शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कोल्हापूर : बटाटा झाला दुप्पट; डाळिंब, बोरांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:50 IST

बटाटा आणि भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. बटाटा दुपटीने वाढला असून, घाऊक बाजारात तो १० किलोंना १४० रुपये, तर किरकोळ बाजारात २०० रुपये असा होता. दुसरीकडे, डाळिंब, बोरांची आवक वाढली आहे; तर हरभरा, अननस रविवारच्या आठवडी बाजारात दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे\बटाटा झाला दुप्पट; डाळिंब, बोरांची आवक वाढलीहरभरा, अननस बाजारात : भोगीसाठी राळ्याच्या तांदळाला मागणी

कोल्हापूर : बटाटा आणि भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. बटाटा दुपटीने वाढला असून, घाऊक बाजारात तो १० किलोंना १४० रुपये, तर किरकोळ बाजारात २०० रुपये असा होता. दुसरीकडे, डाळिंब, बोरांची आवक वाढली आहे; तर हरभरा, अननस रविवारच्या आठवडी बाजारात दाखल झाला आहे.

हरभऱ्याचा डहाळा १०० रुपयांना, तर अननस ३० ते ४० रुपयांच्या घरात होता. ‘भोगी’साठी लागणारे राळ्याचे तांदूळ बाजारात आले असून, यंदा पीक कमी आल्याने परिणामी दर वाढला आहे. प्रतिकिलो तो ८० पासून १०० रुपयांपर्यंत आहे. गतवर्षी तो ६० रुपये होता. त्याला आता मागणी वाढली आहे.सौंदत्ती यात्रा झाल्यामुळे आठवडी बाजारात ग्राहकांची फारशी गर्दी दिसत नव्हती. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात काही भाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा प्रतिकिलो एक रुपयाने कमी झाला असून, तो आठ रुपयांच्या घरात आला आहे. तसेच लसणाच्या दरात घसरण झाली आहे.

लसूण प्रतिकिला १२ रुपये होता. तो गेल्या आठवड्यात १५ रुपये होता. वांगी, ओली मिरची, ढबू मिरची, भेंडी, दोडका, गवार, फ्लॉवर, कोथिंबिरीच्या पेंढीच्या दरात वाढ झाली आहे. कोथिंबिरीच्या पेंढीमागे चार रुपये वाढले आहेत. मात्र मेथी, पालक, पोकळा, शेपू, कोबी, टोमॅटो, घेवड्याचे दर ‘जैसे थे’ होते.याचबरोबर डाळिंब व बोरांची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात डाळिंब प्रतिकिलो ३३, तर बोरे १३ रुपये झाली आहेत. मोसंबी, माल्टा यांचे दर स्थिर आहेत. गुळाच्या रव्यांचा दर स्थिर होता. एक किलोच्या बॉक्सचा ३५०० रुपये दर होता. दरम्यान, ओल्या वाटाण्याची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. घाऊक बाजारात ओल्या वाटाण्याचा दर २२५ रुपये असा होता. तो गेल्या आठवड्यात ३१० रुपये असा होता.

गहू दोन; तांदूळ चारने वाढलाबासमतीसह विविध प्रकारच्या तांदळाच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. बासमती ४० रुपयांवरून ४४ रुपये, ४८ वरून ५२ रुपये; तर गव्हाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली. बन्सी गहू २८ रुपये असा झाला. सरकी, शेंगतेल, सुक्या खोबऱ्याचे दर स्थिर आहेत.बाजरी, तीळ वाढलेबाजरी २४ रुपयांवरून २८ रुपये; तर तिळाच्या दरात तब्बल ६० रुपयांनी वाढ होऊन १८० रुपये प्रतिकिलो झाले आहे. तसेच ड्रायफुटच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर