कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघात मंगळवारी सर्वत्रच अत्यंत इर्षेने व ग्रामपंचायत निवडणूकीप्रमाणे रांगा लावून मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये ६५.७५ तर हातकणंगलेमध्ये ६४ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणूकीत कोल्हापूरमध्ये ७२ तर हातकणंगलेत ७३ टक्के मतदान झाले होते. या दोन मतदार संघातील मतदानाची टक्केवारी राज्यातच काय देशात सर्वाधिक आहे. आता लोकांच्या नजरा २३ मे रोजी होणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.कोल्हापूरात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक विरुध्द शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात तर हातकणंगले मतदार संघात स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी विरुध्द शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. दोन्ही मतदार संघात ७२ ठिकाणी एव्हीएम यंत्रे बंद पडल्याने मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली. तिथे लगेच नवीन यंत्र किंवा आहे तेच दुरुस्त करून मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. २९ गावांतील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
सेनापती कापशी, ता.कागल येथील मतदान केंद्र क्रमांक २२८ वर मतदान यंत्र बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली. चुये ता. करवीर येथे सकाळी अर्धा तास मतदानयंत्र बंद झाल्यामुळे मतदानासाठी रांगा वाढल्या. कणेरी येथे २७१ केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला. देवाळे, ता. करवीर येथील ३0 मतदारांची नावे मतदार यादीतून गायब, झाल्याने गोंधळ उडाला. येथील ३२७ मतदान केंद्रावरील यंत्र बंद पडल्याने एक तास मतदारांना ताटकळत बसावे लागले, पेठवडगाव येथे शारदा विद्या मंदीरमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाला. गाडेगोंडवाडी, बाचणी ता. करवीर येथील मतदार यंत्रात बिघाड झाल्यानेही एक तास मतदान बंद होते. वेळ वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली परंतु वेळ वाढवून न देण्याचा निर्णय निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिला. गाडेगोंडवाडी ता. करवीर येथील ४० मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होती. शिरोळमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ३८ ठिकाणी ईव्हीएम मशिन बदलण्यात आले, तर इचलकरंजीत ४ यंत्रे बदलण्यात आली.कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील दिंडनेर्ली, इस्पुर्ली, नंदगाव, नागाव या मतदान केंद्रावर आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली. एकोंडी, बामणी ता. कागल येथे शेतीच्या कामाची लगबग असल्याने शेतकऱ्यांनी लवकर मतदान करणे पसंत केले. कागल तालुक्यात ग्रामीण भागात तीन गट एकीकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे अशी लढत असल्याने मतदानाला चुरस दिसून आली नाही.‘धामणी’ खोºयातील २५ गावांचा मतदानावर बहिष्कारम्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील गेले १८ वर्र्षे रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पासाठी ‘धामणी’ खोºयातील २५ गावांना लोकसभा मतदानांवर बहिष्कार टाकला. पाणीदार गावांचा अपवाद वगळता उर्वरित गावांनी बहिष्कारास शंभर टक्के पाठींबा दिला. ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवत दैनंदिन कामात व्यस्त राहणेच पसंत केले. एकाच प्रश्नांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने सामुदायिकपणे मतदानावर बहिष्कार घालण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे या गावातील सुमारे ११ हजार मतदान यामुळे होऊ शकले नाही. दुपारी १२ पर्यन्त सोळांकूर येते मतदान केंद्र क्रमांक १३0 वर एकही मतदार आला नव्हता, वेतवडे, ता पन्हाळा येथील मतदान केंद्रावरही शुकशुकाट होता. पासार्डे पैकी पाचाकटेवाड़ी येथील ग्रामस्थांनी रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे तेथेही मतदान झाले नाही. करवीर पश्चिम भागात उन्हामुळे मतदान केंद्रावर गर्दी कमी होती.मुश्रीफांची खडाजंगी, जवाहरनगरमध्ये पैसे जप्तकसबा सांगाव येथे आमदार मुश्रीफ आणि पोलिस उपाधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यात कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यावरुन खडाजंगी झाली. जवाहरनगर भागात पैसे वाटप, अरूण सोनवणे यांच्या घरातून दिड लाख जप्त करुन पोलिसांनी कारवाई केली. सिद्धानेर्ली ता.कागल येथे धनंजय महाडिक यांनी भेट देऊन युवकांबरोबर सेल्फीही काढली. तर इचलकरंजीत मर्दा कुटूंबातील सदस्यांनी एकाच वेळी मतदान केले. रूकडी येथे प्रथमच सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले होते. रत्नागिरीच्या जिल्हा न्यायाधीश शबनम अन्सार विराणी यांनी यड्राव येथील पार्वती विद्या मंदिर येथे मतदान केले, तर पन्हाळा येथे खास रायगडहून आलेले स्वदेश फौंडेशनचे समन्वयक तुषार इनामदार यांनी मतदान केले. उपनगरातही लगतच्या ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात मोठ्या चुरशीने मतदान झाले. पााचगाव, गोकूळ शिरगाव, तपोवन, कळंबा येथे मतदारांनी रांगा लावून मतदान केले.
सखी मतदान केंद्र
कागल येथे जयसिंगराव पार्कात सखी मतदान केन्द्रावर मतदारांचे स्वागत करतांना तहसीलदार गणेश गोरे, मुख्याधिकारी टीना गवळी व महीला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील ओकोली येथे सखी मतदान केंद्र उभारले होते.