शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
4
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
5
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
6
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
7
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
8
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
9
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
10
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
11
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
12
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
13
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
14
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
15
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
16
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
17
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
18
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
19
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘एफडीआय’च्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करा - ललित गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 20:40 IST

व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी सरकारने आणलेले ‘एफडीआय’चे भूत घालविण्यासाठी जिल्याहातील सर्व व्यापाऱ्यांनी २८ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखविली पाहिजे, असे मत

ठळक मुद्दे२८ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाया निर्णयामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणारआॅनलाईन ई-कॉमर्सद्वारे प्रथम फायद्याचे गाजर दाखविले

कोल्हापूर : व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी सरकारने आणलेले ‘एफडीआय’चे भूत घालविण्यासाठी जिल्याहातील सर्व व्यापाऱ्यांनी २८ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखविली पाहिजे, असे मत कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले. येत्या शुक्रवारी (दि. २८) परदेशी गुंतवणुकीच्या विरोधात पुकारलेल्या ‘देशव्यापी बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या जनजागृती सभेत ते बोलत होते.

गांधी म्हणाले, सरकार कुठलेही असो; व्यापाºयांना केवळ बिनपगारी नोकर म्हणून ते राबवीत आहे. आयकर, व्यावसायिक कर अथवा अन्य लक्ष्य असो; जबरदस्तीने अथवा कायद्याच्या धाकाने ते वसूल करण्यासाठी एक हक्काचा घटक म्हणून सरकार व्यापाऱ्यांकडे पाहत आहे. एका बाजूने ‘मेक इन इंडिया’चा नारा द्यायचा, तर मागील बाजूने वॉलमार्ट-फ्लिपकार्टसारख्या परदेशी कंपन्यांना देशात प्रवेश द्यायचा. त्यामुळे एकूणच सरकारचे धोरण देशातील व्यापाºयांना दणका देणारे आहे.

या विरोधात ‘कॅट’ने याचिका दाखल केली होती. मात्र, ती न्यायालयात टिकली नाही. किरकोळ व्यापाºयांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. रस्त्यांवर उतरल्याशिवाय त्यांना पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे २८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढल्या जाणाऱ्या मोर्चात ५० हजार व्यापाºयांनी सहभागी व्हावे, याकरिता आज, शुक्रवारपासून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या ‘बंद’ला महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, कोल्हापूर चेंबर, अन्य व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शविल्याचेही सांगितले.

‘कॅट’चे संघटन सचिव धैर्यशील पाटील म्हणाले, या निर्णयामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. आॅनलाईन ई-कॉमर्सद्वारे प्रथम फायद्याचे गाजर दाखविले जाते. त्यानंतर एकदा सवय झाली की मनमानी दर आकारले जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालणाºया या निर्णयाविरोधात आताच एकजूट दाखविली पाहिजे. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेट्ये यांनी प्रास्ताविक, तर जयेश ओसवाल यांनी स्वागत केले. शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले. यावेळी प्रदीप कापडिया, माजी अध्यक्ष आनंद माने यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय