शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा मुक्काम हलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:27 IST

गेली २० वर्षे स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर या भाड्याच्या इमारतीतून जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संसार चालविणारे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा मुक्काम हललाकसबा बावडा येथील नवीन जागेत उद्या स्थलांतरतब्बल २० वर्षांनंतर स्वमालकीच्या इमारतीत

कोल्हापूर : गेली २० वर्षे स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर या भाड्याच्या इमारतीतून जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संसार चालविणारे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होत आहे.

कसबा बावडा येथील ‘आत्मा’ कार्यालयातील एका इमारतीची ५० लाख रुपये खर्चून डागडुजी करून झाली आहे. या नव्या जागेत उद्या, गुरुवारपासून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सुरू होत आहे. या स्वमालकीच्या इमारतीत २० वर्षांनंतर पहिल्यांदाच कृषी विभागातील कर्मचारी मोकळा श्वास घेणार आहेत.स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर इमारतीतील तिसरा मजला. पायऱ्यांवरून चढउतार शरीराची परीक्षा पाहणारा. एवढे करून आत गेले तर समोर दिसणारे दृश्य बघितले, की कशाला आलो म्हणावे अशी परिस्थिती. तरीही फायलींच्या ढिगाºयाच्या आडोशाला बसून काम करणारे पन्नासभर अधिकारी, कर्मचारी.

पायाखाली कधी उंदीर येतील याचा काही नेम नाही. असे हे १९९८ पासूनचे चित्र आहे, जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाचे. मृद्संधारण, वसुंधरा पाणलोट, जलयुक्त शिवार, यांत्रिकीकरण, ठिबक यांसह दरवर्षी कोट्यवधीच्या २०० हून अधिक कृषी योजना राबविणाऱ्या या कार्यालयाचे कामकाज मात्र खुराडेवजा कार्यालयातून होत होते.ट्रेड सेंटर ही खासगी इमारत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाची मंंजुरी मिळाल्यापासून याच इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ‘कृषी’चे कार्यालय सुरू आहे. मध्यंतरी उमेश पाटील हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असताना त्यांनी सर्वप्रथम या खुराडेवजा कार्यालयाला नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांसाठी त्यांनी स्वतंत्र केबिन्स करून घेतल्या. यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचा वावर थोडा सुखावह झाला; पण त्यानंतर काहीही दुरुस्ती वा सुधारणा न झाल्याने कार्यालयातील फाइलींचे ढीग वाढत गेले, उंदरांचा उच्छाद वाढला. टेबल-खुर्च्याही मोडकळीस आल्या.यावरून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार केले. दोन वर्षांपूर्वी तर ‘दुरुस्ती करा अथवा स्थलांतर करा,’ असा आग्रहच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरला. त्यानंतर सदर बाजार येथील कृषी विभागाच्या जागेवर कार्यालय बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या; पण तोही प्रस्ताव मागे पडला.

अखेरपूर्वी कसबा बावडा येथील ‘आत्मा’च्या कार्यालयातच हे कार्यालय स्थलांतरित करावे, असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यासाठी ‘डीपीडीसी’तून ५० लाख रुपये मंजूर केले गेले. सहा महिन्यांपूर्वी इमारत ताब्यात घेऊन तिची डागडुजी करून घेतली. आता ही इमारत सुसज्ज झाली आहे.२० वर्षांत एक कोटी रुपये भाड्यावर खर्चदरमहा ४५ हजार रुपये निव्वळ भाडे म्हणून भरावे लागत होते. गेल्या २० वर्षांत एक कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम फक्त भाड्यावर खर्च झाली आहे. एवढ्या रकमेत एखादे नवीन कार्यालय उभे राहिले असते; पण शासकीय पातळीवरच्या उदासीनतेमुळे आजअखेर या कार्यालयाने आपला आतापर्यंतचा संसार याच कार्यालयातून केला.

२०० हून अधिक योजनांचा भारजिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात आस्थापना, लेखा, वसुंधरा पाणलोट, मृद्संधारण, फलोत्पादन, सांख्यिकी हे प्रमुख सहा विभाग आहेत. येथे जलयुक्त शिवार, ठिबक, कृषी यांत्रिकीकरण या योजनांचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. येथे एकूण ४५ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांपैकी १५ जण कंत्राटी आहेत. 

टॅग्स :agricultureशेतीkolhapurकोल्हापूर