शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पण धोका कायम, स्थलांतरास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 18:05 IST

कोल्हापूर जिल्हा आणि शहराचा पुराचा धोका कायम असून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे पाणी कोल्हापूर शहर आणि गावांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला होता.

ठळक मुद्देकोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पण धोका कायमकोल्हापूर, हातकणंगलेत स्थलांतरास सुरुवात

कोल्हापूर : जिल्हा आणि शहराचा पुराचा धोका कायम असून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे पाणी कोल्हापूर शहर आणि गावांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला होता.

सकाळी आणि संध्याकाळी ऊनही पडले होते. मात्र धरणक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार असल्याने पुन्हा पाण्याची पातळी वाढतच जाणार आहे.मंगळवारी (दि. १७) रात्रीपर्यंत शहर आणि जिल्ह्यात संततधार सुरू होती. मात्र बुधवारी सकाळी आठवड्यातून पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. संध्याकाळीही शहरात ऊन पडले होते; परंतु तरीही पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरूनच वाहत असल्याने अजूनही धोका संपलेला नाही.

जिल्ह्यातील ८४ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गगनबावड्याजवळही रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरून कोकणात जाणारी वाहतूक थंडावली आहे.जिल्ह्यातील १0 राज्यमार्ग, २४ प्रमुख जिल्हा मार्ग, १२ ग्रामीण मार्ग, १६ इतर जिल्हा मार्ग पाण्यामुळे बंद असून, त्याचा फटका एस.टी.सह खासगी वाहतुकीलाही बसला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने हातकणंगले तालुक्यातील कृष्णाकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

पुराचे पाणी गावांत शिरल्याने हातकणंगले तालुक्यातील रुई, इंगळी, कुरुंदवाड येथील २५ कुटुंबांतील ८८ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातही पंचगंगेचे पाणी घुसल्याने सुतारवाड्यातील १७ कुटुंबे सुरक्षित स्थळी हलविण्यात आली असून, मुस्लिम बोर्डिंग आणि चित्रदुर्ग मठामध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुराचा धोका वाढण्याची शक्यताएकीकडे कोयना धरणातून पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील गावांना हा धोका निर्माण झाला आहे; तर दुसरीकडे, दोन दिवसांत कोल्हापुरात ९४ टक्के भरलेल्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातील.

परिणामी पंचगंगेच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या जयंती नाल्याचे पाणी नदीत जाऊ शकत नसल्याने हेच पाणी काठावर इतरत्र पसरून शहरातील सखल भागांत आणि नाल्याच्या काठच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होणार आहे.

प्रशासन सज्जया परिस्थितीमुळे प्रशासनदेखील सज्ज झाले असून, महापालिकेने आणि प्रशासनाने २४ तास आपली पथके तैनात केली आहेत. रत्नागिरीकडे जाणारा शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तेथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर