शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

स्वच्छतेत कोल्हापूर जिल्हा देशात पाचवा

By admin | Updated: September 9, 2016 01:11 IST

सर्वांत स्वच्छ जिल्ह्याचा सन्मान महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळविला असून, सातारा तिसऱ्या, तर कोल्हापूर पाचव्या क्रमांकावर आहे.

सुरेश भटेवरा- नवी दिल्ली --भारत सरकारच्या ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात सिक्कीम व केरळ राज्याने देशात पहिला व दुसरा क्रमांक पटकाविला आहे. सिक्कीमखेरीज हिमाचल प्रदेश, मिझोरम व नागालँड ग्रामीण स्वच्छतेत आघाडीवर आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र १५ व्या क्रमांकावर आहे. मात्र, सर्वांत स्वच्छ जिल्ह्याचा सन्मान महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळविला असून, सातारा तिसऱ्या, तर कोल्हापूर पाचव्या क्रमांकावर आहे. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सर्वेक्षण अहवालाचे ठळक तपशील गुरुवारी जाहीर केले. पुढले सर्वेक्षण जानेवारी महिन्यात होणार आहे. केंद्र सरकारने देशातल्या ७0 जिल्ह्यांत ७0 हजारांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण करून हा अहवाल सादर केला. सर्वेक्षणात मुख्यत्वे ग्रामीण भागांचाच समावेश आहे. अहवालानुसार देशातले सर्वाधिक स्वच्छ राज्य सिक्कीम आहे. त्यानंतर अनुक्रमे केरळ, मिझोरम, हिमाचल प्रदेश व नागालँड यांचा क्रमांक लागतो.ग्रामीण स्वच्छतेत बंगाल १२ व्या, गुजरात १४ व्या, तर महाराष्ट्र १५ व्या क्रमांकावर आहे. देशातले सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश २६ व्या, तर बिहार सर्वांत शेवटच्या ३१ व्या क्रमांकावर आहे. तोमर म्हणाले, की या रँकिंगमुळे राज्यांत जिल्ह्यामध्ये स्वच्छतेची स्पर्धा वाढेल व जनतेत जागरूकता निर्माण होईल. स्वच्छ जिल्ह्यांच्या सिंधुदुर्गखालोखाल बंगालचा नादिया, महाराष्ट्रातील सातारा, बंगालचा पूर्व मिदनापूर व महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वेक्षणात सर्वाधिक गुण ग्रामीण भागांत घरातील शौचालयांच्या स्वच्छतेला देण्यात आले.