शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना दिलासा, चांगला निर्णय शिक्षणक्षेत्रातून स्वागत; आधारकार्डबाबतचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 11:04 IST

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना दिलासादायक, चांगला निर्णय, योग्य निर्णय, अशा शब्दांत कोल्हापुरातील शिक्षण क्षेत्रातील घटकांनी शाळा, महाविद्यालयांतील प्रवेशासाठीच्या आधारकार्डबाबतच्या निर्णया चे स्वागत बुधवारी केले.केंद्र सरकारने कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य केले होते; मात्र, नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च ...

ठळक मुद्देकेंद्र सरकारने कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य केले होतेकोल्हापुरातील शिक्षणक्षेत्रातील विविध घटकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याशिक्षणक्षेत्राच्यादृष्टीने विचार करता आधारकार्डच्या सक्तीचा फारसा परिणाम होत नव्हता.

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना दिलासादायक, चांगला निर्णय, योग्य निर्णय, अशा शब्दांत कोल्हापुरातील शिक्षण क्षेत्रातील घटकांनी शाळा, महाविद्यालयांतील प्रवेशासाठीच्या आधारकार्डबाबतच्या निर्णयाचे स्वागत बुधवारी केले.

केंद्र सरकारने कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य केले होते; मात्र, नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात शाळा, महाविद्यालयातील प्रवेशासाठी आधारकार्ड आवश्यक नसल्याचे भाष्य केले आहे.

याबाबत कोल्हापुरातील शिक्षणक्षेत्रातील विविध घटकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर म्हणाले, शाळा आणि महाविद्यालयांतील प्रवेशासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना काहीसा त्रासदायक ठरणार होता. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय शिक्षणातील समावेशक धोरणाच्या दृष्टीने चांगला आहे. विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर म्हणाले, शिक्षणक्षेत्राच्यादृष्टीने विचार करता आधारकार्डच्या सक्तीचा फारसा परिणाम होत नव्हता.

शाळा, महाविद्यालयांतील प्रवेशाच्या अनुषंगाने आता झालेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरणारा आहे. माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक म्हणाले, आधारकार्ड नसलेल्या शालेय विद्यार्थ्यांना प्रवेशासह शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी त्रास व्हायचा. आता आधारकार्डबाबत योग्य निर्णय झाला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष ऋतुराज माने म्हणाले, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे करणे योग्य नव्हते, त्याऐवजी एक पर्याय म्हणून ते ठेवायला हवे होते.

सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय योग्य आहे. राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे विभागीय उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, आधारकार्डच्या सक्तीमुळे शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी अडचण निर्माण होत होती. आधारक्रमांक असल्याशिवाय प्रवेश हस्तांतरित होत नव्हता, अशा स्वरूपातील सक्ती विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरणार होती. प्रवेशासाठी आता ‘आधार’ आवश्यक नसल्याने विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार आहे. केंद्र सरकारने ‘आधार’ची सक्ती करण्याऐवजी शाळांना मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर देणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डkolhapurकोल्हापूर