शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

‘मोरुच्या मावशी’चे कोल्हापूर ‘माहेरघर’ आवडते शहर : कलाकारांशीही जवळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:40 IST

कोल्हापूर : विविध नाटके, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अभिनेते विजय चव्हाण यांची कोल्हापुरातील अनेक कलाकारांशी जवळीक निर्माण झाली. विशेष म्हणजे ‘नम्र कलाकार’ म्हणून ते सर्वांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने या सहृदयी कलाकाराला मुकल्याची भावना मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी शुक्रवारी व्यक्त केली.अभिनेते विजय चव्हाण यांचे खूप वर्षांपासून कोल्हापूरशी आपुलकीचे नाते होते. आनंद काळे, ...

कोल्हापूर : विविध नाटके, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अभिनेते विजय चव्हाण यांची कोल्हापुरातील अनेक कलाकारांशी जवळीक निर्माण झाली. विशेष म्हणजे ‘नम्र कलाकार’ म्हणून ते सर्वांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने या सहृदयी कलाकाराला मुकल्याची भावना मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी शुक्रवारी व्यक्त केली.

अभिनेते विजय चव्हाण यांचे खूप वर्षांपासून कोल्हापूरशी आपुलकीचे नाते होते. आनंद काळे, सर्जेराव पाटील आणि मिलिंद अष्टेकर या स्थानिक कलाकारांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. दिग्दर्शक यशवंत भालकर आणि महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ते कोल्हापूरला आले होते; पण ते कोल्हापूरकरांच्या लक्षात राहिले ते म्हणजे त्यांच्या ‘मोरुच्या मावशी’ नाटकातील मावशीच्या पात्रामुळे. केशवराव भोसले नाट्यगृहात ‘मोरुच्या मावशी’चे झालेले सर्व प्रयोग हाउसफुल्ल झाले होते. विशेष म्हणजे कोल्हापुरात चव्हाण यांचे दोन दिवसांचे चित्रीकरण असले की त्यांना येथील दिग्दर्शक तीन दिवसांच्या चित्रीकरणासाठी करारबद्ध करत असत. कारण दोन दिवस ते चित्रीकरणात गर्क असायचे आणि उरलेल्या एका दिवसात विश्रांती घेत. 

विजय चव्हाण केवळ विनोदी कलाकार नव्हता. कोणतीही भूमिका तो अत्यंत गांभीर्याने करत असे. माझ्या ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’, ‘नाथा पुरे आता’ आणि ‘आबा जिंदाबाद’, आदी चित्रपटांत त्याने काम केले आहे. दिग्दर्शकाला मान देणारा व नम्र कलाकार होता.- यशवंत भालकर, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शकमाझा व त्यांचा परिचय कोल्हापुरातील ‘मोरुच्या मावशी’ च्या पहिल्या प्रयोगापासून पक्का मित्र असा झाला. खासीयत म्हणजे त्याने या आधुनिक जगाची कास धरतानाही मोबाईल फोन कधी वापरला नाही, हे विशेष होय. चित्रीकरणाच्या तारखा, व्यवहाराचे बोलणेही तो दूरध्वनीवरून करत होता.- मिलिंद अष्टेकर, ज्येष्ठ निर्मिती व्यवस्थापक