शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

By admin | Updated: May 6, 2015 00:41 IST

वाहनधारकांची तारंबळ : कसबा बावड्यात भींत कोसळून तिघे जखमी; झाडे पडली; घरांची कौले उडाली, वीज गेल्याने काही काळ जिल्हा अंधारात

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अचानक सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर घरांची कौले, पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. कोल्हापूर शहरानगजीकच्या कसबा बावड्यात घराची भींत पडल्याने तिघेजण जखमी झाले. तर याच परिसरात पारायण सप्ताह कार्यक्रमसाठी उभारण्यात आलेला मंडप भुईसपाट झाला. वादळी वाऱ्यामुळे वीज गेल्याने जिल्ह्याचा बहुतांशी भाग अंधारातच होता. शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याचे मानले जाते. संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपले असले तरी इचलकरंजी परिसरात मात्र पावसाने हुलकावणी दिली.कसबा बावड्यात भिंत कोसळून तिघे जखमी, मंडप भुईसपाटकसबा बावडा : सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील आंबेडकरनगरातील विष्णू सुभाना कांबळे यांच्या घरावर भिंत कोसळली. यामध्ये तिघेजण जखमी झाले, तर कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहानिमित्त उभारण्यात आलेला मंडप जोरदार वारे व पावसामुळे भुईसपाट झाला.सायंकाळी साडेसहा वाजता बावड्यात अचानक आकाश काळवंडून आले. पाठोपाठ जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. यामुळे आंबेडकरनगर येथे भिंत कोसळली. अग्निशामक दलाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा हलविण्यास सुरुवात केली. यामध्ये विष्णू कांबळे यांची पत्नी उषा कांबळे (वय ४७), सून सुप्रिया कांबळे (२२), नातू सोहम कांबळे (२) हे तिघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये हलविण्यात आले.कसबा बावडा वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थांच्या वतीने येथील पॅव्हेलियन मैदानावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ ते १२ मे अखेर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सात हजार स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला होता, पण हा मंडप जोरदार वाऱ्यामुळे भुईसपाट झाला. यामध्ये मंडपाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. आता हा कार्यक्रम पॅव्हेलियन मैदानाजवळील हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. याशिवाय दत्तमंदिर परिसरात बाळासाहेब गरड यांच्या घरावर झाड पडले. दुकानलाईनमधील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले. व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. गारगोटीत घरांची कौले उडालीगारगोटी : भुदरगड तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने काही घराची कौले उडून जाऊन प्रचंड नुकसान झाले आहे. सायंकाळी अचानकपणे सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.सायंकाळी वीज गायब झाल्याने अंधारातूनच शेतकरी, दुकानदार, बाजारला गेलेल्या मंडळींनी आपले घर गाठले. विजांच्या कडकडाडात पावसाने जोर धरला होता. मुसळधार पावसाच्या पाण्याने गावातील गटारी भरून वाहत होत्या.जयसिंगपूरला पावसाने झोडपलेजयसिंगपूरसह परिसरात मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात वळीव पावसास सुरुवात झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.