शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोल्हापूर :  शाहूंच्या समाधिस्थळावरून राजकीय फुलांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 12:50 IST

ज्यांच्या पुण्याईवर केवळ कोल्हापूर जिल्हाच विकसित झाला नाही, तर देशातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातही मोठी उन्नती झाली त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधिस्थळाच्या बांधकामावरून बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत अनपेक्षित राजकीय फुलांची उधळण करण्याचा कृतघ्नपणा पाहायला मिळाला.

ठळक मुद्देशाहूंच्या समाधिस्थळावरून राजकीय फुलांची उधळणमहापालिका सभेत उद्वेगजनक प्रकार : आरोप- प्रत्यारोपांचे गालबोट

कोल्हापूर : ज्यांच्या पुण्याईवर केवळ कोल्हापूर जिल्हाच विकसित झाला नाही, तर देशातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातही मोठी उन्नती झाली त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधिस्थळाच्या बांधकामावरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत अनपेक्षित राजकीय फुलांची उधळण करण्याचा कृतघ्नपणा पाहायला मिळाला. या उद्वेगजनक प्रकाराने काही नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अखेर तासभराच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर भानावर आलेल्या नगरसेवकांनी झाले गेले विसरून समाधिस्थळाच्या बांधकामाचा पाठपुरावा करण्याचा संकल्प केला.शाहू समाधिस्थळाकरिता द्याव्या लागणाऱ्या निधीच्या मंजुरीसाठी महापौर सरिता मोरे यांनी बुधवारी विशेष सभा आयोजित केली होती. सभेत ७० लाखांचा निधी देण्याच्या प्रस्तावास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली; परंतु या विषयावर झालेल्या चर्चेतून अवमान आणि गैरसमज झाले. त्यातून सत्तारूढ कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी आघाडी असे दोन गट पडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. वास्तविक विषय मंजूर करून चर्चेशिवाय सभा संपविणे आवश्यक होते किंवा चर्चा करत असताना दुसऱ्याचा अवमान होणार नाही याची खबरदारी राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी घ्यायला पाहिजे होती, ती न घेतल्याने कृतघ्नपणाचे दर्शन सभागृहाला झाले.महापालिकेने समाधिस्थळ स्वनिधीतून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही त्याच्या कामास राज्य सरकारने तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी दिला नाही, असा राजकीय आरोप कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात आला. त्यातच उपमहापौर भूपाल शेटे यांनी सरकार जर काही देणार नसेल, तर आपण ‘झोळी’ घेऊन पैसे गोळा करू आणि समाधिस्थळ बांधून पूर्ण करू, असे सांगितले.

शेटे यांच्या या वक्त्यव्यावरून सभेत ठिणगी पडली. त्यांच्या वक्तव्यावर हरकत घेत सत्यजित कदम, सुनील कदम, विलास वास्कर, राजसिंह शेळके, किरण शिराळे, किरण नकाते यांनी हरकत घेतली. शब्द मागे घ्या, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. तसेच शाहू महाराजांच्या समाधिस्थळासाठी ‘झोळी’ घेऊन का पैसे मागायचे, सरकार आणि महापालिका निधी देण्यासाठीच आहेत.

शाहू महाराजांचा अवमान होईल, असे कोणतेही वक्तव्य करू नका, अशी समज दिली. माजी महापौर हसिना फरास यांनीही शेटे यांना तुमचा शब्द मागे घ्या, अशी सूचना केली. त्यानंतर तत्काळ शेटे यांनी दिलगिरी व्यक्त करून पडदा टाकला. आपणाला लोकसहभागातून समाधिस्थळ विकसित करू, असे म्हणायचे होते, असा खुलासा त्यांनी केला.विरोधी बाकावरील सदस्य तरीही शांत झाले नाहीत. सत्यजित कदम यांनी तर तुम्ही सरकारकडे कधी प्रस्ताव पाठविला, पालकमंत्र्यांकडे कधी चर्चेला गेला सांगा, असे आव्हान दिले; त्यामुळे सत्तारूढ गटाचे शारंगधर देशमुख यांनाही स्वत:ला आवरता आले नाही.

समाधिस्थळासाठी सरकारने चार आणे दिलेले नाहीत. निधी मागायचा कशाला? हवा त्यांना द्यावा असे का वाटले नाही? त्यांना लाज कशी वाटली नाही? भाषणात १0 वेळा शाहू महाराज यांचे नाव घेता, तर मग निधी द्यायला कमीपणा कसला वाटतो? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे सभेतील वादंग अधिकच वाढले. शेवटी विरोधी गटाच्या सर्व सदस्यांनी राजकीय संघर्ष टाळण्याकरिता समाधिस्थळाच्या निधीला मंजुरी देऊन सभागृहातून काढता पाय घेतला. त्यांना नंतर रोखण्याचा प्रयत्न झाला; परंतु सर्वांनी सभागृह सोडले.

विरोधी गटाचे नगरसेवक पुन्हा सभागृहातविरोधी गटाचे सर्व नगरसेवक सभागृहातून बाहेर पडल्याचे लक्षात येताच, माजी स्थायी सभापती आदिल फरास, महापौर सरिता मोरे यांचे पती नंदकुमार मोरे धावतच महापालिका चौकात गेले. त्यांनी विरोधी गटाच्या नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

शाहू महराजांच्या समाधिस्थळाचा विषय आहे, तुम्ही सभागृहातून बाहेर पडणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांची समजूत काढली. त्याचवेळी हसिना फरास यादेखील चौकात आल्या. महाराजांचा अवमान होईल, असे कोणी वागू नका, असे फरास यांनी सांगितले. कोणतीही चर्चा, राजकीय आरोप करायचे नाहीत, या अटींवर नगरसेवक पुन्हा सभागृहात पोहोचले.

हसिना फरास ‘आई’च्या भूमिकेतमाजी महापौर हसिना फरास यांनी समाधिस्थळाच्या कामाचा सतत पाठपुरावा करत आहोत. बुधवारच्या सभेत सत्तारूढ आणि विरोधी गटाकडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने व्यथित झालेल्या फरास यांनी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांना समजावले. किमान समाधिस्थळाच्या कामावरून तरी एकमेकांवर आरोप करू नका, अशा शब्दांत बजावले. एवढेच नाही तर त्यांनी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या हातातील माईक काढून घेऊन तुमचे वक्तव्य बरोबर नाही, शब्द मागे घ्या, असे सांगितले. वेगळे वळण लावायला नको, एकमताने विषय मंजूर करा, शांत बसा, असेही त्यांनी अधिकारवाणीने सर्वांना सांगितले.

मृत्यू झालेल्या ठिकाणची मातीराजर्षी शाहू महाराज यांचे निधन झालेल्या मुंबईतील खेतवाडी येथील पन्हाळा लॉज परिसरातील माती आणलेला कलश आदिल फरास, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत यांनी महापौर मोरे यांच्याकडे सुपूर्द केला. ही समाधिस्थळाच्या ठिकाणी दगडी पेटीत ठेवली जाणार आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर