शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कोल्हापूर : ‘आरबीआय’च्या धोरणाविरोधात उठाव करा: विद्याधर अनास्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 14:25 IST

कोल्हापूर : ‘आरबीआय’चे धोरण हे सहकाराला मारक आहे; त्यामुळे सहकारातील लोकांनी याविरोधात उठाव करावा, असा सल्ला राज्य सहकारी बॅँकेचे ...

ठळक मुद्दे ‘आरबीआय’च्या धोरणाविरोधात उठाव करा: विद्याधर अनास्कर‘कर्नाडस बॅँकिंग’तर्फे सहकार बॅँकिंग परिषद

कोल्हापूर : ‘आरबीआय’चे धोरण हे सहकाराला मारक आहे; त्यामुळे सहकारातील लोकांनी याविरोधात उठाव करावा, असा सल्ला राज्य सहकारी बॅँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी रविवारी येथे दिला. सहकारी बॅँकांनी आपल्यातील न्यूनगंड बाजूला ठेवून एकीची भावना बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे कर्नाडस बॅँकिंग रिसर्च अ‍ॅँड डेव्हलपमेंट फौंडेशनतर्फे आयोजित सहकारी बॅँकिंग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रमुख उपस्थिती राज्य सहकारी बॅँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, माजी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय ककडे, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अशोकराव सौंदत्तीकर, फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, माधवी कर्नाड, आदींची होती. यावेळी अनास्कर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने परिषदेचे उदघाटन झाले.अनास्कर म्हणाले, ‘आरबीआय’चे धोरण हे सहकाराला पोषक नसून ते मारक आहे. त्यामुळे याविरोधात आवाज उठवून आंदोलन करण्याची तयारी सहकारी बॅँकांनी केली पाहिजे.

बॅँकिंग हे खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांना समजेल अशा भाषेत असले पाहिजे. परंतु ‘आरबीआय’च्या लोकांना खरोखरच बॅँकिंग येतेय का असा प्रश्न पडतो.सहकारी बॅँकांच्या सक्षमीकरणासाठी संचालकांनी आपापसांतील मतभेद चार भिंतींच्या आत ठेवावेत, निवडणुकीत एकमेकांवर आरोप करताना बॅँकेला लक्ष्य करू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता माझी संस्था चांगली आहे याची शपथ संचालकांनी घेतली पाहिजे, असा सल्लाही अनास्कर यांनी यावेळी दिला.विजय ककडे म्हणाले, सहकाराने नेहमीच दुसºयांना मदतीची भूमिका घेतली आहे. परंतु चांगल्याचे कौतुक होत नाही. त्यामुळे सहकार आता दोलायमन स्थितीत असल्याचे दिसत आहे.ओऊळकर म्हणाले, ‘आरबीआय’ची धोरणे ही सहकाराविरोधात आहेत. परंतु आता सतीश मराठे यांच्या रूपाने ‘आरबीआय’मध्ये सहकाराची बाजू मांडणारा मराठी माणूस गेल्याने सहकाराविषयक गैरसमज नक्कीच दूर होण्यास मदत होईल.

‘एनपीए’चे निकष बदलावेत‘एनपीए’चे निकष येण्यापूर्वी कुठली बॅँक बुडली होती काय? असा प्रश्न उपस्थित करत आपल्या सोयीनुसार ‘आरबीआय’कडून त्याची अंमलबजावणी झाली असून खरोखरच त्याचा अभ्यास झाला काय हे पाहण्याची गरज आहे. त्यामुळे आता ‘एनपीए’चे निकष बदलण्याची गरज असल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

वार्षिक सभेत संचालक आरोपीच्या पिंजऱ्यांतसहकारातील वार्षिक सभा म्हणजे संचालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे असाच आहे. तसेच हे संचालकही वर्षातील दोन तास सभेसाठी देऊन ती कशी हाताळायची या अविर्भावात असतात. ‘गोकुळ’ची सभा काही मिनिटात गुंडाळल्याने पुन्हा हेच घडल्याचे अनास्कर यांनी सागिंतले.

 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर