटील, खासदार संभाजीराजे, महापौर स्वाती यवलुजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुलगुरू डॉ. पी. बी. बेहेरे यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. रचना पावसकर व चैतन्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरd y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठ