शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर : शेतीपंपांना मोफत नको माफक वीज द्या, तेलंगणाच्या निर्णयावर शेतकऱ्यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 18:07 IST

तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करणारे पंजाब, कर्नाटकनंतरचे राज्य सरकार ठरले आहे. महाराष्ट्रातील पिकाखालील क्षेत्र, उपलब्ध सिंचन व्यवस्था पाहता मोफत वीज देणे सरकारला परवडणारे नाही, याची जाणीव येथील शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळे शेतीपंपांना मोफत नको पण माफक दरात वीज द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

ठळक मुद्देसन २००४ ला अकरा महिन्यांतच घेतला निर्णय मागेशेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेशनसह सर्वच संघटनांची मागणी शेती उत्पादनांना मिळणाऱ्या अनिश्चित दरामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत

कोल्हापूर : तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करणारे पंजाब, कर्नाटकनंतरचे राज्य सरकार ठरले आहे. महाराष्ट्रातील पिकाखालील क्षेत्र, उपलब्ध सिंचन व्यवस्था पाहता मोफत वीज देणे सरकारला परवडणारे नाही, याची जाणीव येथील शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळे शेतीपंपांना मोफत नको पण माफक दरात वीज द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.शेती उत्पादनांना मिळणाऱ्या अनिश्चित दरामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आला आहे. एका हंगामात दर चांगला मिळाले की दुसऱ्या हंगामात हा भाव राहील याची खात्री नसते. त्यामुळे बहुतांशी वेळा शेती उत्पादनासाठी गुंतविलेले पैसेही विक्रीतून पदरात पडत नाही.

ज्यावेळी उत्पादनखर्च कमी येईल, त्यावेळीच शेती किफायतशीर ठरू शकते. खते, पाणी व विजेचे दर माफक राहिले तरच किफायतशीर शेती ठरू शकते. शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेशनसह सर्वच संघटनांची ही मागणी आहे.निवडणुकीच्या तोंडावर सन २००४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर कसाबसा अकरा महिने राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा केला आणि त्यानंतर बंद केला. तेलंगणा राज्य सरकारने नववर्षाला शेतीपंपांना मोफत वीज देण्याची घोषणा केल्याने येथेही मोफत विजेची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात सुमारे ४१ लाख शेतीपंप कार्यान्वित आहेत. साधारणत: राज्याच्या एकूण वीजपुरवठ्यापैकी शेतीपंपांना सरासरी १६ टक्के म्हणजे १७ हजार दशलक्ष युनिट प्रति महिन्याला वीज लागते. कर्नाटकात २० एच.पी.पर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीजपुरवठा केला जातो. महाराष्ट्रातील सिंचनाची व्यवस्था बऱ्यापैकी असल्याने मोफत वीज देणे सरकारला अडचणीचे ठरणार आहे. शेतकऱ्यांनाही मोफत वीज नको आहे, केवळ माफक दरात व पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करावा, ही मागणी आहे.

या आहेत मागण्या 

  1. माफक दरात वीज द्या.
  2. वीज वितरण कंपनीच्या मनमानीला चाप लावा.
  3. दिवसाला दहा तास तोही दिवसा वीजपुरवठा करा.

 

आमच्या शेतकऱ्यांना फुकट वीज नको, पण त्याने वापरलेल्या युनिटप्रमाणे खरी बिले द्यावीत. ‘महावितरण’च्या मनमानीमुळे त्यांना वाटेल तशी आकारणी सुरू आहे.- प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ

 

उत्पादनखर्च कमी होण्यासाठी विजेचे दर कमी झालेच पाहिजेत. आम्हाला मोफत नको पण वीजपुरवठ्यातील अनियमितता संपली पाहिजे.- संपतराव पवार,सहसचिव, शेकाप 

 

टॅग्स :agricultureशेतीkolhapurकोल्हापूर