शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा मुक्काम हलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:27 IST

गेली २० वर्षे स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर या भाड्याच्या इमारतीतून जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संसार चालविणारे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा मुक्काम हललाकसबा बावडा येथील नवीन जागेत उद्या स्थलांतरतब्बल २० वर्षांनंतर स्वमालकीच्या इमारतीत

कोल्हापूर : गेली २० वर्षे स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर या भाड्याच्या इमारतीतून जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संसार चालविणारे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होत आहे.

कसबा बावडा येथील ‘आत्मा’ कार्यालयातील एका इमारतीची ५० लाख रुपये खर्चून डागडुजी करून झाली आहे. या नव्या जागेत उद्या, गुरुवारपासून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सुरू होत आहे. या स्वमालकीच्या इमारतीत २० वर्षांनंतर पहिल्यांदाच कृषी विभागातील कर्मचारी मोकळा श्वास घेणार आहेत.स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर इमारतीतील तिसरा मजला. पायऱ्यांवरून चढउतार शरीराची परीक्षा पाहणारा. एवढे करून आत गेले तर समोर दिसणारे दृश्य बघितले, की कशाला आलो म्हणावे अशी परिस्थिती. तरीही फायलींच्या ढिगाºयाच्या आडोशाला बसून काम करणारे पन्नासभर अधिकारी, कर्मचारी.

पायाखाली कधी उंदीर येतील याचा काही नेम नाही. असे हे १९९८ पासूनचे चित्र आहे, जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाचे. मृद्संधारण, वसुंधरा पाणलोट, जलयुक्त शिवार, यांत्रिकीकरण, ठिबक यांसह दरवर्षी कोट्यवधीच्या २०० हून अधिक कृषी योजना राबविणाऱ्या या कार्यालयाचे कामकाज मात्र खुराडेवजा कार्यालयातून होत होते.ट्रेड सेंटर ही खासगी इमारत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाची मंंजुरी मिळाल्यापासून याच इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ‘कृषी’चे कार्यालय सुरू आहे. मध्यंतरी उमेश पाटील हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असताना त्यांनी सर्वप्रथम या खुराडेवजा कार्यालयाला नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांसाठी त्यांनी स्वतंत्र केबिन्स करून घेतल्या. यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचा वावर थोडा सुखावह झाला; पण त्यानंतर काहीही दुरुस्ती वा सुधारणा न झाल्याने कार्यालयातील फाइलींचे ढीग वाढत गेले, उंदरांचा उच्छाद वाढला. टेबल-खुर्च्याही मोडकळीस आल्या.यावरून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार केले. दोन वर्षांपूर्वी तर ‘दुरुस्ती करा अथवा स्थलांतर करा,’ असा आग्रहच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरला. त्यानंतर सदर बाजार येथील कृषी विभागाच्या जागेवर कार्यालय बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या; पण तोही प्रस्ताव मागे पडला.

अखेरपूर्वी कसबा बावडा येथील ‘आत्मा’च्या कार्यालयातच हे कार्यालय स्थलांतरित करावे, असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यासाठी ‘डीपीडीसी’तून ५० लाख रुपये मंजूर केले गेले. सहा महिन्यांपूर्वी इमारत ताब्यात घेऊन तिची डागडुजी करून घेतली. आता ही इमारत सुसज्ज झाली आहे.२० वर्षांत एक कोटी रुपये भाड्यावर खर्चदरमहा ४५ हजार रुपये निव्वळ भाडे म्हणून भरावे लागत होते. गेल्या २० वर्षांत एक कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम फक्त भाड्यावर खर्च झाली आहे. एवढ्या रकमेत एखादे नवीन कार्यालय उभे राहिले असते; पण शासकीय पातळीवरच्या उदासीनतेमुळे आजअखेर या कार्यालयाने आपला आतापर्यंतचा संसार याच कार्यालयातून केला.

२०० हून अधिक योजनांचा भारजिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात आस्थापना, लेखा, वसुंधरा पाणलोट, मृद्संधारण, फलोत्पादन, सांख्यिकी हे प्रमुख सहा विभाग आहेत. येथे जलयुक्त शिवार, ठिबक, कृषी यांत्रिकीकरण या योजनांचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. येथे एकूण ४५ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांपैकी १५ जण कंत्राटी आहेत. 

टॅग्स :agricultureशेतीkolhapurकोल्हापूर