शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, किसान सभेचे पिठलं-भाकरी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 18:01 IST

कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक पाहणीत चार तालुके दुष्काळसदृश जाहीर झाले होते, परंतु सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश केलेला नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिठलं-भाकरी आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा किसान सभेचे पिठलं-भाकरी आंदोलन : सरकारचा निषेध

कोल्हापूर : जिल्ह्यात प्राथमिक पाहणीत चार तालुके दुष्काळसदृश जाहीर झाले होते, परंतु सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश केलेला नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिठलं-भाकरी आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.यावेळी आंदोलकांनी सोबत आणलेली पिठलं-भाकरी खाऊन सरकारचा निषेध नोंदविला. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. राज्यातील १५१ तालुक्यांत शासनातर्फे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.दुष्काळ जाहीर करण्याचे राज्य सरकारचे पूर्वीचे निकष बदलून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन निकषांआधारे पाहणीद्वारे दुष्काळ जाहीर झाल्याने राज्यातील सुमारे शंभर तालुक्यांवर अन्याय झाला आहे. गाववार आणेवारीचे राज्य सरकारचे निकष बदलून उंबरठा उत्पादनाचे नवे निकष तालुका पातळीवर लावल्याने हा अन्याय दिसून येत आहे.

सॅटेलाईटद्वारे पाहणीचे निकष तज्ज्ञांच्या मतांप्रमाणे ७० टक्क्यांपर्यंत बरोबर असतात असे मत आहे. त्यामुळे ही पाहणी सदोष असू शकते. या चुकांचा बळी प्रत्यक्षात जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्यांना बसत आहे. त्यामुळे गाववार आणेवारीप्रमाणे गावे दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने जाहीर करावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.आंदोलनात जिल्हाध्यक्ष वाय. एन. पाटील, जिल्हा सचिव नामदेव पाटील, बी. एल. बरगे, अनिल चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, शिवाजी जाधव, कृष्णा पानसे, सपना पानसे, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, केरबा ताटे, महेश लोहार, आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी