शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

कोल्हापूर :  विचारांमध्ये ‘नवे-गाव आंदोलन’ येण्याची गरज  : उत्तम पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:42 IST

ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील लिखित ‘समाज परिवर्तन’ आणि ‘नवे-गाव आंदोलन’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पुण्याचे उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील बोलत होते.

ठळक मुद्दे विचारांमध्ये ‘नवे-गाव आंदोलन’ येण्याची गरज  : उत्तम पाटीलप्राचार्य पी. बी. पाटील लिखित पुस्तकांचे प्रकाशन

कोल्हापूर : आत्मज्ञानी, विज्ञानी असा नवा माणूस आणि नवी मानवी वस्ती निर्माण करणारे आंदोलन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांनी ‘नवे-गाव आंदोलना’द्वारे उभारले. समाजातील सध्याचे प्रश्न सोडविण्यासाठी या आंदोलनातील विचार आपल्या सर्वांमध्ये येणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन पुण्याचे उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी येथे केले.ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील लिखित ‘समाज परिवर्तन’ आणि ‘नवे-गाव आंदोलन’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये वाचनकट्टा प्रॉडक्शनतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, तर गीता पाटील, शिवाजी पाटील प्रमुख उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे म्हणाले, प्राचार्य पी. बी. पाटील यांनी अत्यंत वेगळे आणि कृतिशील विचार या पुस्तकांच्या माध्यमातून दिले आहेत. ते विचार समाजासाठी महत्त्वाचे आहेत. गीता पाटील म्हणाल्या, ग्रामसेवक ते प्रशासनापर्यंत ‘नवे-गाव आंदोलन’ पोहोचण्याची गरज आहे.या कार्यक्रमात महेश थोरवे, शशिकांत सुतार, सुमय्या मंगळूरकर, गिरिजा गोडे, प्रभाकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब भोसले, डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रताप पाटील, सुहास राजेभोसले, नंदिनी निकम, एस. डी. पाटील, आदी उपस्थित होते. शाहीर दिलीप सावंत व सहकाऱ्यांनी ‘कोल्हापूरची लावणी’ सादर केली. ‘वाचनकट्टा’चे संकल्पक युवराज कदम यांनी प्रास्ताविक केले. उत्तम तळवार यांनी सूत्रसंचालन केले. वनिता कदम यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर