शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:01 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हयास स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन आॅक्टोबर रोजी स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरवतीन घटकांवर मुल्यांकनस्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हयाला ९० टक्के गुण

कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हयास स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दोन आॅक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त्याने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या कामांवर आधारित याचे गुणांकन केले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे.

स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हयाला ९० टक्के इतके गुण मिळाले आहेत. दि. २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे. स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूर,सांगली व सातारा हे तीन ही जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत.या उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हयांचा २ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमावेळी गौरव केला जाणार आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रा.पं),गटसंसाधन केंद्रातील कमर्चारी, आणि ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कमर्चा-यांनी मेहनत घेतली. या कामगिरीसाठी मुख्य कायर्कारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. काम वेळेत पुर्ण करून घेण्यासाठी उपमुख्य कायर्कारी अधिकारी सुषमा देसाई, व या विभागातील तज्ञ व सल्लागार यांनी विशेष परिश्रम घेतले.

तीन घटकांवर मुल्यांकनकेंद्र शासनाकडून या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्पर्धेसाठी त्या जिल्ह्याची कामगिरी, शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे गुणांकन केले आहे.

जिल्ह्याला मिळालेले गुणकोल्हापूर जिल्हयाला कामगिरीमध्ये ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत तसेच शाश्वत्ता या घटकासाठी २५ पैकी १५ गुण मिळाले आहेत तसेच पारदर्शकतेसाठी २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.