शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कोल्हापूर :  सेंद्रिय शेतीच्या प्रचार, प्रसारावर भर द्यावा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 18:14 IST

यंदाचा कृषी महोत्सव डिसेंबर महिन्यात होत आहे. या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती, तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेला दिले.

ठळक मुद्देसेंद्रिय शेतीच्या प्रचार, प्रसारावर भर द्यावा : जिल्हाधिकारीकृषी महोत्सव डिसेंबरमध्ये : ‘आत्मा’ नियामक मंडळाची बैठक

कोल्हापूर : यंदाचा कृषी महोत्सव डिसेंबर महिन्यात होत आहे. या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती, तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेला दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यंत्रणेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी अमित माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. जे. खोत, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अशोक पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, जिल्ह्यात सध्या ५० शेतकऱ्यांचा ५० एकर क्षेत्राचा एक गट, असे ३० शेतकरी बचत गट कार्यरत असून, या गटातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर अधिक भर द्यावा. शेतकरी गटांनी यापुढील काळात सेंद्रिय शेतीवर भर देऊन अधिकाधिक उत्पादने घ्यावीत.डिसेंबर महिन्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावर भर देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.बैठकीस भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोस्की, रेशीम विकास अधिकारी बी. एम. खंडागळे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, मत्स्य व्यवसायाचे साहाय्यक आयुक्त पी. के. सुर्वे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, नियामक मंडळाचे सदस्य सर्जेराव पाटील, विश्वनाथ पाटील, बाळू चव्हाण, शंकर पाटील, मिनाक्षी चौगुले, तुंगभद्रा चरापले, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर