शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

‘विल्सन पुतळा ’ विद्रुप करणाºया स्वातंत्र्यसैनिकांना कोल्हापुरात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 18:01 IST

कोल्हापूर : स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी खटकणारा लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप केला. त्यांनी घडविलेला इतिहास आजही स्मरणात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते जाणून स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने केलेले काम कौतुकास्पद आहे, असे गौरवौद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी काढले.‘विल्सन नोज कट’ या नावाने ओळखल्या जाणाºया या घटनेला म्हणजेच ...

ठळक मुद्दे विल्सनचा पुतळा डांबर फेकून विद्रूप केल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण स्फूर्ती देणाºया इतिहासाचे स्मरण ठेवणे महत्त्वाचे : चंद्रकांतदादा पाटीलस्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेकढून स्मरण आंदोलनाचे बीज कुठून आले हे समजले : चंद्रकांतदादा यांचा टोला पाठ्य पुस्तकात धडा घेऊन अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी

कोल्हापूर : स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी खटकणारा लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप केला. त्यांनी घडविलेला इतिहास आजही स्मरणात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते जाणून स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने केलेले काम कौतुकास्पद आहे, असे गौरवौद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी काढले.

‘विल्सन नोज कट’ या नावाने ओळखल्या जाणाºया या घटनेला म्हणजेच विल्सनचा पुतळा डांबर फेकून विद्रूप केल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या घटनेत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सन १९४२ च्या ‘चले जाव’च्या लढ्यात पुरुषांबरोबर हिरीरीने भाग घेऊन स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी मातीच्या भांड्यातून लपवून आणलेले डांबर विल्सनच्या पुतळ्यावर टाकले. हा पुतळा पूर्ण विद्रूप केला.

पुढे स्वातंत्र्यसेनानी दत्तोबा तांबट, शंकरराव माने, डॉ. माधवराव कुलकर्णी, निवृत्ती आडूरकर, सिदलिंग हाविरे, शामराव पाटील, नारायणराव घोरपडे, नारायणराव जगताप, पैलवान माधवराव घाटगे, काका देसाई, कुंडलिक देसाई, पांडुरंग पोवार, अहमद शाबाजी मुल्ला, व्यंकटेश देशपांडे यांनी पुतळ्यावर घण घालून फोडला आणि हा इतिहास आजरामर झाला.

या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने स्मरण ठेवून त्या घटनेला पुन्हा उजाळा दिला. ही बाब इतिहासाला उजाळा देण्यासारखी महत्त्वाची आहे. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व संघटनेचे आनंद माने यांनी प्रास्ताविक केले. स्वागत शरद तांबट यांनी केले.

यावेळी महापौर हसिना फरास, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, उपमहापौर अर्जुन माने, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, डॉ. संदीप नेजदार, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंत मुळीक, नगरसेवक अशोक जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, अनिल घाटगे, महादेव पाटील आदी उपस्थित होते.

चळवळीचे बीज

भाषणादरम्यान माजी महापौर आर. के. पोवार यांच्याकडे पाहत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी टोलविरोधी आंदोलन, पंचगंगा पूल आंदोलनाचे बीज कुठून आले हे समजले, असा टोला हाणला. त्यांनी जर चळवळ उभारली नसती व आम्हाला त्रास दिला नसता तर कोल्हापूरकरांवरील टोल हटला नसता, असेही त्यांनी कबुली दिली.

आठवण जागीविदु्रपीकरणाच्या आंदोलनातील स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र डॉ. निशीकांत तांबट हे त्या आंदोलनाच्यावेळी ६ वर्षाचे होते. तेही भागीरथीबार्इंच्याबरोबर तुरूंगात होते. ही आठवण ठेवून उत्तराधिकारी संघटनेने डॉ. निशीकांत तांबट यांच्या हस्ते गुरुवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास त्यांना खास बोलाविले होते. तांबट यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबरीने पुष्पहार अर्पण केला.

पाठ्य पुस्तकात धडा घ्या

‘विल्सन नोज कट ’ या पुतळा विदु्रपीकरण इतिहासाचा महाराष्ट्र राज्य शासनाने पाठ्य पुस्तकात धडा घेऊन अभ्यासक्रमात समावेश करावा. अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे शरद तांबट यांनी मागणी केली होती. यास उत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पाठ्य पुस्तकाच्या अभ्यासक्रमात धडा घेण्यासाठी प्रयत्न करु. तत्पुर्वी ५० ते ६० पानांचे पुस्तक काढू व त्यांच्या दहा हजार प्रति मी स्वत: छपाई करुन देतो. अशी ग्वाही त्यांनी दिली.