शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कोल्हापूर, रत्नागिरीचे वर्चस्व कायम

By admin | Updated: March 9, 2015 23:52 IST

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : ‘अ’गटात अमरावतीकडून सिंधुदुर्ग पराभूत

पुरळ : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या यजमानपदाखाली जामसंडे सन्मित्र मंडळाच्यावतीने सुरु असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी यांनी पुरुष गटातील कबड्डी संघात तर कोल्हापूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर या संघांनी महिला गटात आगेकूच केली.जामसंडे येथील विद्याविकास शाळेच्या पटांगणावर सुरु असलेल्या पुरुषांच्या कबड्डी सामन्यात ‘अ’ गटात मुंबई उपनगरने नंदूरबारचा ४०-१२ असा धुव्वा उडवला. शैलेश गारळे, योगेश सावंत यांच्या चढाया, त्याला मिळालेली अमर निकाते, सुदेश कुळे यांच्या पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. ‘ड’ गटात रत्नागिरीने यजमान सिंधुदुर्गला ४०-१७ असे नमविले. मध्यंतराला १७-५ अशी आघाडी घेऊन रत्नागिरीने आपला इरादा स्पष्ट केला होता. भूषण कुळकर्णी, सतीश खांबे यांचा खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. सिंधुदुर्गकडून अनिकेत पारकरची झुंज अपयशी ठरली. याच गटात मुंबई शहरने नागपूरला २२-१० असे पराभूत केले. मध्यंतरापर्यंत अत्यंत चुरशीने चाललेल्या या सामन्यात मुंबईने ८-५ अशी आघाडी घेतली होती. नंतर मात्र जोरदार खेळ करत सामना १२ गुणांनी खिशात टाकला. श्रीभारती यांचा अष्टपैलू खेळ त्याला संकेत सावंतची चढाईची व नितीन विचारेची पकडीची साथ यामुळे मुंबईने हा विजय साकारला. ‘ब’ गटात रायगडने चंद्रपूरचा २६-१४ असा पाडाव केला. मध्यंतरापर्यंत १४-१० अशी रायगडकडे आघाडी होती. राजन तांडेल, अनिकेत पाटील यांच्या चढाया तर अनिकेत कोटेकर याच्या पकडी रायगडच्या विजयात महत्वाच्या ठरल्या. चंद्रपूरच्या निलेश माळवीने एका चढाईत तीन गडी टिपत सामन्यात चुरस आणली. परंतु त्याची ही लढत एकाकी ठरली. महिलांच्या ‘ब’ गटात यवतमाळने औरंगाबादला ३८-१० असे पराभूत केले. सुरुवातीच्या पाच मिनिटांमध्ये यवतमाळने औरंगाबादवर लोन देत मध्यंतरापर्यंत २२-४ अशी आघाडी घेतली होती. यवतमाळकडून अनिता विश्वकर्माने अष्टपैलू खेळ केला. तिने कोपरारक्षक म्हणून छान चवडे काढले. तिला दिव्या शर्माने पकडीत छान साथ दिली. ‘क’ गटात कोल्हापूरने अरुणा सावंत, सारीका हिरकोळी, पूजा पाटील यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर वर्ध्याला २३-१५ असे पराभूत केले. वर्ध्याकडून दर्शना वानखेडे, शाहीन सय्यद यांनी छान खेळ केला. ‘अ’ गटात अमरावतीने यजमान सिंधुदुर्गला २२-२० असे नमविले खरे परंतु त्यांना पूर्ण डाव कडवी झुंज द्यावी लागली. मध्यंतराला एका गुणाची आघाडी सिंधुदुर्गकडे होती. परंतु अनुभवी स्वप्ना साखळकरने सामन्यावर नियंत्रण राखत संघाला विजय मिळवून दिला. तिला पूजा पांडेने छान साथ दिली. सिंधुदुर्गच्या स्नेहा टिळवे, मेहराज सय्यद यांची कडवी लढत एकाकी ठरली. (वार्ताहर)या स्पर्धेत शासनाच्यावतीने उत्कृष्ट खेळाडूसाठी पारितोषिक नसल्याने ठाणे जिल्हा कबड्डीचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई व पकडीकरीता दोन्ही गटांना प्रत्येकी ५ हजार रुपये पारितोषिक जाहीर केले.