शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

कोल्हापूर :  विचारांमध्ये ‘नवे-गाव आंदोलन’ येण्याची गरज  : उत्तम पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:42 IST

ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील लिखित ‘समाज परिवर्तन’ आणि ‘नवे-गाव आंदोलन’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पुण्याचे उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील बोलत होते.

ठळक मुद्दे विचारांमध्ये ‘नवे-गाव आंदोलन’ येण्याची गरज  : उत्तम पाटीलप्राचार्य पी. बी. पाटील लिखित पुस्तकांचे प्रकाशन

कोल्हापूर : आत्मज्ञानी, विज्ञानी असा नवा माणूस आणि नवी मानवी वस्ती निर्माण करणारे आंदोलन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांनी ‘नवे-गाव आंदोलना’द्वारे उभारले. समाजातील सध्याचे प्रश्न सोडविण्यासाठी या आंदोलनातील विचार आपल्या सर्वांमध्ये येणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन पुण्याचे उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी येथे केले.ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील लिखित ‘समाज परिवर्तन’ आणि ‘नवे-गाव आंदोलन’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये वाचनकट्टा प्रॉडक्शनतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, तर गीता पाटील, शिवाजी पाटील प्रमुख उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे म्हणाले, प्राचार्य पी. बी. पाटील यांनी अत्यंत वेगळे आणि कृतिशील विचार या पुस्तकांच्या माध्यमातून दिले आहेत. ते विचार समाजासाठी महत्त्वाचे आहेत. गीता पाटील म्हणाल्या, ग्रामसेवक ते प्रशासनापर्यंत ‘नवे-गाव आंदोलन’ पोहोचण्याची गरज आहे.या कार्यक्रमात महेश थोरवे, शशिकांत सुतार, सुमय्या मंगळूरकर, गिरिजा गोडे, प्रभाकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब भोसले, डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रताप पाटील, सुहास राजेभोसले, नंदिनी निकम, एस. डी. पाटील, आदी उपस्थित होते. शाहीर दिलीप सावंत व सहकाऱ्यांनी ‘कोल्हापूरची लावणी’ सादर केली. ‘वाचनकट्टा’चे संकल्पक युवराज कदम यांनी प्रास्ताविक केले. उत्तम तळवार यांनी सूत्रसंचालन केले. वनिता कदम यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर