शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

केरळ पुरातही झाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मोलाची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 16:29 IST

प्रवीण देसाई कोल्हापूर : गतवर्षी केरळमध्ये प्रलयकारी महापुरात मोलाची कामगिरी करून मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम तत्कालीन राज्य आपत्ती ...

ठळक मुद्देकेरळ पुरातही झाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मोलाची कामगिरीआपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वानुभवाचा कोल्हापूरात झाला उपयोग

प्रवीण देसाई

कोल्हापूर : गतवर्षी केरळमध्ये प्रलयकारी महापुरात मोलाची कामगिरी करून मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम तत्कालीन राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक व सध्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले होते. त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनातील पूर्वानुभवाचा उपयोग कोल्हापुरातील महापुराची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात झाला. शांत डोक्याने कोणतीही मनुष्यहानी न होता, जास्तीत जास्त लोकांना मदत कशी पोहोचेल, याचे केलेले नियोजन वाखाण्याजोगे आहे.केरळ राज्यात गेल्यावर्षी प्रलयकारी महापूर आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली. गलितगात्र झालेल्या तेथील राज्यशासनालाही काय करावे, हे सुचेना. यावेळी महाराष्ट्राचा  सुपुत्र असलेल्या तत्कालीन आपत्ती व्यवस्थापन संचालक दौलत देसाई यांनी मोलाचे सहकार्य करून धीर देण्याचे काम केले. त्यांनी मंत्रालयात बसून, तेथील परिस्थितीचा आढावा घेत, तेथील प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील योग्य मार्गदर्शन केले.

नुसते मार्गदर्शन करून ते थांबले नाहीत, तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे १६ कोटी रुपयांचे ४० हॉर्स पॉवरचे पाणी बाहेर काढणारे पंप दिले. त्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी साचले होते ते काढण्यामध्ये केरळ सरकारला मोठा हातभार लागला. तसेच इतरही जीवनावश्यक मदतही राज्य सरकारसह सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संकलित करून ती पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. अशा कठीण परिस्थितीचा सामना कशा पद्धतीने करायचा हा अनुभव गाठीला असल्याने जिल्हाधिकारी देसाई यांनी कोल्हापुरातील महापुरातही मोलाची भूमिका बजावली.कोल्हापूरने गेल्या १00 वर्षांत अनुभवला नाही, इतका मुसळधार पाऊस यावर्षी झाला. या महापुराने होत्याचे नव्हते झाले. शिरोळमधील १२ व करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी ही गावे पूर्णपणे पाण्यात गेली. कोणतीही मनुष्यहानी न होऊ देता, पूरग्रस्तांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर होते.

यात जिल्हाधिकारी देसाई यांचा कस लागणार होता; परंतु त्यांनी ही परिस्थिती शांतपणे हाताळली. कोणतीही चिडचिड नाही किंवा अशा परिस्थितीत काय करायचे हा त्यांना पूर्वानुभव असल्याने त्यांनी योग्य नियोजन करून शांतपणे या परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीKolhapur Floodकोल्हापूर पूर