शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रस्ते नागरी वस्तीतून नको, गायरानमधून न्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 10:38 IST

कोल्हापूर : प्रादेशिक योजनेतील रेखांकन व नियमावलीत राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी कोल्हापुरात राजारामपुरीतील नगररचना विभागात गुरुवारपासून चारसदस्यीय समितीसमोर फेरसुनावणीला प्रारंभ झाला आहे. सलग तीन दिवसांत करवीर तालुक्यातील नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी होत आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी मोरेवाडी, पाचगाव, टोप-संभापूर, गोकुळ शिरगाव, कणेरी, वसगडे या गावांची सुनावणी घेतली. बहुतांश ग्रामस्थांची नागरी वस्तीतील ...

ठळक मुद्दे करवीर तालुक्यातील हरकतींवर तीन दिवस सुनावणीप्रादेशिक आराखड्याची फेरसुनावणी : हरकतदारांच्या तक्रारी;

कोल्हापूर : प्रादेशिक योजनेतील रेखांकन व नियमावलीत राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी कोल्हापुरात राजारामपुरीतील नगररचना विभागात गुरुवारपासून चारसदस्यीय समितीसमोर फेरसुनावणीला प्रारंभ झाला आहे. सलग तीन दिवसांत करवीर तालुक्यातील नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी होत आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी मोरेवाडी, पाचगाव, टोप-संभापूर, गोकुळ शिरगाव, कणेरी, वसगडे या गावांची सुनावणी घेतली. बहुतांश ग्रामस्थांची नागरी वस्तीतील प्रस्तावित रस्त्याबाबत हरकती घेतल्याचे दिसून आले.

जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्याबाबत जिल्ह्यातून सुमारे दहा हजार तक्रारी दाखल झाल्या होत्या. गेल्या वर्षी याबाबत नागरिक व संस्थांच्या हरकतींवर सुनावणी झाली. तरीही सुमारे २००० तक्रारदारांचे निराकरण झाले नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन हरकतदारांचे समाधान करणार असल्याचे आश्वासन एका हरकतदारांच्या शिष्ठमंडळाला दिले होते. त्यामुळे पहिल्या सुनावणीवेळी ज्यांचे समाधान झाले नाही, त्यांच्या हरकतीवर फेरसुनावणीचे नियोजन केले. या फेरसुनावणी नगररचना विभागाचे उपसंचालक शिवराज पाटील, निवृत्त उपसंचालक वाय. एस. कुलकर्णी, नगररचनाकार मिलिंद किणेकर, सहायक नगररचनाकार संजय चव्हाण यांच्यासमोर सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात गुरुवारपासून शनिवारपर्यंत तीन दिवस करवीर तालुक्यातील फेरसुनावणी सुरू केली आहे. प्रत्येक दिवशी किमान १५० हरकतीवर सुनावणी घेण्यात येत आहे. जिल्ह्याचा ७० टक्के भाग हा बृहत् आराखड्यात समाविष्ट केला आहे; त्यामुळे या बृहत आराखड्यातील त्रुटी असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स या संस्थेकडूनही दाखविण्यात येणार आहेत.

दरम्यान, गुरुवारी पहिल्या दिवशी मोरेवाडी, पाचगाव, टोप, संभापूर, गोकुळ शिरगाव, कणेरी, वसगडे या गावांतील लेखी तक्रारी घेऊन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले; पण फेरसुनावणीवेळी लेखी हरकती घेतल्यानंतर त्यांची अनेक ग्रामस्थांनी पोहोच मागितली; पण ती देण्यास या समितीने नकार दिला. त्यावरून समिती आणि हरकतदार ग्रामस्थ यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवत होते.गुरुवारी झालेल्या तक्रारी ह्या गावातून जाणाºया प्रस्तावित रस्त्याबाबत आहेत. गावातून अनेक रस्ते सुरू आहेत. मग राजकीय लोकांनी अतिक्रमित केलेले रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याऐवजी खासगी जमिनींतून रस्ते निर्माण करण्याची उठाठेव कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून गावानजीक गायरान जमिनी असताना नागरी वस्तीतून अगर शेतीतून हे रस्ते करू नयेत, अशाही तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या.

तीन दिवस करवीर तालुका, त्यानंतर इतर तालुक्यांतील हरकती ऐकून घेण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व हरकतींवर फेरसुनावणी पूर्ण करून भौगोलिक संलग्नता पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा अहवालही शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.- शिवराज पाटील, उपसंचालक, नगररचना, प्रादेशिक योजना, कोल्हापूर. 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkolhapurकोल्हापूर