शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

कोल्हापूर : जलयुक्त शिवारमुळे जाखले, वाडीरत्नागिरी पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 14:11 IST

गावातील प्राचीन तलावांना कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले होते. आता हे सर्व चित्र बदलले असून, वाडीरत्नागिरीतील गावतलाव चकाचक झाले आहेत, तर जाखलेतील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाणीटंचाईचे नावच या दोन गावातून गायब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ठळक मुद्देजलयुक्त शिवारमुळे जाखले, वाडीरत्नागिरी पाणीदारपाणीटंचाईचे नावच दोन गावातून गायब

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेतील प्रभावशाली कामांमुळे पन्हाळा तालुक्यातील वाडीरत्नागिरी व जाखले ही दोन गावे पाणीदार बनली आहेत. तीन वर्षांपूर्वी ही गावे पाणीटंचाईचा सामना करत होती. गावातील प्राचीन तलावांना कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले होते. आता हे सर्व चित्र बदलले असून, वाडीरत्नागिरीतील गावतलाव चकाचक झाले आहेत, तर जाखलेतील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाणीटंचाईचे नावच या दोन गावातून गायब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा घेण्यासाठी म्हणून सोमवारी शासनाच्या वतीने पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात येथील कामांची पाहणी केली असता, कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्शवत असे काम जाखल्यात झाल्याचे दिसले.

कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यांच्या नेतृत्वाखालील पाहणी दौऱ्यात उपविभागीय जलसंधारण अधिकारी धनाजी पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गोंधळी, जाखलेचे सरपंच सागर माने, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने यांच्या वृत्तपत्र प्रतिनिधींनी सहभाग घेतला.जोतिबा डोंगरावरील कर्पूरेश्वर तलावाचा कचरा कोंडाळा झाला होता. जलयुक्त शिवार योजनेतून ३४ लाख रुपये खर्चून या तलावातील गाळ काढून त्याची डागडुजीही केली. आज या तलावाचे सुंदर जलाशयात रुपांतरण झाले आहे. तेथे ८ टीसीएम पाणीसाठा आहे.

डोंगरावरच यमाई या प्राचीन तलावातही या योजनेतून काम हाती घेण्यात आले, तथापि काही काम अजून अपूर्ण असल्याने या तलावाला मात्र अवकळा आली आहे. तेथील जवळच असलेल्या टेकडीवर समतल चरीचे काम झाले असून, यातून डोंगर उतारावरून वाहणारे पाणी अडवण्याचा प्रयोग राबविण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी केलेल्या या कामांमुळे आजूबाजूच्या विहिरीतील पाणीसाठा वाढला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाखले या गावात तर, गावाने ठरवले तर काय घडू शकते? याची तलावातील पाणीसाठा पाहून प्रचिती येते. जेथे दरवर्षी दीड हजार मिलिमीटर पाऊस पडतो, पण उन्हाळ्यात पिकासाठी व पाण्यासाठी पाण्याची शोधाशोध करावी लागते, त्या जाखले गावात गावकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल ४८ दिवस सलग श्रमदान करून राळेगणसिद्धी व हिवरेबाजारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गाव जलयुक्त घडवण्याची किमया साधली आहे.गाव आणि आजूबाजूच्या परिसरात डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी पायथ्याला अडवून त्यावर वर्षभर जलसमृद्धी आणि त्यातून गावची समृद्धी साधता येते, हे गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे. पाणी अडवून ते जिरवण्याबरोबरच आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याबाबतही गावकरी आग्रही आहेत; त्यामुळे जमिनीत पाणी मुरवण्यासाठी तयार केलेल्या तलाव व ओढ्यांवर उपसाबंदी आहे.

गावात बोअर मारता येत नाही. शिवाय घरगुती वापरातून निर्माण होणारे सांडपाणी शोषखड्ड्याद्वारे जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; त्यामुळे गावात तुंबलेल्या पाण्याचे डबके सहसा दृष्टीस पडत नाही. जमिनीच्या पोटात अधिकाधिक पाणी साठवून ते गरजेइतकेच वापरण्याबाबत ग्रामस्थ कमालीचे आग्रही आहेत, त्यांना गावचे सरपंच सागर माने यांची पाण्याविषयीची धडपडही कारणीभूत आहे.

गावकऱ्यांनी एकदिलाने जलयुक्त शिवार अभियान शासनयोजना आणि लोकसहभागातून गतिमान करून पाझर तलावाचे पुनर्जीवन केले, ओढ्यांवर जागोजागी साखळी सिमेंट बंधारे घेतले, डोंगर उतारावरील ओघळ जोडणी प्रकल्प, सीसीटी, वनतळी घेतल्यामुळे आज जाखलेच्या शिवारात पाणी खेळू लागले आहे.गाळामुळे उत्पन्न तिप्पटीने वाढलेगावातील पाझर तलाव, ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनयोजना आणि लोकसहभागातून राबविण्यात आले. जवळपास ११ हजार ५00 ट्रॉली गाळ लोकसहभागातून काढून शेतात टाकण्यात आला; त्यामुळे ओढ्यामध्ये चांगला पाणीसाठा निर्माण होण्याबरोबरच चांगल्या दर्जाची माती शेतीस मिळाल्याने पिकांचे उत्पन्न तिप्पटीने वाढले आहे. 

 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारkolhapurकोल्हापूर