शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:01 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हयास स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन आॅक्टोबर रोजी स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरवतीन घटकांवर मुल्यांकनस्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हयाला ९० टक्के गुण

कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हयास स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दोन आॅक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त्याने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणा-या कामांवर आधारित याचे गुणांकन केले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे.

स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हयाला ९० टक्के इतके गुण मिळाले आहेत. दि. २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे. स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूर,सांगली व सातारा हे तीन ही जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत.या उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हयांचा २ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमावेळी गौरव केला जाणार आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रा.पं),गटसंसाधन केंद्रातील कमर्चारी, आणि ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कमर्चा-यांनी मेहनत घेतली. या कामगिरीसाठी मुख्य कायर्कारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. काम वेळेत पुर्ण करून घेण्यासाठी उपमुख्य कायर्कारी अधिकारी सुषमा देसाई, व या विभागातील तज्ञ व सल्लागार यांनी विशेष परिश्रम घेतले.

तीन घटकांवर मुल्यांकनकेंद्र शासनाकडून या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्पर्धेसाठी त्या जिल्ह्याची कामगिरी, शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे गुणांकन केले आहे.

जिल्ह्याला मिळालेले गुणकोल्हापूर जिल्हयाला कामगिरीमध्ये ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत तसेच शाश्वत्ता या घटकासाठी २५ पैकी १५ गुण मिळाले आहेत तसेच पारदर्शकतेसाठी २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.