शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

कोल्हापूर : शेतकऱ्यांना लाचार करण्याचा सरकारचा प्रयत्न : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 17:34 IST

शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीतच; पण त्यांना लाचार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देएकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? मुख्यमंत्र्यांकडून कौतुक म्हणजे धोका : राजू शेट्टी

कोल्हापूर : शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीतच; पण त्यांना लाचार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला मोर्चा मुंबईत धडकला आहे. मागण्यांवर शेतकरी ठाम असून, सरकारची अडचण झाली आहे. याबाबत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांची भूमिका जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी सोमवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता, शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली.शेट्टी म्हणाले, गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत.

शेतकऱ्यांना लाचार करायचे, एवढेच काम भाजपा सरकारकडून सुरू आहे. आतापर्यंत आम्ही सनदशीर मार्गाने आमचे प्रश्न व मागण्या मांडत होतो. त्याची दखलही सरकारने घेतली नाही. तुम्ही दादच देणार नसाल तर शेतकरी आक्रमक होणारच. बळीराजाच्या जिवावर सत्ता भोगताय. त्यांनाच पायदळी तुडवाल तर याद राखा. सरकारला गुढगे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक म्हणजे धोकाशेतकरी मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुक करीत आहेत म्हणजे काहीतरी धोका वाटतो. याचा अनुभव आम्हाला आल्याची टीकाही शेट्टी यांनी केली. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर