शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

कोल्हापूर : सगळ्या गोष्टी परस्परच करणार का?, स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांना विचारला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:28 IST

एखाद्या विकासकामांबाबत कन्सल्टंट नेमणे, निविदा काढणे अशा सगळ्या गोष्टी परस्परच करणार का? असा सवाल करीत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कन्सल्टंटच्या म्हणण्याप्रमाणे निविदा काढण्याची पद्धतच चुकीची असल्याचा आक्षेप सदस्यांनी सभेत नोंदविला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.

ठळक मुद्देकोल्हापूर : सगळ्या गोष्टी परस्परच करणार का?स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांना विचारला प्रश्न

कोल्हापूर : एखाद्या विकासकामांबाबत कन्सल्टंट नेमणे, निविदा काढणे अशा सगळ्या गोष्टी परस्परच करणार का? असा सवाल करीत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कन्सल्टंटच्या म्हणण्याप्रमाणे निविदा काढण्याची पद्धतच चुकीची असल्याचा आक्षेप सदस्यांनी सभेत नोंदविला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.शुक्रवारी दुपारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत झूम प्रकल्पावरील कचऱ्याच्या गंभीर प्रश्नावर चर्चा उपस्थित झाली. झूमवरील सर्व कचऱ्याने पेट घेतला असून, प्रशासन त्यावर कशा प्रकारे कॅपिंग करणार आहे, याची कल्पना कोणालाच नाही. कचरा उचलण्यासाठी १७ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी महानगरपालिकेची यंत्रणा वापरून काम करावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. परस्पर कन्सल्टंट नेमून त्याच्या म्हणण्याप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून मग स्थायी समिती व महासभेसमोर काम आणता. कन्सल्टंट नेमण्यापूर्वी तसेच निविदा काढण्यापूर्वी सभागृहाला का माहिती देत नाही, अशी विचारणा सदस्यांनी केली.हा १७ कोटी रुपयांचा खर्च वाचवता आला असता. जर सगळ्या गोष्टी जर निविदेद्वारेच करणार असाल तर मग महापालिकेची यंत्रणा काय करणार, अशीही विचारणा सदस्यांनी केली. कन्सल्टंटच्या म्हणण्याप्रमाणे जर १७ कोटी खर्च अपेक्षित असेल तर तेच काम महापालिकेची यंत्रणा राबवून किती खर्चात होऊ शकते याची माहिती सदस्यांना द्या, अशी सूचना अफजल पीरजादे यांनी केली.ठेकेदारांच्या बिलासंबंधी सभेत चर्चा झाली. पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम तसेच इतर विभागांकडील तातडीची कामे ठेकेदाराक डून करवून घेतल्यानंतर त्यांची बिले देण्यास दोन ते तीन वर्षे लागतात. अशामुळे महापालिकेची बदनामी होऊन कोणी कामे करण्यास ठेकेदार येत नाही. ज्यांनी तातडीने कामे केली आहेत, त्यांची बिले दोन-तीन महिन्यांत अदा करावीत, अशी सूचना सभापती ढवळे यांनी केली.ई वॉर्डात दोन-तीन दिवस पाणीपुरवठा झालेला नाही. एका बिल्डिंगच्या कामावेळी जलवाहिनीला गळती लागली असेल तर संंबंधित बिल्डरवर कारवाई करावी, अशी मागणी दीपा मगदूम यांनी केली.मध्यवर्ती बसस्थानकावरून पुण्याला जाणाऱ्या खासगी गाड्यांचे पार्किंग गाडीअड्ड्यावर करण्यास संंबंधितांना भाग पाडावे. त्यामुळे वाहतुकीचा त्रास कमी होईल. शिवाय महापालिकेला पार्किंग शुल्क मिळेल, अशी सूचना सभापती ढवळे यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत सविता घोरपडे, भाग्यश्री शेटके, आदींनी भाग घेतला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर