शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

कोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पण धोका कायम, स्थलांतरास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 18:05 IST

कोल्हापूर जिल्हा आणि शहराचा पुराचा धोका कायम असून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे पाणी कोल्हापूर शहर आणि गावांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला होता.

ठळक मुद्देकोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पण धोका कायमकोल्हापूर, हातकणंगलेत स्थलांतरास सुरुवात

कोल्हापूर : जिल्हा आणि शहराचा पुराचा धोका कायम असून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे पाणी कोल्हापूर शहर आणि गावांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला होता.

सकाळी आणि संध्याकाळी ऊनही पडले होते. मात्र धरणक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार असल्याने पुन्हा पाण्याची पातळी वाढतच जाणार आहे.मंगळवारी (दि. १७) रात्रीपर्यंत शहर आणि जिल्ह्यात संततधार सुरू होती. मात्र बुधवारी सकाळी आठवड्यातून पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. संध्याकाळीही शहरात ऊन पडले होते; परंतु तरीही पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरूनच वाहत असल्याने अजूनही धोका संपलेला नाही.

जिल्ह्यातील ८४ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गगनबावड्याजवळही रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरून कोकणात जाणारी वाहतूक थंडावली आहे.जिल्ह्यातील १0 राज्यमार्ग, २४ प्रमुख जिल्हा मार्ग, १२ ग्रामीण मार्ग, १६ इतर जिल्हा मार्ग पाण्यामुळे बंद असून, त्याचा फटका एस.टी.सह खासगी वाहतुकीलाही बसला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने हातकणंगले तालुक्यातील कृष्णाकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

पुराचे पाणी गावांत शिरल्याने हातकणंगले तालुक्यातील रुई, इंगळी, कुरुंदवाड येथील २५ कुटुंबांतील ८८ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातही पंचगंगेचे पाणी घुसल्याने सुतारवाड्यातील १७ कुटुंबे सुरक्षित स्थळी हलविण्यात आली असून, मुस्लिम बोर्डिंग आणि चित्रदुर्ग मठामध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुराचा धोका वाढण्याची शक्यताएकीकडे कोयना धरणातून पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील गावांना हा धोका निर्माण झाला आहे; तर दुसरीकडे, दोन दिवसांत कोल्हापुरात ९४ टक्के भरलेल्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातील.

परिणामी पंचगंगेच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या जयंती नाल्याचे पाणी नदीत जाऊ शकत नसल्याने हेच पाणी काठावर इतरत्र पसरून शहरातील सखल भागांत आणि नाल्याच्या काठच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होणार आहे.

प्रशासन सज्जया परिस्थितीमुळे प्रशासनदेखील सज्ज झाले असून, महापालिकेने आणि प्रशासनाने २४ तास आपली पथके तैनात केली आहेत. रत्नागिरीकडे जाणारा शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तेथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर