शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

भव्य वाहन रॅलीद्वारे कोल्हापूरकरांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST

कोल्हापूर: वीजबिल भरणार नाही म्हणजे नाहीच, भले आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आम्ही माफी घेणारच, रस्त्यावर उतरणारच, असा दृढनिश्चय ...

कोल्हापूर: वीजबिल भरणार नाही म्हणजे नाहीच, भले आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आम्ही माफी घेणारच, रस्त्यावर उतरणारच, असा दृढनिश्चय करत गुरुवारी कोल्हापूरकरांनी भव्य वाहन रॅलीद्वारे सरकारला वीजबील माफीचा निर्णय घ्या, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशारा दिला. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना हे निवेदन देण्यात आले. मोटरसायकल, रिक्षा, ट्रक, ट्रॅव्हल बस आदीसह निघालेल्या या मोर्चाने सकाळी १० ते दुपारी दीडपर्यंत अवघे शहर जाम केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

वीजबिल भरणार नाही, कृती समितीने गुरुवारी लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीजबील माफीसाठी वाहन रॅलीचे आयोजन केले होते. वीजबिल भरणार नाही, असे फलक वाहनांना लावून गांधी मैदानातून दहा वाजता रॅलीला सुरुवात झाली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार, पापाची तिकटी, महापालिका चौक, सीपीआर, दसरा चौक, बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज, बागल चौक, शाहू मिल चौक, सायबर, शाहू नाका, मध्यवर्ती बसस्थानक, स्टेशन रोड या प्रमुख मार्गांवरुन मार्गक्रमण करत ही रॅली दुपारी पावणे एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. वाहने पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांना निवेदन देऊन जनतेच्या भावना सरकारला कळवा, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलने होतील, असा इशारा दिला. दरम्यान, यावेळी पूर्वपरवानगी घेऊन मोर्चा काढला असताना आणि पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गानेच शांततेत माेर्चा काढला असतानाही प्रशासनाने मोर्चाला आडकाठी का आणली, यावरुन शिष्टमंडळाने जाब विचारत प्रशासनाचा निषेध नाेंदवला.

स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी हे बिनखांबी येथून रॅलीत सहभागी झाले व पापाची तिकटीनंतर निघूनही गेले. प्रताप होगाडे हेदेखील बैठकीकरिता दिल्लीला गेल्याने ते येऊ शकले नाहीत. प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीत निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भूयेकर, कृती समिती निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, जालंदर पाटील, बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, सुभाष जाधव यांनी केले. त्यांच्यासोबत मारुती पाटील, विजय करजगार, सुजीत चव्हाण, सुरेश जरग, प्रकाश केसरकर, भाऊ घोगरे, सुनील कदम, सत्यजित कदम, राहुल चिकोडे हे सहभागी झाले होते.

चौकट ०१

रॅलीची भव्यता

पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघालेली ही रॅली शहरवासियांच्या कुतूहलाचा विषय ठरली. लॉरी ऑपरेटर, धान्य, वाळू वाहतूक, रिक्षा, ट्रॅव्हल बसेस असोसिएशनने यात सहभाग घेतल्याने रॅलीची भव्यता वाढली. रॅलीची सुरुवात आणि शेवट यात जवळपास पाच किलोमीटरचे अंतर होते, एवढी लांब वाहनांची रांग लागली होती.

चौकट ०२

पोलिसांचे काटेकोर नियोजन

जुना राजवाडा पोलीस ठाण्याने आंदोलकांबराेबरच मंगळवारीच बैठक घेऊन रॅलीचा मार्ग निश्चित केल्याने त्यानुसार वाहतुकीचे नियोजन केले होते. चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त आधीच तैनात होता. रॅलीचा मार्ग आधीच मोकळा करुन ठेवल्याने रॅली १० वाजता सुरु होऊनदेखील एक वाजण्याच्या आतच गांधी मैदान ते शाहू नाका ते मध्यवर्ती बसस्थानक असा प्रवास करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर संपली. पर्यायी व एकेरी मार्गाने वाहतूक वळविल्याने वाहतूकीची मोठी कोंडी टाळता आली.

चौकट ०३

कोल्हापूर हिसका दाखवू

वीजबिलाची माफी देऊन दिवाळी गोड करणार होता, त्याचे काय झाले, अशी विचारणा करत निवास साळोखे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्हाला जबाबदार धरु नका, मग किती नोटीस काढायच्या त्या काढा, जनआंदोलन उभे राहणारच आणि कोल्हापुरी हिसका दाखवणारच, असा इशारा साळोखे यांनी दिला.

(फोटो स्वतंत्र पाठवत आहे)