शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : नवख्या आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

कोल्हापूर : वेगवान वाऱ्यामुळे सातत्याने तिरंगा फडकवणे अडचणीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 12:37 PM

ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पोलीस उद्यानातील तिरंगा ध्वज सातत्याने फडकवता येत नाही. या वाऱ्यामुळे तो फाटण्याची शक्यता असल्याने ध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतो, अशी माहिती केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देवेगवान वाऱ्यामुळे सातत्याने तिरंगा फडकवणे अडचणीचेकेएसबीपीची माहिती, ध्वजनियमाचे होते पालन

कोल्हापूर : ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पोलीस उद्यानातील तिरंगा ध्वज सातत्याने फडकवता येत नाही. या वाऱ्यामुळे तो फाटण्याची शक्यता असल्याने ध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतो, अशी माहिती केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी दिली आहे.पोलीस उद्यानामध्ये गतवर्षी महाराष्ट्र दिनी हा महाराष्ट्रातील सर्वांत उंच आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज उभारला गेला; मात्र हा तिरंगा सातत्याने फडकवत ठेवला जात नसल्याने नागरिकांतून याबाबत सातत्याने विचारणा होत होती.या पार्श्वभूमीवर सुजय पित्रे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ३0३ फूट उंचीचा हा ध्वज उभारताना सर्व तांत्रिक बाबींची माहिती घेतली होती. कोल्हापूरच्या वातावरणाची सरासरी काढून ताशी २५ किलोमीटर वारे वाहण्याजोग्या परिस्थितीमध्ये ध्वज, त्याचा आकार, मटेरियल याचे नियोजन केले होते. मात्र सध्या ताशी ३0 ते ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने ध्वज आणि स्तंभ याच्यात मोठा तणाव निर्माण होतो; त्यामुळे ध्वज फाटण्याचा संभव असतो.

गेल्या काही दिवसांमध्ये वाऱ्याचा वेग, ध्वज चढवताना आणि उतरवताना होणारा त्रास, ध्वजाचे होणारे नुकसान याचा विचार करून याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला असून, त्यांनीही सातत्याने ध्वज फडकवणे धोकादायक असल्याचे सांगितले आहे.एका ध्वजाची किंमत ८२ हजार रुपये असल्याने मोठ्या वाऱ्यात जर सतत ध्वज फाटत राहिला तर आर्थिकदृष्ट्याही ते परवडणारे नाही. केंद्र शासनाचे ध्वजासंदर्भातील नियम याचाही विचार केला गेला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून वेगवान वाऱ्यावेळी ध्वज उतरवला जातो.

मुंबईतील राजभवन किंवा वाघा बॉर्डर येथील ध्वजही नियमित फडकवता येत नाहीत. त्यामुळे विशिष्ट प्रसंग, दिन हे लक्षात घेऊन योग्य वातावरण असताना ध्वज फडकवला जातो याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे सुजय पित्रे यांनी पत्रकामध्ये नमूद केले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर