शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा धरणे लवकर भरणार

By admin | Updated: July 3, 2017 15:48 IST

सात धरणात ५० टक्केपेक्षा अधिक पाणी : गत वर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0३ : जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला सुरू असल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यातच सात धरणे ५० टक्केपेक्षा अधिक क्षमतेने भरली आहेत. घटप्रभा, कोदे हे लघु पाटबंधारे प्रकल्प फुल्ल झाले असून राधानगरी ४३ टक्के, तुळशी ५२ टक्के , वारणा ४० तर दूधगंगा ३२ टक्के पाणी साठा सध्या असल्याने यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता अधिक आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सध्या पाणीसाठा जास्त आहे. गत वर्षी पाऊस चांगला झाल्याने सर्वच धरणे फुल्ल झाली होती. त्यामुळे मे पर्यंत धरणात १५ ते २५ टक्के पाणी साठा शिल्लकच होता. ‘मृग’ नक्षत्र कोरडे गेले असले तरी वळीव पाऊस व त्यानंतरचे ‘आर्द्रा’ नक्षत्रात झालेला जोरदार पाऊस यामुळे धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

जून मध्येच कोदे व घटप्रभा धरणे पहिल्यांदाच भरली आहेत. सध्या जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणक्षेत्रात ६६, कडवी परिसरात ७०, कुंभी धरणक्षेत्रात ५२, पाटगाव परिसरात ५७ मिली मीटर पाऊस झाल्याने धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.

गेले वर्षी ३ जूलै रोजी राधानगरी धरणात ६४.९६ दशलक्ष घनमीटर होता यंदा तब्बल १०२.१९ आहे. ‘तुळशी’ धरणात गत वर्षी पेक्षा दुप्पट तर ‘दूधगंगा’ धरणात तिप्पट पाणी साठा आहे. इतर धरणातही हीच अवस्था आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता आगामी नक्षत्र काळातही दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा धरणे लवकर भरणार हे निश्चित आहे.

गतवर्षीच्या तुलनेत धरणसाठा दशलक्ष घनमीटर मध्ये 

धरण ३ जूलै २०१६ ३ जूलै २०१७ राधानगरी ६४.९६ १०२.१९ तुळशी २५.५५ ५०.७४ वारणा २६३.३८ ३९४.३६ दूधगंगा ७४.३५ २३३.६९ कासारी १८.७६ ४५.४३ कडवी ३५.०८ ३२.३२ कुंभी ३४.७० ४१.९० पाटगाव २८.८४ ४९.४८ चिकोत्रा ४.४१ ५.५० चित्री ७.८७ ११.८८

तेरा बंधारे पाण्याखाली

पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांची पातळी कमी झाली आहे. पंचगंगेची पातळी २४ फुटापर्यंत खाली आली असून ‘पंचगंगा’, ‘भोगावती’, ‘कासारी’ नदीवरील तेरा बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.  

सोळा घरांची पडझड

पाऊस सुरू झाल्यापासून सोळा घरांची अंशता पडझड झाली आहे. त्यामध्ये ६ लाख १२ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे.