शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कोल्हापूर विधि सेवा प्राधिकरण राज्यात भारी

By admin | Updated: October 20, 2016 01:20 IST

दिल्लीत ९ नोव्हेंबरला होणार गौरव

कोल्हापूर : कोल्हापूर विधि व सेवा प्राधिकरणाने केलेल्या कार्याची दखल घेत उच्च न्यायालयाने महाराष्ट्रामधील सर्वाेत्कृष्ट प्राधिकरण म्हणून कोल्हापूरच्या प्राधिकरणाची निवड केली आहे. ९ नोव्हेंबर हा ‘विधि सेवा दिन’ असून, या दिवशी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात कोल्हापूरच्या प्राधिकरणाचा गौरव करण्यात येणार आहे. प्राधिकरणाचे सदस्य सचिव उमेशचंद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.समाजातील उपेक्षित, आर्थिकदृष्ट्या कमी ऐपत असलेल्या आणि अशिक्षित, अपंग आणि सर्वसामान्य अशांसाठी न्याय मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी कोल्हापूर विधि व सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार २०१५ मध्ये अवैध मानवी व्यापाराचे बळी आणि व्यावसायिक लैंगिक शोषण या विषयांवरील परिसंवाद, वारांगणा, तृतीयपंथींना शिधापत्रिका देणे, आधारकार्ड देणे यासाठी प्रयत्न असे उपक्रम राबविले. लहान मुले, लैंगिक अत्याचार, महिला सबलीकरण, घरगुती हिंसाचार याबाबत प्रत्यक्ष मदत, परिसंवाद, चर्चासत्र, संमेलन, प्रदर्शनातून काम केले. त्याची दखल घेत ‘राज्यातील सर्वाेत्कृष्ट प्राधिकरण’ म्हणून निवड करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. व्ही. व्ही. पाटील-येळवडेकर, अ‍ॅड. शशिकला पाटील, अ‍ॅड. इरफान पटेल, अ‍ॅड. सारिका तोडकर, अ‍ॅड. योगिता हरणे, अ‍ॅड. शुभांगी निंबाळकर, अ‍ॅड. विजय ताटे देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)