शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

कोल्हापूर :  कूळहक्काचा वाद तब्बल ४६ वर्षांनी तडजोडीने मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:56 IST

नाटोली (ता. शिराळा, जि. सांगली) येथील कूळहक्काच्या दोन हेक्टर जमिनीचा तब्बल ४६ वर्षे सुरू असलेला दावा कोल्हापुरात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणासमोर तडजोडीने मिटला. न्यायाधिकरणाचे सदस्य एम. एम. पोतदार यांच्यासमोर हा निर्णय झाला. त्यानंतर ही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे कूळहक्काचा वाद तब्बल ४६ वर्षांनी तडजोडीने मिटला महसूल न्यायाधिकरणासमोर निर्णय

कोल्हापूर : नाटोली (ता. शिराळा, जि. सांगली) येथील कूळहक्काच्या दोन हेक्टर जमिनीचा तब्बल ४६ वर्षे सुरू असलेला दावा कोल्हापुरात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणासमोर तडजोडीने मिटला. न्यायाधिकरणाचे सदस्य एम. एम. पोतदार यांच्यासमोर हा निर्णय झाला. त्यानंतर ही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.नाटोली येथील शिवाजी एकनाथ कुलकर्णी यांची दोन हेक्टर जमीन ही चेंदू राऊ कुरणे हे कसत आहेत. कुरणे व कुलकर्णी या दोघांमध्ये १९७२ पासून या कूळहक्काच्या जमिनीसंदर्भात महसूल न्यायाधिकरणात दावा सुरू आहे.

या जमिनीच्या किमतीहून अधिक खर्च या दाव्याच्या माध्यमातून झाला, असे म्हणणे चुकीचे होणार नाही; कारण सुरुवातीला कुरणे यांच्यासोबत ५० अर्जदार झाले; तर दुसऱ्या बाजूला शिवाजी कुलकर्णी यांच्यासोबत पाच अर्जदार समाविष्ट झाले.

एकूण ५६ अर्जदारांचे हे प्रकरण अद्याप मिटले नव्हते; परंतु न्यायाधिकरणाचे सचिव पोतदार यांच्यासमोर मंगळवारी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होऊन हा विषय तडजोडीने संपला.

यामध्ये १ लाख ८ हजार ६२० रुपये हे मूळ मालकांना कूळ असलेल्या कुरणे यांनी दिले. त्यामुळे बरीच वर्षे ताणलेला हा दावा चांगल्या प्रकारे संपल्याचा नि:श्वास पोतदार यांनी व्यक्त केला.अशा प्रकारे कूळहक्काचे वाद हे अहंकाराचे व प्रतिष्ठेचे न करता लोकांनी सामंजस्याने सोडविल्यास वेळ, पैसा व मानसिक त्रास वाचेल, असे पोतदार यांनी सांगितले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.

वर्षभरात १२० प्रकरणे निकालीमहसूल न्यायाधिकरण हे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी आहे. या प्राधिकरणाकडे सुमारे १५०० प्रकरणे दाखल असून, त्यांपैकी वर्षभरात १२० प्रकरणे निकाली निघाली आहेत, असे पोतदार यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर