शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जलयुक्त शिवारमुळे जाखले, वाडीरत्नागिरी पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 14:11 IST

गावातील प्राचीन तलावांना कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले होते. आता हे सर्व चित्र बदलले असून, वाडीरत्नागिरीतील गावतलाव चकाचक झाले आहेत, तर जाखलेतील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाणीटंचाईचे नावच या दोन गावातून गायब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ठळक मुद्देजलयुक्त शिवारमुळे जाखले, वाडीरत्नागिरी पाणीदारपाणीटंचाईचे नावच दोन गावातून गायब

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेतील प्रभावशाली कामांमुळे पन्हाळा तालुक्यातील वाडीरत्नागिरी व जाखले ही दोन गावे पाणीदार बनली आहेत. तीन वर्षांपूर्वी ही गावे पाणीटंचाईचा सामना करत होती. गावातील प्राचीन तलावांना कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले होते. आता हे सर्व चित्र बदलले असून, वाडीरत्नागिरीतील गावतलाव चकाचक झाले आहेत, तर जाखलेतील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाणीटंचाईचे नावच या दोन गावातून गायब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा घेण्यासाठी म्हणून सोमवारी शासनाच्या वतीने पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात येथील कामांची पाहणी केली असता, कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्शवत असे काम जाखल्यात झाल्याचे दिसले.

कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यांच्या नेतृत्वाखालील पाहणी दौऱ्यात उपविभागीय जलसंधारण अधिकारी धनाजी पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गोंधळी, जाखलेचे सरपंच सागर माने, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने यांच्या वृत्तपत्र प्रतिनिधींनी सहभाग घेतला.जोतिबा डोंगरावरील कर्पूरेश्वर तलावाचा कचरा कोंडाळा झाला होता. जलयुक्त शिवार योजनेतून ३४ लाख रुपये खर्चून या तलावातील गाळ काढून त्याची डागडुजीही केली. आज या तलावाचे सुंदर जलाशयात रुपांतरण झाले आहे. तेथे ८ टीसीएम पाणीसाठा आहे.

डोंगरावरच यमाई या प्राचीन तलावातही या योजनेतून काम हाती घेण्यात आले, तथापि काही काम अजून अपूर्ण असल्याने या तलावाला मात्र अवकळा आली आहे. तेथील जवळच असलेल्या टेकडीवर समतल चरीचे काम झाले असून, यातून डोंगर उतारावरून वाहणारे पाणी अडवण्याचा प्रयोग राबविण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी केलेल्या या कामांमुळे आजूबाजूच्या विहिरीतील पाणीसाठा वाढला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाखले या गावात तर, गावाने ठरवले तर काय घडू शकते? याची तलावातील पाणीसाठा पाहून प्रचिती येते. जेथे दरवर्षी दीड हजार मिलिमीटर पाऊस पडतो, पण उन्हाळ्यात पिकासाठी व पाण्यासाठी पाण्याची शोधाशोध करावी लागते, त्या जाखले गावात गावकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल ४८ दिवस सलग श्रमदान करून राळेगणसिद्धी व हिवरेबाजारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गाव जलयुक्त घडवण्याची किमया साधली आहे.गाव आणि आजूबाजूच्या परिसरात डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी पायथ्याला अडवून त्यावर वर्षभर जलसमृद्धी आणि त्यातून गावची समृद्धी साधता येते, हे गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे. पाणी अडवून ते जिरवण्याबरोबरच आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याबाबतही गावकरी आग्रही आहेत; त्यामुळे जमिनीत पाणी मुरवण्यासाठी तयार केलेल्या तलाव व ओढ्यांवर उपसाबंदी आहे.

गावात बोअर मारता येत नाही. शिवाय घरगुती वापरातून निर्माण होणारे सांडपाणी शोषखड्ड्याद्वारे जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; त्यामुळे गावात तुंबलेल्या पाण्याचे डबके सहसा दृष्टीस पडत नाही. जमिनीच्या पोटात अधिकाधिक पाणी साठवून ते गरजेइतकेच वापरण्याबाबत ग्रामस्थ कमालीचे आग्रही आहेत, त्यांना गावचे सरपंच सागर माने यांची पाण्याविषयीची धडपडही कारणीभूत आहे.

गावकऱ्यांनी एकदिलाने जलयुक्त शिवार अभियान शासनयोजना आणि लोकसहभागातून गतिमान करून पाझर तलावाचे पुनर्जीवन केले, ओढ्यांवर जागोजागी साखळी सिमेंट बंधारे घेतले, डोंगर उतारावरील ओघळ जोडणी प्रकल्प, सीसीटी, वनतळी घेतल्यामुळे आज जाखलेच्या शिवारात पाणी खेळू लागले आहे.गाळामुळे उत्पन्न तिप्पटीने वाढलेगावातील पाझर तलाव, ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनयोजना आणि लोकसहभागातून राबविण्यात आले. जवळपास ११ हजार ५00 ट्रॉली गाळ लोकसहभागातून काढून शेतात टाकण्यात आला; त्यामुळे ओढ्यामध्ये चांगला पाणीसाठा निर्माण होण्याबरोबरच चांगल्या दर्जाची माती शेतीस मिळाल्याने पिकांचे उत्पन्न तिप्पटीने वाढले आहे. 

 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारkolhapurकोल्हापूर