शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शेतकऱ्यांना लाचार करण्याचा सरकारचा प्रयत्न : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 17:34 IST

शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीतच; पण त्यांना लाचार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देएकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? मुख्यमंत्र्यांकडून कौतुक म्हणजे धोका : राजू शेट्टी

कोल्हापूर : शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीतच; पण त्यांना लाचार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला मोर्चा मुंबईत धडकला आहे. मागण्यांवर शेतकरी ठाम असून, सरकारची अडचण झाली आहे. याबाबत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांची भूमिका जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी सोमवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता, शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली.शेट्टी म्हणाले, गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत. एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची, किती मोर्चे काढायचे? याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत.

शेतकऱ्यांना लाचार करायचे, एवढेच काम भाजपा सरकारकडून सुरू आहे. आतापर्यंत आम्ही सनदशीर मार्गाने आमचे प्रश्न व मागण्या मांडत होतो. त्याची दखलही सरकारने घेतली नाही. तुम्ही दादच देणार नसाल तर शेतकरी आक्रमक होणारच. बळीराजाच्या जिवावर सत्ता भोगताय. त्यांनाच पायदळी तुडवाल तर याद राखा. सरकारला गुढगे टेकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक म्हणजे धोकाशेतकरी मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुक करीत आहेत म्हणजे काहीतरी धोका वाटतो. याचा अनुभव आम्हाला आल्याची टीकाही शेट्टी यांनी केली. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर