शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

कोल्हापूर महानगरपालिका ‘स्वच्छ भारत अभियान’चे पुढील आठवड्यात सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 20:45 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण करण्याकरीता ८ ते १० फे बु्रवारी या काळात सरकारनियुक्त त्रयस्थ समितीचे पथक कोल्हापुरात येणार आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.राष्टÑीय पातळीवर केंद्र सरकारने महानगरपालिका हद्दीतील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्पर्धा आयोजित केली आहे. त्याच्या अनुषंगाने ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण करण्याकरीता ८ ते १० फे बु्रवारी या काळात सरकारनियुक्त त्रयस्थ समितीचे पथक कोल्हापुरात येणार आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.

राष्टÑीय पातळीवर केंद्र सरकारने महानगरपालिका हद्दीतील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्पर्धा आयोजित केली आहे. त्याच्या अनुषंगाने गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका आरोग्य विभागाने शहरात जनजागृती केली असून ठिकठिकाणी स्वच्छतेचे फलक लावले आहेत. सार्वजनिक शौचालये स्वच्छ केली असून काहींची रंगरंगोटी केली आहे. महापालिकेने ‘स्वच्छ भारत अ‍ॅप’ सुरू केले असून त्यावर येणाºया नागरिकांच्या तक्रारी चोवीस तासांत निरसन केल्या जात आहेत.

शहराच्या सर्व प्रभागांत घंटागाडी नियमितपणे सुरू करण्यात आलेल्या असून दैनंदिन कचरा उठावाचे विशेष नियोजन केले आहे. सार्वनिक शौचालयात पाण्याची सुविधा देण्यात आली आहे. कचरा वाहून नेणाºया गाड्या सक्षम करण्यात आलेल्या आहेत.

कें द्र सरकारने एका त्रयस्थ कंपनीला स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्याचे काम सोपविले आहे. या कंपनीचे एक पथक दि. ८ ते १० फेबु्रवारी या काळात कोल्हापुरात येऊन स्वच्छतेच्या बाबतीत ५४ मुद्द्यांवर तपासणी करणार आहे.या स्पर्धेच्या अनुषंगाने महापालिका आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली असली तरी ओल्या व सुक्या कचराची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा मात्र महापालिकेने अद्याप विकसित केलेली नाही. कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. सध्या या प्रकल्पाची मशिनरी जोडण्याचे काम सुरू आहे.