शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापूर : ‘एफडीआय’च्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करा - ललित गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 20:40 IST

व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी सरकारने आणलेले ‘एफडीआय’चे भूत घालविण्यासाठी जिल्याहातील सर्व व्यापाऱ्यांनी २८ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखविली पाहिजे, असे मत

ठळक मुद्दे२८ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाया निर्णयामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणारआॅनलाईन ई-कॉमर्सद्वारे प्रथम फायद्याचे गाजर दाखविले

कोल्हापूर : व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी सरकारने आणलेले ‘एफडीआय’चे भूत घालविण्यासाठी जिल्याहातील सर्व व्यापाऱ्यांनी २८ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखविली पाहिजे, असे मत कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले. येत्या शुक्रवारी (दि. २८) परदेशी गुंतवणुकीच्या विरोधात पुकारलेल्या ‘देशव्यापी बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या जनजागृती सभेत ते बोलत होते.

गांधी म्हणाले, सरकार कुठलेही असो; व्यापाºयांना केवळ बिनपगारी नोकर म्हणून ते राबवीत आहे. आयकर, व्यावसायिक कर अथवा अन्य लक्ष्य असो; जबरदस्तीने अथवा कायद्याच्या धाकाने ते वसूल करण्यासाठी एक हक्काचा घटक म्हणून सरकार व्यापाऱ्यांकडे पाहत आहे. एका बाजूने ‘मेक इन इंडिया’चा नारा द्यायचा, तर मागील बाजूने वॉलमार्ट-फ्लिपकार्टसारख्या परदेशी कंपन्यांना देशात प्रवेश द्यायचा. त्यामुळे एकूणच सरकारचे धोरण देशातील व्यापाºयांना दणका देणारे आहे.

या विरोधात ‘कॅट’ने याचिका दाखल केली होती. मात्र, ती न्यायालयात टिकली नाही. किरकोळ व्यापाºयांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. रस्त्यांवर उतरल्याशिवाय त्यांना पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे २८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढल्या जाणाऱ्या मोर्चात ५० हजार व्यापाºयांनी सहभागी व्हावे, याकरिता आज, शुक्रवारपासून जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या ‘बंद’ला महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, कोल्हापूर चेंबर, अन्य व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शविल्याचेही सांगितले.

‘कॅट’चे संघटन सचिव धैर्यशील पाटील म्हणाले, या निर्णयामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. आॅनलाईन ई-कॉमर्सद्वारे प्रथम फायद्याचे गाजर दाखविले जाते. त्यानंतर एकदा सवय झाली की मनमानी दर आकारले जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मुळावर घाव घालणाºया या निर्णयाविरोधात आताच एकजूट दाखविली पाहिजे. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेट्ये यांनी प्रास्ताविक, तर जयेश ओसवाल यांनी स्वागत केले. शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले. यावेळी प्रदीप कापडिया, माजी अध्यक्ष आनंद माने यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय