शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  कूळहक्काचा वाद तब्बल ४६ वर्षांनी तडजोडीने मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:56 IST

नाटोली (ता. शिराळा, जि. सांगली) येथील कूळहक्काच्या दोन हेक्टर जमिनीचा तब्बल ४६ वर्षे सुरू असलेला दावा कोल्हापुरात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणासमोर तडजोडीने मिटला. न्यायाधिकरणाचे सदस्य एम. एम. पोतदार यांच्यासमोर हा निर्णय झाला. त्यानंतर ही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे कूळहक्काचा वाद तब्बल ४६ वर्षांनी तडजोडीने मिटला महसूल न्यायाधिकरणासमोर निर्णय

कोल्हापूर : नाटोली (ता. शिराळा, जि. सांगली) येथील कूळहक्काच्या दोन हेक्टर जमिनीचा तब्बल ४६ वर्षे सुरू असलेला दावा कोल्हापुरात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणासमोर तडजोडीने मिटला. न्यायाधिकरणाचे सदस्य एम. एम. पोतदार यांच्यासमोर हा निर्णय झाला. त्यानंतर ही माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.नाटोली येथील शिवाजी एकनाथ कुलकर्णी यांची दोन हेक्टर जमीन ही चेंदू राऊ कुरणे हे कसत आहेत. कुरणे व कुलकर्णी या दोघांमध्ये १९७२ पासून या कूळहक्काच्या जमिनीसंदर्भात महसूल न्यायाधिकरणात दावा सुरू आहे.

या जमिनीच्या किमतीहून अधिक खर्च या दाव्याच्या माध्यमातून झाला, असे म्हणणे चुकीचे होणार नाही; कारण सुरुवातीला कुरणे यांच्यासोबत ५० अर्जदार झाले; तर दुसऱ्या बाजूला शिवाजी कुलकर्णी यांच्यासोबत पाच अर्जदार समाविष्ट झाले.

एकूण ५६ अर्जदारांचे हे प्रकरण अद्याप मिटले नव्हते; परंतु न्यायाधिकरणाचे सचिव पोतदार यांच्यासमोर मंगळवारी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होऊन हा विषय तडजोडीने संपला.

यामध्ये १ लाख ८ हजार ६२० रुपये हे मूळ मालकांना कूळ असलेल्या कुरणे यांनी दिले. त्यामुळे बरीच वर्षे ताणलेला हा दावा चांगल्या प्रकारे संपल्याचा नि:श्वास पोतदार यांनी व्यक्त केला.अशा प्रकारे कूळहक्काचे वाद हे अहंकाराचे व प्रतिष्ठेचे न करता लोकांनी सामंजस्याने सोडविल्यास वेळ, पैसा व मानसिक त्रास वाचेल, असे पोतदार यांनी सांगितले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.

वर्षभरात १२० प्रकरणे निकालीमहसूल न्यायाधिकरण हे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी आहे. या प्राधिकरणाकडे सुमारे १५०० प्रकरणे दाखल असून, त्यांपैकी वर्षभरात १२० प्रकरणे निकाली निघाली आहेत, असे पोतदार यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर