शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

‘विल्सन पुतळा ’ विद्रुप करणाºया स्वातंत्र्यसैनिकांना कोल्हापुरात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 18:01 IST

कोल्हापूर : स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी खटकणारा लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप केला. त्यांनी घडविलेला इतिहास आजही स्मरणात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते जाणून स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने केलेले काम कौतुकास्पद आहे, असे गौरवौद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी काढले.‘विल्सन नोज कट’ या नावाने ओळखल्या जाणाºया या घटनेला म्हणजेच ...

ठळक मुद्दे विल्सनचा पुतळा डांबर फेकून विद्रूप केल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण स्फूर्ती देणाºया इतिहासाचे स्मरण ठेवणे महत्त्वाचे : चंद्रकांतदादा पाटीलस्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेकढून स्मरण आंदोलनाचे बीज कुठून आले हे समजले : चंद्रकांतदादा यांचा टोला पाठ्य पुस्तकात धडा घेऊन अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी

कोल्हापूर : स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी खटकणारा लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप केला. त्यांनी घडविलेला इतिहास आजही स्मरणात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते जाणून स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने केलेले काम कौतुकास्पद आहे, असे गौरवौद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी काढले.

‘विल्सन नोज कट’ या नावाने ओळखल्या जाणाºया या घटनेला म्हणजेच विल्सनचा पुतळा डांबर फेकून विद्रूप केल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या घटनेत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सन १९४२ च्या ‘चले जाव’च्या लढ्यात पुरुषांबरोबर हिरीरीने भाग घेऊन स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट व जयाबाई हाविरे यांनी मातीच्या भांड्यातून लपवून आणलेले डांबर विल्सनच्या पुतळ्यावर टाकले. हा पुतळा पूर्ण विद्रूप केला.

पुढे स्वातंत्र्यसेनानी दत्तोबा तांबट, शंकरराव माने, डॉ. माधवराव कुलकर्णी, निवृत्ती आडूरकर, सिदलिंग हाविरे, शामराव पाटील, नारायणराव घोरपडे, नारायणराव जगताप, पैलवान माधवराव घाटगे, काका देसाई, कुंडलिक देसाई, पांडुरंग पोवार, अहमद शाबाजी मुल्ला, व्यंकटेश देशपांडे यांनी पुतळ्यावर घण घालून फोडला आणि हा इतिहास आजरामर झाला.

या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने स्मरण ठेवून त्या घटनेला पुन्हा उजाळा दिला. ही बाब इतिहासाला उजाळा देण्यासारखी महत्त्वाची आहे. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व संघटनेचे आनंद माने यांनी प्रास्ताविक केले. स्वागत शरद तांबट यांनी केले.

यावेळी महापौर हसिना फरास, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, उपमहापौर अर्जुन माने, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, डॉ. संदीप नेजदार, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंत मुळीक, नगरसेवक अशोक जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, अनिल घाटगे, महादेव पाटील आदी उपस्थित होते.

चळवळीचे बीज

भाषणादरम्यान माजी महापौर आर. के. पोवार यांच्याकडे पाहत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी टोलविरोधी आंदोलन, पंचगंगा पूल आंदोलनाचे बीज कुठून आले हे समजले, असा टोला हाणला. त्यांनी जर चळवळ उभारली नसती व आम्हाला त्रास दिला नसता तर कोल्हापूरकरांवरील टोल हटला नसता, असेही त्यांनी कबुली दिली.

आठवण जागीविदु्रपीकरणाच्या आंदोलनातील स्वातंत्र्य सौदामिनी भागीरथीबाई तांबट यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र डॉ. निशीकांत तांबट हे त्या आंदोलनाच्यावेळी ६ वर्षाचे होते. तेही भागीरथीबार्इंच्याबरोबर तुरूंगात होते. ही आठवण ठेवून उत्तराधिकारी संघटनेने डॉ. निशीकांत तांबट यांच्या हस्ते गुरुवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास त्यांना खास बोलाविले होते. तांबट यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबरीने पुष्पहार अर्पण केला.

पाठ्य पुस्तकात धडा घ्या

‘विल्सन नोज कट ’ या पुतळा विदु्रपीकरण इतिहासाचा महाराष्ट्र राज्य शासनाने पाठ्य पुस्तकात धडा घेऊन अभ्यासक्रमात समावेश करावा. अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे शरद तांबट यांनी मागणी केली होती. यास उत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, पाठ्य पुस्तकाच्या अभ्यासक्रमात धडा घेण्यासाठी प्रयत्न करु. तत्पुर्वी ५० ते ६० पानांचे पुस्तक काढू व त्यांच्या दहा हजार प्रति मी स्वत: छपाई करुन देतो. अशी ग्वाही त्यांनी दिली.