शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : कोल्हापुरात भगवी लाट, दोन्ही जागा शिवसेनेकडे :- ठाकरे यांचे स्वप्न साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 15:44 IST

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरच्या जागेवर भगवा फडकवा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न या निवडणुकीत साकारत आहे.

ठळक मुद्देशेट्टी-महाडिक यांना पराभवाचा जबर तडाखा

विश्र्वास पाटील-

कोल्हापूर : कोल्हापूरहातकणंगले लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरच्या जागेवर भगवा फडकवा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न या निवडणुकीत साकारत आहे. कोल्हापुरातून संजय मंडलिक हे बाराव्या फेरीअखेर दुपारी अडीच वाजेपर्यंत तब्बल २ लाख २६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विजयाची घोषणाच होण्याची औपचारिकता आहे. हातकणंगलेतून धैर्यशील माने हे ७१ हजार मतांनी आघाडीवर आहेत; त्यामुळे त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे.

कोल्हापुरात मंडलिक विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांची, तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विरुद्ध खासदार राजू शेट्टी यांच्यात लढत झाली. धैर्यशील माने हे पहिल्याच प्रयत्नात शेट्टी यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून ‘जायंट किलर’ ठरले. मंडलिक यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. कोल्हापुरात गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून कोल्हापूरची रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदामात तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलावाशेजारील गोदामात सुरू झाली.

सुरुवातीच्या टपाली मतांमध्ये कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक हे, तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाले. ‘महाडिक आघाडीवर’ अशा बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकल्या; परंतु त्या काही क्षणांपुरत्याच. प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यावर पहिल्या फेरीपासूनच संजय मंडलिक यांनी आघाडी घेतली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारासच मंडलिक यांचा विजय निश्चित झाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.

धैर्यशील माने यांनाही पहिल्या फेरीपासूनच लीड मताधिक्य मिळाले. त्यांचे मताधिक्य तुलनेत कमी होते. पहिल्या फेरीत तर ते शेकड्यांत होते; त्यामुळे त्या मतदारसंघात चुरस होणार, असे वातावरण होते; परंतु दुसऱ्या फेरीपासून हे मताधिक्य वाढत गेले व कोणत्याच फेरीत शेट्टी यांना मताधिक्य मिळाले नाही. इचलकरंजी, हातकणंगले व शाहूवाडी या मतदारसंघांनी माने यांना भरघोस मते दिली. गेल्या निवडणुकीत हातकणंगले व शाहूवाडी या मतदारसंघांनी शेट्टी यांना तब्बल ८३ हजारांचे मताधिक्य दिले होते. धैर्यशील माने यांना या निवडणुकीत आतापर्यंत जाहीर मताधिक्यात तब्बल ४९ हजारांचे मताधिक्य इचलकरंजी मतदारसंघाने दिले. वंचित आघाडीच्या अस्लम सय्यद यांनी ५० हजार मते घेतली; या दोन्हीचा फटका शेट्टी यांना बसला.शेट्टी का पराभूत झाले?मोदी लाट, नवमतदार व तरुणाईमध्ये मोदी यांच्याबद्दल असलेली क्रेझ, शेट्टी यांनी सातत्याने ‘मोदी यांना पाडा,’ अशी घेतलेली भूमिका, ब्राह्मण समाजाबद्दल केलेले अवमानकारक वक्तव्य, इचलकरंजीच्या पाणीप्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष, मतदारसंघातील जनतेशी कमी झालेला संपर्क हे घटक शेट्टी यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेच; परंतु जातीचे राजकारणही जास्त परिणामकारक ठरले. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलेली बहुजन समाजाचा खासदार ही आरोळी खरी करून दाखविण्यात ते यशस्वी झाले. या निवडणुकीत शेट्टी यांचा ऊस आंदोलनाचा लढा, त्यांनी शेतकऱ्यांसाठी गेली दोन दशके केलेली चळवळ हे मुद्देच चर्चेत आले नाहीत.

महाडिक का पराभूत झाले..?गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकजुटीने महाडिक यांच्या पाठीशी राहिल्या होत्या; परंतु निवडून आल्यानंतर महाडिक मात्र भाजपच्या संगतीत राहिले. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांत त्यांनी भाजपला पोषक भूमिका घेतली. भावजय शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून रिंगणात असताना खासदार महाडिक यांची भाजपच्या सदस्यांना घेऊन जाणारी बस चालविली. त्याचा त्यावेळी व्हायरल झालेला व्हिडीओ लोकसभा निवडणुकीतही महाडिक यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण तयार करण्यास कारणीभूत ठरला. त्यांच्या कुटुंबात सर्व पक्ष आहेत व त्या बळावर सर्व जिल्ह्यावर ते राज्य करू पाहतात, याबद्दल सामान्य माणसांच्या मनांत असलेली चीडही महाडिक यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेRaju Shettyराजू शेट्टीDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक