शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

कोल्हापूर : पर्यावरणीय मूल्य मिळाले, तरच शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल :  रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 13:59 IST

शेतकऱ्यांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केले.

ठळक मुद्देपर्यावरणीय मूल्य मिळाले, तरच शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल :  रघुनाथ पाटीलशिवाजी विद्यापीठातील राज्यस्तरीय कार्यशाळा

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग आणि शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ‘कार्बन क्रेडिट्स आणि जल व्यवस्थापन’ या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या भाषाभवन सभागृहामधील या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे प्रमुख उपस्थित होते.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पाटील म्हणाले, शेतकरी हा खरा संशोधक आहे. शेतीच्या माध्यमातून अन्नधान्यांच्या विविध वाणांचा प्रयोगांती शोध लावून पिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो. शेतकरी पिकांच्या माध्यमातून शेतीला पाणी देतो, म्हणजेच तो पृथ्वीचे तापमान कमी करण्यास सहकार्य करीत असतो. देशातील विविध भागांमध्ये उपलब्ध परिस्थितीत शेतीच्या माध्यमातून देश जगविण्याचे महत्त्वाचे कार्य तो करतो.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विविध उद्योगधंदे व इतर माध्यमांतून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अधिक झाल्याने ते साठवणूक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त पद्धतीने शेतीमध्ये हे करता येणे शक्य आहे. यामुळे वातावरणातील कार्बनचा भार कमी होणार आहे. शेतकरी कशाप्रकारे कार्बन साठवणूक करतो, त्याचे मूल्यमापन कसे करणार, यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

शेतीच्या बळावर देशाला मोठ्या प्रमाणावर कार्बन क्रेडिटस् मिळविणे शक्य आहे. या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, बालेखान मुजावर, गिरीश राऊत, प्रणाली राऊत, ए. डी. जाधव यांच्यासह सोलापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, बीड, आदी विविध भागांतील शेतकरी उपस्थित होते. पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

संस्कारांचा वारसापिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. जनजागृतीतून शेतीच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणे, ही आता गरज बनली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्रामीण भाग हे संस्कारांचा वारसा जपणारे मोठे केंद्र आहे; त्यामुळे शेतकºयांचे आई-वडील वृद्धाश्रमात दिसत नाहीत, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर