शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कोल्हापूर :  सेंद्रिय शेतीच्या प्रचार, प्रसारावर भर द्यावा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 18:14 IST

यंदाचा कृषी महोत्सव डिसेंबर महिन्यात होत आहे. या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती, तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेला दिले.

ठळक मुद्देसेंद्रिय शेतीच्या प्रचार, प्रसारावर भर द्यावा : जिल्हाधिकारीकृषी महोत्सव डिसेंबरमध्ये : ‘आत्मा’ नियामक मंडळाची बैठक

कोल्हापूर : यंदाचा कृषी महोत्सव डिसेंबर महिन्यात होत आहे. या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती, तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेला दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यंत्रणेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी अमित माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. जे. खोत, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अशोक पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, जिल्ह्यात सध्या ५० शेतकऱ्यांचा ५० एकर क्षेत्राचा एक गट, असे ३० शेतकरी बचत गट कार्यरत असून, या गटातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर अधिक भर द्यावा. शेतकरी गटांनी यापुढील काळात सेंद्रिय शेतीवर भर देऊन अधिकाधिक उत्पादने घ्यावीत.डिसेंबर महिन्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावर भर देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.बैठकीस भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोस्की, रेशीम विकास अधिकारी बी. एम. खंडागळे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, मत्स्य व्यवसायाचे साहाय्यक आयुक्त पी. के. सुर्वे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, नियामक मंडळाचे सदस्य सर्जेराव पाटील, विश्वनाथ पाटील, बाळू चव्हाण, शंकर पाटील, मिनाक्षी चौगुले, तुंगभद्रा चरापले, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर