शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर : नारळाचे भाव वाढले, केरळातील अतिवृष्टीचा काही अंशी परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 16:33 IST

रोज जेवणात नारळाचा वापर करणाऱ्या मंडळींना नारळ-खोबऱ्यांचा वापर जरा हात आखडूनच करावा लागणार आहे. श्रावण, गणेशोत्सव, सणासुदी आणि केरळातील अतिवृष्टीमुळे नारळाच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किमान २०, तर कमाल ४० रुपयांपर्यंत नारळाच्या आकाराप्रमाणे दरात वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे नारळाचे भाव वाढले, केरळातील अतिवृष्टीचा काही अंशी परिणाम तमिळनाडू, कर्नाटकातून नियमित पुरवठा

कोल्हापूर : रोज जेवणात नारळाचा वापर करणाऱ्या मंडळींना नारळ-खोबऱ्यांचा वापर जरा हात आखडूनच करावा लागणार आहे. श्रावण, गणेशोत्सव, सणासुदी आणि केरळातील अतिवृष्टीमुळे नारळाच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किमान २०, तर कमाल ४० रुपयांपर्यंत नारळाच्या आकाराप्रमाणे दरात वाढ झाली आहे.देवपूजा, मानपानासह रोजच्या जेवणात व नाष्ट्यात खोबऱ्यांचा चव म्हणून वापर केला जातो. विशेषत: चटण्यांमध्ये खोबरे चवीसाठी हमखास वापरले जातेच. कोल्हापूर जिल्ह्यात रोज तमिळनाडू, केरळ व कर्नाटकातून सुमारे सहा ते सात ट्रक नारळांची आवक होते. त्यात श्रावण व पुढील महिन्यात येणारा गणेशोत्सव आणि केरळातील भीषण अतिवृष्टीमुळे नारळाची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यात मागणी वाढली की दरही वाढतात. त्यानुसार नारळाचे भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.

दिवसाकाठी एका ट्रकमधून सुमारे २५ हजारांहून अधिक नारळ, अशी सुमारे सहा ट्रकमधून दीड लाख नारळांची आवक आहे. पोत्यातील ‘भरती ’नुसार नारळाचे दरही काढले जातात. नारळ आकाराने मोठा असेल तर एका पोत्यात ५० नारळ भरले जातात; तर आकाराने लहान असेल तर एका पोत्यात १०० नारळ भरले जातात.

सद्य:स्थितीत श्रावण, गणेशोत्सव, आदी सणांमुळे नारळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरही २० ते ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. नियमित नवा पाणी, जुना पाणी, बोळ, कंगणार, आदी जातींचे नारळ विक्रीसाठी या राज्यातून येतात. विशेषत: हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये बोळ नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे या नारळाचे दर कायम चढेच असतात.

किरकोळ बाजारात यांची विक्रीची किंमतही अगदी ४० ते ५० रुपये प्रतिनग इतकी आकारली जाते. सणासुदीमुळे नारळाच्या मागणीत गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत वाढ झाली आहे.

नारळाचे दर असे (घाऊक बाजार)

  1. मोठा जुना पाणी नारळ - शेकडा दर १३५० रुपये (पूर्वी १२५० )
  2. लहान जुना पाणी नारळ - शेकडा दर १३०० (पूर्वी १४००)
  3. कंगणार - शेकडा दर - १५००
  4. बोळ (हॉटेल किंग) आकारानुसार -शेकडा दर - २८०० ते ३०००

कोल्हापूरचा विचार करता रोज सहा ट्रकची आवक आहे. कर्नाटक, तमिळनाडूमधून नियमित आवक आहे. मात्र, केरळातील नारळ मुंबई, पुण्याकडे जातो. त्याच्यावर परिणाम झाला आहे. मात्र, कोल्हापूरच्या नारळाच्या बाजारपेठेत केरळातील अतिवृष्टीचा काहीअंशी परिणाम झाला आहे. त्यात श्रावण, येणारा गणेशोत्सव आणि जागेवरील खरेदी किंमत वाढल्याने दरही १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.- अविनाश नासिपुडे,नारळाचे व्यापारी

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरkolhapurकोल्हापूर