शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा धरणे लवकर भरणार

By admin | Updated: July 3, 2017 15:48 IST

सात धरणात ५० टक्केपेक्षा अधिक पाणी : गत वर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0३ : जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला सुरू असल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यातच सात धरणे ५० टक्केपेक्षा अधिक क्षमतेने भरली आहेत. घटप्रभा, कोदे हे लघु पाटबंधारे प्रकल्प फुल्ल झाले असून राधानगरी ४३ टक्के, तुळशी ५२ टक्के , वारणा ४० तर दूधगंगा ३२ टक्के पाणी साठा सध्या असल्याने यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता अधिक आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सध्या पाणीसाठा जास्त आहे. गत वर्षी पाऊस चांगला झाल्याने सर्वच धरणे फुल्ल झाली होती. त्यामुळे मे पर्यंत धरणात १५ ते २५ टक्के पाणी साठा शिल्लकच होता. ‘मृग’ नक्षत्र कोरडे गेले असले तरी वळीव पाऊस व त्यानंतरचे ‘आर्द्रा’ नक्षत्रात झालेला जोरदार पाऊस यामुळे धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

जून मध्येच कोदे व घटप्रभा धरणे पहिल्यांदाच भरली आहेत. सध्या जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणक्षेत्रात ६६, कडवी परिसरात ७०, कुंभी धरणक्षेत्रात ५२, पाटगाव परिसरात ५७ मिली मीटर पाऊस झाल्याने धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.

गेले वर्षी ३ जूलै रोजी राधानगरी धरणात ६४.९६ दशलक्ष घनमीटर होता यंदा तब्बल १०२.१९ आहे. ‘तुळशी’ धरणात गत वर्षी पेक्षा दुप्पट तर ‘दूधगंगा’ धरणात तिप्पट पाणी साठा आहे. इतर धरणातही हीच अवस्था आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता आगामी नक्षत्र काळातही दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा धरणे लवकर भरणार हे निश्चित आहे.

गतवर्षीच्या तुलनेत धरणसाठा दशलक्ष घनमीटर मध्ये 

धरण ३ जूलै २०१६ ३ जूलै २०१७ राधानगरी ६४.९६ १०२.१९ तुळशी २५.५५ ५०.७४ वारणा २६३.३८ ३९४.३६ दूधगंगा ७४.३५ २३३.६९ कासारी १८.७६ ४५.४३ कडवी ३५.०८ ३२.३२ कुंभी ३४.७० ४१.९० पाटगाव २८.८४ ४९.४८ चिकोत्रा ४.४१ ५.५० चित्री ७.८७ ११.८८

तेरा बंधारे पाण्याखाली

पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांची पातळी कमी झाली आहे. पंचगंगेची पातळी २४ फुटापर्यंत खाली आली असून ‘पंचगंगा’, ‘भोगावती’, ‘कासारी’ नदीवरील तेरा बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.  

सोळा घरांची पडझड

पाऊस सुरू झाल्यापासून सोळा घरांची अंशता पडझड झाली आहे. त्यामध्ये ६ लाख १२ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे.