शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कोल्हापूर : शेतीपंपांना मोफत नको माफक वीज द्या, तेलंगणाच्या निर्णयावर शेतकऱ्यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 18:07 IST

तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करणारे पंजाब, कर्नाटकनंतरचे राज्य सरकार ठरले आहे. महाराष्ट्रातील पिकाखालील क्षेत्र, उपलब्ध सिंचन व्यवस्था पाहता मोफत वीज देणे सरकारला परवडणारे नाही, याची जाणीव येथील शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळे शेतीपंपांना मोफत नको पण माफक दरात वीज द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

ठळक मुद्देसन २००४ ला अकरा महिन्यांतच घेतला निर्णय मागेशेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेशनसह सर्वच संघटनांची मागणी शेती उत्पादनांना मिळणाऱ्या अनिश्चित दरामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत

कोल्हापूर : तेलंगणा राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करणारे पंजाब, कर्नाटकनंतरचे राज्य सरकार ठरले आहे. महाराष्ट्रातील पिकाखालील क्षेत्र, उपलब्ध सिंचन व्यवस्था पाहता मोफत वीज देणे सरकारला परवडणारे नाही, याची जाणीव येथील शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळे शेतीपंपांना मोफत नको पण माफक दरात वीज द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.शेती उत्पादनांना मिळणाऱ्या अनिश्चित दरामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आला आहे. एका हंगामात दर चांगला मिळाले की दुसऱ्या हंगामात हा भाव राहील याची खात्री नसते. त्यामुळे बहुतांशी वेळा शेती उत्पादनासाठी गुंतविलेले पैसेही विक्रीतून पदरात पडत नाही.

ज्यावेळी उत्पादनखर्च कमी येईल, त्यावेळीच शेती किफायतशीर ठरू शकते. खते, पाणी व विजेचे दर माफक राहिले तरच किफायतशीर शेती ठरू शकते. शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेशनसह सर्वच संघटनांची ही मागणी आहे.निवडणुकीच्या तोंडावर सन २००४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर कसाबसा अकरा महिने राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा केला आणि त्यानंतर बंद केला. तेलंगणा राज्य सरकारने नववर्षाला शेतीपंपांना मोफत वीज देण्याची घोषणा केल्याने येथेही मोफत विजेची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात सुमारे ४१ लाख शेतीपंप कार्यान्वित आहेत. साधारणत: राज्याच्या एकूण वीजपुरवठ्यापैकी शेतीपंपांना सरासरी १६ टक्के म्हणजे १७ हजार दशलक्ष युनिट प्रति महिन्याला वीज लागते. कर्नाटकात २० एच.पी.पर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीजपुरवठा केला जातो. महाराष्ट्रातील सिंचनाची व्यवस्था बऱ्यापैकी असल्याने मोफत वीज देणे सरकारला अडचणीचे ठरणार आहे. शेतकऱ्यांनाही मोफत वीज नको आहे, केवळ माफक दरात व पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करावा, ही मागणी आहे.

या आहेत मागण्या 

  1. माफक दरात वीज द्या.
  2. वीज वितरण कंपनीच्या मनमानीला चाप लावा.
  3. दिवसाला दहा तास तोही दिवसा वीजपुरवठा करा.

 

आमच्या शेतकऱ्यांना फुकट वीज नको, पण त्याने वापरलेल्या युनिटप्रमाणे खरी बिले द्यावीत. ‘महावितरण’च्या मनमानीमुळे त्यांना वाटेल तशी आकारणी सुरू आहे.- प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ

 

उत्पादनखर्च कमी होण्यासाठी विजेचे दर कमी झालेच पाहिजेत. आम्हाला मोफत नको पण वीजपुरवठ्यातील अनियमितता संपली पाहिजे.- संपतराव पवार,सहसचिव, शेकाप 

 

टॅग्स :agricultureशेतीkolhapurकोल्हापूर