शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Kolhapur: 'केडीसीसी’ राज्यात नंबर वन आणू, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास 

By राजाराम लोंढे | Updated: March 4, 2024 13:39 IST

१० हजार कोटी ठेवींचा इष्टांक 

कोल्हापूर : मागील आर्थिक वर्षात ठेवी व नफ्याचे दिलेले उदिष्ट्य पार केले, या आर्थिक वर्षात दहा हजार कोटी ठेवीचा इष्टांक पुर्ण करायचा आहे. त्यादृ्ष्टीने कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) राज्यात नंबर वन आणू, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मार्च २०२४ च्या पार्श्वभूमीवर व्यवसाय वृध्दी, ठेव इष्टांक व वसुली पुर्तता या कार्यशाळेत ते बोलत होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले,  बँकेने ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. अजूनही काही आवश्यक सुविधा असतील तर ग्राहकांसाठी  त्याची पुर्तता केली जाईल.व्यवसाय विकास कक्षाचे व्यवस्थापक एस. ए. वरुटे, शेती कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस. डी. आडनाईक, व्यक्तिगत कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस. के. बावधनकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक जी. जे. पाटील, सीएमए सेलचे व्यवस्थापक अल्ताफ मुजावर यांनी विभागनिहाय आढावा सादर केला. लवाद विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. बँकेचे उपाध्यक्षआमदार राजू आवळे, राजेश पाटील, निवेदिता माने, भैय्या माने,  बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिह पाटील, सुधीर देसाई, रणवीर गायकवाड, विजयसिंह माने, श्रृतिका काटकर, स्मिता गवळी आदी उपस्थित होते.  लेखापरीक्षण विभागाचे व्यवस्थापक एस. व्ही. लाड यांनी आभार मानले.

राज्यात ‘केडीसीसी’च अव्वलराज्यातील ३१ जिल्हा बँकांमध्ये ‘केडीसीसी’ बँकेचे स्थान फार वरचे आहे. प्रत्येक शाखा व्यवस्थापकाने ताळेबंद बांधताना आर्थिक निकषांची पुर्तता करावी, असे आवाहन राज्य सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक व जिल्हा बँकेचे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले.               एन. पी. ए. अजिबात नको..मागील एनपीएची वसुली मार्च पुर्वी झाली पाहिजे, गेल्या वर्षीपेक्षा कोणत्याही परिस्थितीत त्यात वाढ होता कामा नये, त्यादृष्टीने वसुलीची प्रक्रिया राबवा, अशा सूचना मंत्री मुश्रीफ यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकHasan Mushrifहसन मुश्रीफ