शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

By admin | Updated: May 6, 2015 00:41 IST

वाहनधारकांची तारंबळ : कसबा बावड्यात भींत कोसळून तिघे जखमी; झाडे पडली; घरांची कौले उडाली, वीज गेल्याने काही काळ जिल्हा अंधारात

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अचानक सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर घरांची कौले, पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. कोल्हापूर शहरानगजीकच्या कसबा बावड्यात घराची भींत पडल्याने तिघेजण जखमी झाले. तर याच परिसरात पारायण सप्ताह कार्यक्रमसाठी उभारण्यात आलेला मंडप भुईसपाट झाला. वादळी वाऱ्यामुळे वीज गेल्याने जिल्ह्याचा बहुतांशी भाग अंधारातच होता. शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याचे मानले जाते. संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपले असले तरी इचलकरंजी परिसरात मात्र पावसाने हुलकावणी दिली.कसबा बावड्यात भिंत कोसळून तिघे जखमी, मंडप भुईसपाटकसबा बावडा : सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील आंबेडकरनगरातील विष्णू सुभाना कांबळे यांच्या घरावर भिंत कोसळली. यामध्ये तिघेजण जखमी झाले, तर कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहानिमित्त उभारण्यात आलेला मंडप जोरदार वारे व पावसामुळे भुईसपाट झाला.सायंकाळी साडेसहा वाजता बावड्यात अचानक आकाश काळवंडून आले. पाठोपाठ जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. यामुळे आंबेडकरनगर येथे भिंत कोसळली. अग्निशामक दलाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा हलविण्यास सुरुवात केली. यामध्ये विष्णू कांबळे यांची पत्नी उषा कांबळे (वय ४७), सून सुप्रिया कांबळे (२२), नातू सोहम कांबळे (२) हे तिघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये हलविण्यात आले.कसबा बावडा वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थांच्या वतीने येथील पॅव्हेलियन मैदानावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ ते १२ मे अखेर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सात हजार स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला होता, पण हा मंडप जोरदार वाऱ्यामुळे भुईसपाट झाला. यामध्ये मंडपाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. आता हा कार्यक्रम पॅव्हेलियन मैदानाजवळील हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. याशिवाय दत्तमंदिर परिसरात बाळासाहेब गरड यांच्या घरावर झाड पडले. दुकानलाईनमधील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले. व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. गारगोटीत घरांची कौले उडालीगारगोटी : भुदरगड तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने काही घराची कौले उडून जाऊन प्रचंड नुकसान झाले आहे. सायंकाळी अचानकपणे सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.सायंकाळी वीज गायब झाल्याने अंधारातूनच शेतकरी, दुकानदार, बाजारला गेलेल्या मंडळींनी आपले घर गाठले. विजांच्या कडकडाडात पावसाने जोर धरला होता. मुसळधार पावसाच्या पाण्याने गावातील गटारी भरून वाहत होत्या.जयसिंगपूरला पावसाने झोडपलेजयसिंगपूरसह परिसरात मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात वळीव पावसास सुरुवात झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.