शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी महापालिकेस नोटीस, करवीर प्रांताधिकाऱ्यांचे आदेश : गुरुवारी सुनावणीवेळी म्हणणे मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:01 IST

कोल्हापूर शहरातील जयंती नाल्याद्वारे सांडपाणी व रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी महापालिकेस फौजदारी दाखल का करू नये, म्हणून बुधवारी नोटीस बजावली. याबाबत  गुरुवारी सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत पुराव्यांनिशी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देपंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेची याचिका सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत पुराव्यांनिशी म्हणणे मांडण्याचे आदेश बुधवारी घेणार पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने

कोल्हापूर : शहरातील जयंती नाल्याद्वारे सांडपाणी व रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी महापालिकेस फौजदारी दाखल का करू नये, म्हणून बुधवारी नोटीस बजावली. याबाबत  गुरुवारी सुनावणीवेळी प्रत्यक्ष अथवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत पुराव्यांनिशी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती; पण त्यावर उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याबाबत महापालिकेने कोणतीच कारवाई केली नसल्याने सन २०१० मध्ये देसाई यांनी पुनर्याचिका दाखल केली.

याचदरम्यान इचलकरंजीतूनही कोल्हापूर महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने या दोन्हीही जनहित याचिकेच्या सुनावणी एकत्रित चालविण्यासाठी जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कमिटी नियुक्त केली; पण या कमिटीच्या दर महिन्याला बैठका होत होत्या, पण कारवाई होत नसल्याचे पुरावे उच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आले.

त्यानुसार उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी करवीरचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांना पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे कायदेशीर नमुने घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी इचलकरंजी येथे पंचगंगा नदीतील रसायनयुक्त व सांडपाणीयुक्त प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

त्यानुसार पंचगंगा प्रदूषण रोखण्यास महापालिकेला अपयश आल्याने त्यांना जबाबदार धरून नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या जीवितास धोका असल्याने चौकशी करून कारवाई करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.त्यानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे फौजदारी दाखल का करू नये, अशी नोटीस करवीर उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) सचिन इथापे यांनी महापालिका आयुक्त, जलअभियंता, मुख्याधिकारी, पर्यावरण अधिकाऱ्यांना बजावली आहे. महापालिकेने  गुरुवारी दुपारी १ वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली कागदपत्रांच्या पुराव्यांसह बाजू मांडावी, असे नोटिसीत म्हटले आहे.कोल्हापुरात बुधवारी घेणार नमुनेजयंती नाल्यातून मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने बुधवारी पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने करवीर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे घेणार असल्याची माहिती ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका